शहरं
Join us  
Trending Stories
1
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
11
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
12
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
13
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
14
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
15
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
16
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
17
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
18
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
19
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
20
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे-मुत्तेमवार भाजपाचीच ‘बी टीम’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 21:02 IST

शहर काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद आणखी पेटला असून यासंबंधातील तक्रारी थेट ‘हायकमांड’पर्यंत गेल्या आहेत. माजी खासदार गेव्ह आवारी यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून माजी खासदार विलास मुत्तेमवार व शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्याविरोधात तक्रार केली आहे.

ठळक मुद्देगेव्ह आवारींनी केली काँग्रेस अध्यक्षांकडे तक्रारदोन्ही नेते पक्षविरोधी कारवाया करीत असल्याचा आरोप‘लेटरबॉम्ब’मुळे पक्षातील वाद आणखी वाढणार ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद आणखी पेटला असून यासंबंधातील तक्रारी थेट ‘हायकमांड’पर्यंत गेल्या आहेत. माजी खासदार गेव्ह आवारी यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून माजी खासदार विलास मुत्तेमवार व शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्याविरोधात तक्रार केली आहे. हे दोन्ही नेते पक्षविरोधी कारवाया करीत आहेत. ठाकरे व मुत्तेमवार हे काँग्रेसमध्ये राहून भाजपची ‘बी टीम’ म्हणून काम करीत असल्याचा आरोप लावत आवारी यांनी दोघांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी पत्राच्या माध्यमातून केली आहे.२०१४ पर्यंत नागपुरातून ‘सेक्यूलर’ उमेदवारच निवडून यायचे. मात्र विलास मुत्तेमवार हे नागपूरचे खासदार झाले आणि नंतर हे चित्र बदलले. ते अनेकवेळा निवडून आले, मात्र पक्षविरोधी कारवायादेखील सुरूच होत्या. यामुळेच २०१४ च्या निवडणुकांमध्ये ते २ लाख ८३ हजार मतांनी हरले. शहराध्यक्षांसोबत संगनमत करून त्यांनी कॉंग्रेस पक्षाशी निष्ठा राखणाºया आणि पात्र सदस्यांना बाहेरचा रस्ता दाखविला. पक्षात जवळच्या व्यक्तींना स्थान दिले. यामुळे मनपाच्या निवडणुकांत २००७ पासून २०१७ या कालावधीत सातत्याने तीन वेळा पराभवाचा सामना करावा लागला. २०१७ मध्ये तर मुत्तेमवार-ठाकरे यांच्या जोडीने अनेक सक्षम नगरसेवकांना तिकिटे नाकारत आपल्या वतीने ‘एबी फॉर्म्स’चे वाटप केले. याचा फटका दारुण पराभवाच्या रूपात बसला. एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर शहरात भाजपाचे एकहाती वर्चस्व आहे, असे गेव्ह आवारी यांनी पत्रात लिहिले आहे.मुत्तेमवार यांच्यामुळेच विधान परिषदेच्या जागेवर भाजपाला बिनविरोध विजय मिळविता आला. २०१७ च्या मनपा निवडणुकांनंतर मुत्तेमवार व ठाकरे यांनी आपल्या मर्जीतील व्यक्तीला मनपाच्या विरोधी पक्षनेतेपदावर बसविले. मात्र निवडून आलेल्या नगरसेवकांनी कायद्यानुसार जात आपला नेता निवडला. परंतु याविरोधात मुत्तेमवारांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. दोघांनीही पक्षविरोधी कारवायांचा कळसच गाठला आहे. यामुळे जनता व काँग्रेस सदस्यांमध्ये रोषाचे वातावरण आहे. पक्षाच्या अंतर्गत निवडणुका रद्द व्हाव्या यासाठीदेखील त्यांनी प्रयत्न केले. काँग्रेससाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी ही वेदनादायी बाब असून या दोघांवरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी गेव्ह आवारी यांनी केली. महाराष्ट्र राज्यासाठी पक्षाच्या शिस्तपालन समितीचा अध्यक्ष या नात्याने मी काय पावले उचलावी, याबाबत मार्गदर्शन करावे, अशी विनंतीदेखील त्यांनी राहुल गांधी यांना पत्रातून केली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर