शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जातनिहाय जनगणनेसाठी १९४८च्या कायद्यात दुरुस्ती करावी लागेल ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 14:43 IST

Nagpur : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. तायवाडे यांचे मत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली असली तरी त्यासाठी आधी १९४८ च्या कायद्यात दुरुस्ती करावी लागेल. त्यानंतरच ही प्रक्रिया पूर्ण करता येईल, असे मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केले आहे.

डॉ. तायवाडे म्हणाले, अनेक वर्षापासून या देशातील ओबीसी समाजाकडून जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली जात होती. सामाजिक संघटनांची मागणी राजकीय पक्षांनी आपल्या अजेंड्यावर घेतली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा, राज्यसभेसह वेगवेगळ्या व्यासपीठांवर ही मागणी केली. याला प्रतिसाद देत केंद्र सरकारने मंत्रिमंडळात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सर्वच स्तरावरून केंद्र सरकारचे अभिनंदन करण्यात आले. केंद्र सरकारने २०२५ची अधिसूचना काढली व त्यात २०२७मध्ये जातनिहाय जनगनना पूर्ण होईल, असा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, जातनिहाय जनगणनेला सुरुवात होण्यापूर्वी केंद्र सरकारला १९४८च्या जनगणना कायद्यात दुरुस्ती करावी लागेल. 

जागानिहाय जनगणना करण्यात येईल, असा उल्लेख त्यात करावा लागेल. यासाठी लोकसभा व राज्यसभेत तसा कायदा मंजूर करून घ्यावा लागेल. या दोन्ही सभागृहात हे दुरुस्ती विधेयक एकमताने मंजूर होईल, असा विश्वास व्यक्त करीत जातनिहाय जनगणना होण्याबाबत आपल्या मनात कुठलीही शंका नसल्याचे डॉ. तायवाडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :nagpurनागपूर