शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून रामावर उपस्थित होतात प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 11:11 IST

आठ हजार वर्ष उलटून गेल्यानंतरदेखील भगवान श्रीरामाच्या अस्तित्वावर लोक प्रश्न उपस्थित करतात. याचे कारण म्हणजे समाजात आता रामासारखे लोक दिसून येत नाहीत.

ठळक मुद्देदत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी वर्षाला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आठ हजार वर्ष उलटून गेल्यानंतरदेखील भगवान श्रीरामाच्या अस्तित्वावर लोक प्रश्न उपस्थित करतात. याचे कारण म्हणजे समाजात आता रामासारखे लोक दिसून येत नाहीत. त्यामुळेच अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित होतात, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. भारतीय मजदूर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमादरम्यान ते रविवारी बोलत होते.रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला लोकसभेच्या माजी अध्यक्षा व दत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी समारोह समितीच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, सचिव वीरजेश उपाध्याय, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेढे प्रामुख्याने उपस्थित होते. दत्तोपंत ठेंगडी यांनी सामाजिक समरसतेचे स्वप्न दिले. त्यांनी दिलेले विचार आजदेखील तितकेच शाश्वत आहेत. बदलत्या काळात मूल्यांना कायम ठेवून विचारांची गती वाढविण्याची गरज आहे. दत्तोपंत ठेंगडी हे महान विचारक होते, परंतु विचारांच्या चौकटीत बंद नव्हते. त्यांच्यासारख्या महापुरुषांचे वचन व कर्म जनतेपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यांचे व्यक्तित्व, कृतित्व व नेतृत्व समाजात प्रबोधित केले पाहिजे, असे डॉ.मोहन भागवत म्हणाले. वीरजेश उपाध्याय यांनी प्रास्ताविक केले. अमर कुलकर्णी यांनी वैयक्तिक गीत सादर केले. तर अजय पत्की यांनी आभार मानले.

अयोध्या प्रकरणात चांगला निर्णय : जोशीअयोध्या प्रकरणात चांगला निर्णय झाला आहे. याचा लाभ सर्व देशाला मिळायला हवा. त्या आधारावर आता पुढे जायला हवे. मंदिर बांधण्यासंदर्भात ट्रस्ट पुढील प्रक्रिया ठरवेल असे डॉ.मुरली मनोहर जोशी म्हणाले. मथुरा आणि काशीसंदर्भात त्यांना विचारले असता तो मुद्दा आता कुणी उचलला आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

ज्योती कलश यात्रेचे स्वागतदत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी ज्योती कलश यात्रा रविवारी नागपुरात पोहोचली. आर्वीहून ही यात्रा निघाली होती. शिवाय ठेंगडी यांच्या जीवनप्रवासावर आधारित चित्रप्रदर्शनीचेदेखील उद्घाटन झाले. संस्कार भारतीतर्फे हे प्रदर्शन साकारण्यात आले.

नेतृत्व करणाऱ्यांनी उपदेश कृतीत आणावा‘टीमवर्क’ करत असताना नेतृत्व करणाऱ्यांनी सर्वांसोबत एकत्रितपणे राहून काम केले पाहिजे. विशेष म्हणजे त्यांनी ते स्वत: इतरांना देत असलेला उपदेश अगोदर कृतीत आणण्याची आवश्यकता असते. जसे बोलले तसेच वागले पाहिजे. शिवाय कर्तृत्ववान व्यक्ती जोडण्याकडे कल असला पाहिजे, असे मत सरसंघचालकांनी व्यक्त केले.

मातृशक्तीशिवाय कुठलीही संघटना अपूर्ण : सुमित्रा महाजनसुमित्रा महाजन यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच अयोध्या प्रकरणाच्या निर्णयाचे स्वागत केले. अखेर ‘रामलल्ला’ला स्वत:ची जागा मिळाली. याचे निश्चितच समाधान आहे. रामजन्मभूमीच्या एकूण लढ्यात महिलांचा मौलिक सहभाग होता. सामाजिक समरसतेशिवाय काहीच होऊ शकत नाही असे दत्तोपंत ठेंगडी मानायचे. त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविणेच त्यांना आदरांजली ठरेल. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत