शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

'भारताचा झेंडा लावून हंगेरीकडे बस निघाली अन् मन उचंबळून आलं'; युक्रेनवरून परतलेल्या दोन विद्यार्थ्यांनी व्यक्त केली भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2022 07:00 IST

Nagpur News भारताचा झेंडा लावून आमची बस निघाली, तो ध्वज पाहिला अन् मन उचंबळून आलं...! ही प्रतिक्रिया आहे युक्रेनवरून परतलेल्या भाग्यश्री कापसे या विद्यार्थिनीची!

गोपालकृष्ण मांडवकर

नागपूर : आम्ही युक्रेनमधील उझोरडमध्ये शिकतो. युद्ध पेटले आणि क्षणात सारे वातावरणच बदलले. आमच्या मुक्कामाच्या ठिकाणापासून ९०० किलोमीटरवर बॉम्ब पडत होते. आम्ही सारे धास्तावलेले होतो. अशातच भारतात परत जाण्याची व्यवस्था झाली. युनिव्हर्सिटीच्या बसने हंगेरीच्या बॉर्डरपर्यंत पोहोचवले. भारताचा झेंडा लावून आमची बस निघाली, तो ध्वज पाहिला अन् मन उचंबळून आलं...! ही प्रतिक्रिया आहे युक्रेनवरून परतलेल्या भाग्यश्री कापसे या विद्यार्थिनीची!

सोमवारी सकाळी १२.१० वाजता विमानाने भाग्यश्री आणि स्वप्नील देवगडे या विद्यार्थ्यांचे नागपुरात आगमन झाले, तेव्हा 'लोकमत'शी बोलताना ते भावुक झाले होते. या दोघांनीही भारतात सुखरूप पोहोचविल्याबद्दल आणि दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनकडून आपुलकीच्या भावनेने झालेल्या स्वागताबद्दल त्यांनी देशाचे आभार मानले.

हे दोन्ही विद्यार्थी युक्रेनमधील उझोरड नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये शिकतात. भाग्यश्री तिथे तीन महिन्यांपूर्वी शिकायला गेलेली, तर स्वप्नील अगदी मागच्या महिन्यात १९ जानेवारीला गेलेला. या दोघांनाही तिथल्या भौगोलिक स्थितीबद्दल फारशी माहिती नव्हती. अभ्यासात जेमतेम मन रमत असतानाच, युद्धस्थिती निर्माण झाली. भाग्यश्री म्हणाली, उजुग्रोनला परिस्थिती तशी चांगली होती, मात्र कीव शहरात बॉम्ब पडणे सुरू झाले. परिस्थिती बरीच चिघळली. त्यामुळे आम्ही मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. परतणारी आमची पहिली बॅच होती, मात्र तिकीट कन्फर्म झाल्यावर सर्व एअरलाईन्स बंद पडल्या. आमची फ्लाईटसुद्धा रद्द झाली. परंतु २६ फेब्रुवारीला आमची एनएमएलसीच्या माध्यमातून तिथून निघण्याची व्यवस्था करण्यात आली. युनिव्हर्सिटीच्या बसनेच आम्हाला हंगेरीच्या बॉर्डरपर्यंत नेऊन सोडले.

स्वप्नील म्हणाला, अजूनही किमान दहा हजारांवर विद्यार्थी अडकलेले आहेत. त्यांना परत आणण्याचे प्रयत्न भारत सरकारकडून सुरू आहेत. मात्र आता परिस्थिती बरीच चिघळत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. आम्हीसुद्धा प्रचंड धास्तावलो होतो. मात्र सर्वांकडून धीर मिळत होता. घरुनही संपर्क होत असल्याने धोक्याची जाणीव असूनही आम्ही सुरक्षितपणे वावरत होतो.

ऑनलाईन अभ्यासानंतर सहा महिन्यांनी पुन्हा परतणार

पुढील सहा महिने आम्ही भारतात राहूनच युनिव्हर्सिटीने दिलेला ऑनलाईन अभ्यास करणार आहोत. त्यानंतर आम्ही पुन्हा शिकण्यासाठी परत जाऊ, असा निर्धार स्वप्नील आणि भाग्यश्री या दोघांनीही व्यक्त केला.

मिठाई भरवून कुटुंबियांकडून स्वागत

विमानतळाबाहेर येताच स्वप्निलच्या आई-बाबांनी आणि कुटुंबीयांनी येऊन त्याला मिठी मारली व दोघांचेही मिठाई भरवून स्वागत केले. स्वप्निल नागपुरातील पार्डी पुनापूर येथे राहतो, तर भाग्यश्री गोंदिया जिल्ह्यातील कामठा या गावात राहते.

अन्य विद्यार्थीही सुखरूप परतावेत

भाग्यश्री आणि स्वप्नील म्हणाले, भारतभूमीवर पाय ठेवताच प्रचंड आनंद झाला. आम्हाला भारत सरकारने सुखरूपपणे परत आणले, तसेच अन्य विद्यार्थीही सुखरूपपणे मायदेशी परतावे, अशी भावना या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Studentविद्यार्थीRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया