शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

ठाकरे-मुत्तेमवार भाजपाचीच ‘बी टीम’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 21:02 IST

शहर काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद आणखी पेटला असून यासंबंधातील तक्रारी थेट ‘हायकमांड’पर्यंत गेल्या आहेत. माजी खासदार गेव्ह आवारी यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून माजी खासदार विलास मुत्तेमवार व शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्याविरोधात तक्रार केली आहे.

ठळक मुद्देगेव्ह आवारींनी केली काँग्रेस अध्यक्षांकडे तक्रारदोन्ही नेते पक्षविरोधी कारवाया करीत असल्याचा आरोप‘लेटरबॉम्ब’मुळे पक्षातील वाद आणखी वाढणार ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद आणखी पेटला असून यासंबंधातील तक्रारी थेट ‘हायकमांड’पर्यंत गेल्या आहेत. माजी खासदार गेव्ह आवारी यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून माजी खासदार विलास मुत्तेमवार व शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्याविरोधात तक्रार केली आहे. हे दोन्ही नेते पक्षविरोधी कारवाया करीत आहेत. ठाकरे व मुत्तेमवार हे काँग्रेसमध्ये राहून भाजपची ‘बी टीम’ म्हणून काम करीत असल्याचा आरोप लावत आवारी यांनी दोघांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी पत्राच्या माध्यमातून केली आहे.२०१४ पर्यंत नागपुरातून ‘सेक्यूलर’ उमेदवारच निवडून यायचे. मात्र विलास मुत्तेमवार हे नागपूरचे खासदार झाले आणि नंतर हे चित्र बदलले. ते अनेकवेळा निवडून आले, मात्र पक्षविरोधी कारवायादेखील सुरूच होत्या. यामुळेच २०१४ च्या निवडणुकांमध्ये ते २ लाख ८३ हजार मतांनी हरले. शहराध्यक्षांसोबत संगनमत करून त्यांनी कॉंग्रेस पक्षाशी निष्ठा राखणाºया आणि पात्र सदस्यांना बाहेरचा रस्ता दाखविला. पक्षात जवळच्या व्यक्तींना स्थान दिले. यामुळे मनपाच्या निवडणुकांत २००७ पासून २०१७ या कालावधीत सातत्याने तीन वेळा पराभवाचा सामना करावा लागला. २०१७ मध्ये तर मुत्तेमवार-ठाकरे यांच्या जोडीने अनेक सक्षम नगरसेवकांना तिकिटे नाकारत आपल्या वतीने ‘एबी फॉर्म्स’चे वाटप केले. याचा फटका दारुण पराभवाच्या रूपात बसला. एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर शहरात भाजपाचे एकहाती वर्चस्व आहे, असे गेव्ह आवारी यांनी पत्रात लिहिले आहे.मुत्तेमवार यांच्यामुळेच विधान परिषदेच्या जागेवर भाजपाला बिनविरोध विजय मिळविता आला. २०१७ च्या मनपा निवडणुकांनंतर मुत्तेमवार व ठाकरे यांनी आपल्या मर्जीतील व्यक्तीला मनपाच्या विरोधी पक्षनेतेपदावर बसविले. मात्र निवडून आलेल्या नगरसेवकांनी कायद्यानुसार जात आपला नेता निवडला. परंतु याविरोधात मुत्तेमवारांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. दोघांनीही पक्षविरोधी कारवायांचा कळसच गाठला आहे. यामुळे जनता व काँग्रेस सदस्यांमध्ये रोषाचे वातावरण आहे. पक्षाच्या अंतर्गत निवडणुका रद्द व्हाव्या यासाठीदेखील त्यांनी प्रयत्न केले. काँग्रेससाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी ही वेदनादायी बाब असून या दोघांवरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी गेव्ह आवारी यांनी केली. महाराष्ट्र राज्यासाठी पक्षाच्या शिस्तपालन समितीचा अध्यक्ष या नात्याने मी काय पावले उचलावी, याबाबत मार्गदर्शन करावे, अशी विनंतीदेखील त्यांनी राहुल गांधी यांना पत्रातून केली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर