शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

थॅलेसेमियाचे रुग्ण धोक्यात :  मेयोमध्ये औषधांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 01:09 IST

मेयोमध्ये थॅलेसेमियावरील औषधांचा तुटवडा पडला आहे. जिथे पंधरा दिवसांचे किंवा महिनाभराचे औषधे देणे आवश्यक असताना केवळ सात दिवसांचे औषधे दिले जात आहे.

ठळक मुद्देसातच दिवसांचे दिले जात आहे औषध

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मेयोमध्ये थॅलेसेमियावरील औषधांचा तुटवडा पडला आहे. जिथे पंधरा दिवसांचे किंवा महिनाभराचे औषधे देणे आवश्यक असताना केवळ सात दिवसांचे औषधे दिले जात आहे. इतर जिल्ह्याच्या ठिकाणाहून येणाऱ्या रुग्णांना याचा फटका बसत आहे. वारंवार चकरा माराव्या लागत असल्याने काही रुग्ण औषधांंशिवाय राहण्याची शक्यता आहे. अशा रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.आनुवंशिक अथवा काही ठराविक कारणांमुळे लहानपणापासून थॅलेसेमिया रोगाचा सामना करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यामध्ये बालरुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ठराविक कालावधीत ‘ब्लडट्रान्समिशन’, चाचण्या अशी उपचार पद्धती असणाऱ्या या रोगाला नियमितपणे औषधे देणेही गरजेचे आहे. औषधांविना रुग्णाच्या यकृताला सूज येण्याची भीती असते. त्यामुळे थॅलेसेमिया बाधित रुग्णाला डेफ्रिजिट किंवा डेसिरॉक्स किंवा असुनरा या गोळ्या घेणे अनिवार्य असते. मात्र या औषधी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयात उपलब्धच नाहीत. केवळ मेयो, मेडिकल व डागा रुग्णालयात उपलब्ध आहेत. यामुळे विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण येतात. परंतु मेयो येथे औषधांचा तुटवड्याचे कारण पुढे करून कमी औषध दिले जात असल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक अडचणीत आले आहेत.औषधांसाठी चकरा मारण्याची आली वेळगडचिरोली येथून औषधांसाठी मेयोमध्ये आलेले एका रुग्णाचे वडील म्हणाले, माझ्या १० वर्षाच्या मुलीला थॅलेसेमिया आहे. गडचिरोलीतील आरोग्य विभागाच्या रुग्णालयात थॅलेसेमियाचे औषध मिळत नाही. बाहेर ही औषध फार महागडी असल्याने विकत घेणे परडवत नाही. यामुळे नागपूरच्या मेडिकलमध्ये यावे लागते. यातही मुलीचे लोहाचे प्रमाण नेहमी वाढलेले असते. परिणामी, डॉक्टरांनी ४०० ग्रॅमचे ‘असुनरा’ हे औषध दोन वेळा घेण्यास सांगितले आहे. परंतु ४०० ग्रॅमच्या पंधराच गोळ्या मिळतात. हे औषध सातच दिवस पुरते. यामुळे आठवड्यातून एकदा यावे लागते. गडचिरोली-नागपूर प्रवासात मोठा पैसा खर्च होतो. शिवाय रुग्णाचे हालही होतात. गडचिरोलीतच ही सेवा उपलब्ध होणे आवश्यक आहे.महिन्याची औषधी मिळणे आवश्यकथॅलेसेमियाचे रुग्ण आधीच व्याधीने त्रस्त असतात. त्यात वारंवार रुग्णालयाच्या चकरा मारायला लावणे योग्य नाही. यामुळे १५ दिवसांचे किंवा सात दिवसांचे औषधे देण्यापेक्षा महिन्याभराचे एकत्र औषधे देणे आवश्यक आहे. यासाठी थॅलेसेमिया सोसायटी ऑफ सेंट्रल इंडियाकडून आरोग्य मंत्र्यांना पत्र पाठवून त्यांचे याकडे लक्ष वेधण्यात येईल.डॉ. विंकी रुघवानीअध्यक्ष, थॅलेसेमिया सोसायटी ऑफ सेंट्रल इंडिया

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)medicinesऔषधं