शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

थॅलेसेमियाचे रुग्ण धोक्यात :  मेयोमध्ये औषधांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 01:09 IST

मेयोमध्ये थॅलेसेमियावरील औषधांचा तुटवडा पडला आहे. जिथे पंधरा दिवसांचे किंवा महिनाभराचे औषधे देणे आवश्यक असताना केवळ सात दिवसांचे औषधे दिले जात आहे.

ठळक मुद्देसातच दिवसांचे दिले जात आहे औषध

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मेयोमध्ये थॅलेसेमियावरील औषधांचा तुटवडा पडला आहे. जिथे पंधरा दिवसांचे किंवा महिनाभराचे औषधे देणे आवश्यक असताना केवळ सात दिवसांचे औषधे दिले जात आहे. इतर जिल्ह्याच्या ठिकाणाहून येणाऱ्या रुग्णांना याचा फटका बसत आहे. वारंवार चकरा माराव्या लागत असल्याने काही रुग्ण औषधांंशिवाय राहण्याची शक्यता आहे. अशा रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.आनुवंशिक अथवा काही ठराविक कारणांमुळे लहानपणापासून थॅलेसेमिया रोगाचा सामना करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यामध्ये बालरुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ठराविक कालावधीत ‘ब्लडट्रान्समिशन’, चाचण्या अशी उपचार पद्धती असणाऱ्या या रोगाला नियमितपणे औषधे देणेही गरजेचे आहे. औषधांविना रुग्णाच्या यकृताला सूज येण्याची भीती असते. त्यामुळे थॅलेसेमिया बाधित रुग्णाला डेफ्रिजिट किंवा डेसिरॉक्स किंवा असुनरा या गोळ्या घेणे अनिवार्य असते. मात्र या औषधी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयात उपलब्धच नाहीत. केवळ मेयो, मेडिकल व डागा रुग्णालयात उपलब्ध आहेत. यामुळे विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण येतात. परंतु मेयो येथे औषधांचा तुटवड्याचे कारण पुढे करून कमी औषध दिले जात असल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक अडचणीत आले आहेत.औषधांसाठी चकरा मारण्याची आली वेळगडचिरोली येथून औषधांसाठी मेयोमध्ये आलेले एका रुग्णाचे वडील म्हणाले, माझ्या १० वर्षाच्या मुलीला थॅलेसेमिया आहे. गडचिरोलीतील आरोग्य विभागाच्या रुग्णालयात थॅलेसेमियाचे औषध मिळत नाही. बाहेर ही औषध फार महागडी असल्याने विकत घेणे परडवत नाही. यामुळे नागपूरच्या मेडिकलमध्ये यावे लागते. यातही मुलीचे लोहाचे प्रमाण नेहमी वाढलेले असते. परिणामी, डॉक्टरांनी ४०० ग्रॅमचे ‘असुनरा’ हे औषध दोन वेळा घेण्यास सांगितले आहे. परंतु ४०० ग्रॅमच्या पंधराच गोळ्या मिळतात. हे औषध सातच दिवस पुरते. यामुळे आठवड्यातून एकदा यावे लागते. गडचिरोली-नागपूर प्रवासात मोठा पैसा खर्च होतो. शिवाय रुग्णाचे हालही होतात. गडचिरोलीतच ही सेवा उपलब्ध होणे आवश्यक आहे.महिन्याची औषधी मिळणे आवश्यकथॅलेसेमियाचे रुग्ण आधीच व्याधीने त्रस्त असतात. त्यात वारंवार रुग्णालयाच्या चकरा मारायला लावणे योग्य नाही. यामुळे १५ दिवसांचे किंवा सात दिवसांचे औषधे देण्यापेक्षा महिन्याभराचे एकत्र औषधे देणे आवश्यक आहे. यासाठी थॅलेसेमिया सोसायटी ऑफ सेंट्रल इंडियाकडून आरोग्य मंत्र्यांना पत्र पाठवून त्यांचे याकडे लक्ष वेधण्यात येईल.डॉ. विंकी रुघवानीअध्यक्ष, थॅलेसेमिया सोसायटी ऑफ सेंट्रल इंडिया

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)medicinesऔषधं