शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

...म्हणून रामावर उपस्थित होतात प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 11:11 IST

आठ हजार वर्ष उलटून गेल्यानंतरदेखील भगवान श्रीरामाच्या अस्तित्वावर लोक प्रश्न उपस्थित करतात. याचे कारण म्हणजे समाजात आता रामासारखे लोक दिसून येत नाहीत.

ठळक मुद्देदत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी वर्षाला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आठ हजार वर्ष उलटून गेल्यानंतरदेखील भगवान श्रीरामाच्या अस्तित्वावर लोक प्रश्न उपस्थित करतात. याचे कारण म्हणजे समाजात आता रामासारखे लोक दिसून येत नाहीत. त्यामुळेच अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित होतात, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. भारतीय मजदूर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमादरम्यान ते रविवारी बोलत होते.रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला लोकसभेच्या माजी अध्यक्षा व दत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी समारोह समितीच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, सचिव वीरजेश उपाध्याय, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेढे प्रामुख्याने उपस्थित होते. दत्तोपंत ठेंगडी यांनी सामाजिक समरसतेचे स्वप्न दिले. त्यांनी दिलेले विचार आजदेखील तितकेच शाश्वत आहेत. बदलत्या काळात मूल्यांना कायम ठेवून विचारांची गती वाढविण्याची गरज आहे. दत्तोपंत ठेंगडी हे महान विचारक होते, परंतु विचारांच्या चौकटीत बंद नव्हते. त्यांच्यासारख्या महापुरुषांचे वचन व कर्म जनतेपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यांचे व्यक्तित्व, कृतित्व व नेतृत्व समाजात प्रबोधित केले पाहिजे, असे डॉ.मोहन भागवत म्हणाले. वीरजेश उपाध्याय यांनी प्रास्ताविक केले. अमर कुलकर्णी यांनी वैयक्तिक गीत सादर केले. तर अजय पत्की यांनी आभार मानले.

अयोध्या प्रकरणात चांगला निर्णय : जोशीअयोध्या प्रकरणात चांगला निर्णय झाला आहे. याचा लाभ सर्व देशाला मिळायला हवा. त्या आधारावर आता पुढे जायला हवे. मंदिर बांधण्यासंदर्भात ट्रस्ट पुढील प्रक्रिया ठरवेल असे डॉ.मुरली मनोहर जोशी म्हणाले. मथुरा आणि काशीसंदर्भात त्यांना विचारले असता तो मुद्दा आता कुणी उचलला आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

ज्योती कलश यात्रेचे स्वागतदत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी ज्योती कलश यात्रा रविवारी नागपुरात पोहोचली. आर्वीहून ही यात्रा निघाली होती. शिवाय ठेंगडी यांच्या जीवनप्रवासावर आधारित चित्रप्रदर्शनीचेदेखील उद्घाटन झाले. संस्कार भारतीतर्फे हे प्रदर्शन साकारण्यात आले.

नेतृत्व करणाऱ्यांनी उपदेश कृतीत आणावा‘टीमवर्क’ करत असताना नेतृत्व करणाऱ्यांनी सर्वांसोबत एकत्रितपणे राहून काम केले पाहिजे. विशेष म्हणजे त्यांनी ते स्वत: इतरांना देत असलेला उपदेश अगोदर कृतीत आणण्याची आवश्यकता असते. जसे बोलले तसेच वागले पाहिजे. शिवाय कर्तृत्ववान व्यक्ती जोडण्याकडे कल असला पाहिजे, असे मत सरसंघचालकांनी व्यक्त केले.

मातृशक्तीशिवाय कुठलीही संघटना अपूर्ण : सुमित्रा महाजनसुमित्रा महाजन यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच अयोध्या प्रकरणाच्या निर्णयाचे स्वागत केले. अखेर ‘रामलल्ला’ला स्वत:ची जागा मिळाली. याचे निश्चितच समाधान आहे. रामजन्मभूमीच्या एकूण लढ्यात महिलांचा मौलिक सहभाग होता. सामाजिक समरसतेशिवाय काहीच होऊ शकत नाही असे दत्तोपंत ठेंगडी मानायचे. त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविणेच त्यांना आदरांजली ठरेल. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत