शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

नागपुरातील व्यापाऱ्यांचे निर्बंधांविरोधात ‘थाली बजाव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:07 IST

नागपूर : राज्यातील व्यापारी संघटनांना विश्वासात न घेता ३० एप्रिलपर्यंत राज्य शासनाने लादलेल्या निर्बंधांमुळे व्यापाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत ...

नागपूर : राज्यातील व्यापारी संघटनांना विश्वासात न घेता ३० एप्रिलपर्यंत राज्य शासनाने लादलेल्या निर्बंधांमुळे व्यापाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. दुकाने सुरू करून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, तर अर्थव्यवस्थेला हातभारच लागणार आहे. राज्य शासनाने दुकाने सुरू करण्याचा आदेश देण्याच्या मागणीसाठी नागपुरातील सर्वच बाजारपेठांमध्ये व्यापाऱ्यांनी गुरुवारी ‘थाली बजाव-सरकार जगाव’ असे आगळेवेगळे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले.

हे आंदोलन सेंट्रल एव्हेन्यू मार्ग, गांजाखेत चौक, इतवारी सराफा बाजार चौक, इतवारी हार्डवेअर मार्केट, होलसेल क्लॉथ मार्केट नंगा पुतळा चौक, सीताबर्डी मेन रोड, धरमपेठ लक्ष्मीभुवन चौक या व्यापारी भागात करण्यात आले. यावेळी व्यापाऱ्यांनी आपापल्या बंद दुकानासमोर अर्धा तास थाळी वाजवून शासनाच्या निर्णयाचा निषेध केला.

ऑटोमोबाईल असोसिएशन नागपूर व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रिन्स तुली म्हणाले, लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांवर आर्थिक संकट आले आहे. व्यापाऱ्यांवर वीज बिल, बँकांचे कर्ज व व्याज, सरकारचा कर, कर्मचाऱ्यांचे पगार, आदींचा नियमित खर्च सुरू आहे. तो कसा पूर्ण करायचा याचे आव्हान आहे. रस्त्यावर गाड्या धावत आहेत. त्या गाड्यांना लागणाऱ्या सुट्या भागांची दुकाने बंद असतील तर गाड्या जागीच उभ्या राहतील. ट्रॅक्टर असो वा अ‍ॅम्ब्युलन्स यांनाही सुट्या भागांची गरज आहे. लॉकडाऊनमुळे सर्व साखळी तुटणार आहे. नागपूर ऑटोमोबाईलचे हब असल्याचा परिणाम संपूर्ण विदर्भावर होणार आहे. आंदोलनात योगेश अग्रवाल, धर्मेश मेहता, इशान बत्रा, राजीव झवेरी, सुनील चव्हाण, अभिषेक दोशी, बिट्टू अरोरा, राजू वासवानी यांच्यासह शेकडो व्यापारी उपस्थित होते.

नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया म्हणाले, गेल्यावर्षीपासून कधी केंद्र सरकार, राज्य सरकार तर कधी स्थानिक प्रशासन लॉकडाऊनच्या माध्यमातून व्यापाऱ्यांवर आर्थिक आघात करीत आहे. सरकार आर्थिक मदत करण्याऐवजी व्यापाऱ्यांवर मानसिक आणि आर्थिक दडपण टाकत आहे. सध्याचे लॉकडाऊन तब्बल २५ दिवसांचे आहे. दुकाने सुरू करण्याची सर्वच दुकानदारांची मागणी आहे; पण सरकार कुणाचेही ऐकत नाही. अशा स्थितीत सरकारला जाग यावी म्हणून गुरुवारी नागपुरातील सर्वच बाजारपेठांमध्ये थाली बजाव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला सर्व व्यापारी संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लॉकडाऊन लावताना सरकारने व्यापाऱ्यांवरील कर माफ करावे, शिवाय आर्थिक मदत द्यावी. राज्य शासनाने दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी.

याशिवाय सर्वच बाजारपेठांमध्ये सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शांततापूर्ण आंदोलने करण्यात आली. अशा प्रकारची आंदोलने रोज सुरू राहतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. गांधीबाग आणि इतवारी येथील बाजारपेठांमधील व्यापाऱ्यांनी थाली बजाव आंदोलन करून राज्य शासनाचे लक्ष वेधले.