शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

...म्हणून रामावर उपस्थित होतात प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 11:11 IST

आठ हजार वर्ष उलटून गेल्यानंतरदेखील भगवान श्रीरामाच्या अस्तित्वावर लोक प्रश्न उपस्थित करतात. याचे कारण म्हणजे समाजात आता रामासारखे लोक दिसून येत नाहीत.

ठळक मुद्देदत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी वर्षाला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आठ हजार वर्ष उलटून गेल्यानंतरदेखील भगवान श्रीरामाच्या अस्तित्वावर लोक प्रश्न उपस्थित करतात. याचे कारण म्हणजे समाजात आता रामासारखे लोक दिसून येत नाहीत. त्यामुळेच अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित होतात, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. भारतीय मजदूर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमादरम्यान ते रविवारी बोलत होते.रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला लोकसभेच्या माजी अध्यक्षा व दत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी समारोह समितीच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, सचिव वीरजेश उपाध्याय, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेढे प्रामुख्याने उपस्थित होते. दत्तोपंत ठेंगडी यांनी सामाजिक समरसतेचे स्वप्न दिले. त्यांनी दिलेले विचार आजदेखील तितकेच शाश्वत आहेत. बदलत्या काळात मूल्यांना कायम ठेवून विचारांची गती वाढविण्याची गरज आहे. दत्तोपंत ठेंगडी हे महान विचारक होते, परंतु विचारांच्या चौकटीत बंद नव्हते. त्यांच्यासारख्या महापुरुषांचे वचन व कर्म जनतेपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यांचे व्यक्तित्व, कृतित्व व नेतृत्व समाजात प्रबोधित केले पाहिजे, असे डॉ.मोहन भागवत म्हणाले. वीरजेश उपाध्याय यांनी प्रास्ताविक केले. अमर कुलकर्णी यांनी वैयक्तिक गीत सादर केले. तर अजय पत्की यांनी आभार मानले.

अयोध्या प्रकरणात चांगला निर्णय : जोशीअयोध्या प्रकरणात चांगला निर्णय झाला आहे. याचा लाभ सर्व देशाला मिळायला हवा. त्या आधारावर आता पुढे जायला हवे. मंदिर बांधण्यासंदर्भात ट्रस्ट पुढील प्रक्रिया ठरवेल असे डॉ.मुरली मनोहर जोशी म्हणाले. मथुरा आणि काशीसंदर्भात त्यांना विचारले असता तो मुद्दा आता कुणी उचलला आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

ज्योती कलश यात्रेचे स्वागतदत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी ज्योती कलश यात्रा रविवारी नागपुरात पोहोचली. आर्वीहून ही यात्रा निघाली होती. शिवाय ठेंगडी यांच्या जीवनप्रवासावर आधारित चित्रप्रदर्शनीचेदेखील उद्घाटन झाले. संस्कार भारतीतर्फे हे प्रदर्शन साकारण्यात आले.

नेतृत्व करणाऱ्यांनी उपदेश कृतीत आणावा‘टीमवर्क’ करत असताना नेतृत्व करणाऱ्यांनी सर्वांसोबत एकत्रितपणे राहून काम केले पाहिजे. विशेष म्हणजे त्यांनी ते स्वत: इतरांना देत असलेला उपदेश अगोदर कृतीत आणण्याची आवश्यकता असते. जसे बोलले तसेच वागले पाहिजे. शिवाय कर्तृत्ववान व्यक्ती जोडण्याकडे कल असला पाहिजे, असे मत सरसंघचालकांनी व्यक्त केले.

मातृशक्तीशिवाय कुठलीही संघटना अपूर्ण : सुमित्रा महाजनसुमित्रा महाजन यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच अयोध्या प्रकरणाच्या निर्णयाचे स्वागत केले. अखेर ‘रामलल्ला’ला स्वत:ची जागा मिळाली. याचे निश्चितच समाधान आहे. रामजन्मभूमीच्या एकूण लढ्यात महिलांचा मौलिक सहभाग होता. सामाजिक समरसतेशिवाय काहीच होऊ शकत नाही असे दत्तोपंत ठेंगडी मानायचे. त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविणेच त्यांना आदरांजली ठरेल. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत