शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

ठाकरे एकत्र येतील तेव्हा येतील, आंबेडकरी पक्षांचे ऐक्य आवश्यक

By योगेश पांडे | Updated: April 21, 2025 15:21 IST

रामदास आठवले यांची भूमिका : उद्धव-राज ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडी तुटेल

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभरात शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या एकत्रित येण्याबाबत विविध कयास वर्तविण्यात येत असताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आंबेडकरी ऐक्याची भूमिका मांडली आहे. ठाकरे एकत्र येतील तेव्हा येतील, मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आंबेडकरी पक्षांचे ऐक्य आवश्यक आहे. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सकारात्मक पुढाकार घ्यावा असे आवाहन आठवले यांनी केले आहे. सोमवारी त्यांनी ‘लोकमत’ला सदिच्छा भेट देत संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा करत विविध विषयांवर मत मांडले.

देशात केवळ दोनच पक्ष असावेत अशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती. मात्र आंबेडकरी पक्ष जास्त काळ एकत्रित राहू शकले नाहीत. आरपीआयमध्येदेखील फूट पडली व बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. मात्र आता आंबेडकरी ऐक्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. प्रकाश आंबेडकर यांनी नेतृत्व स्वीकारले तर सर्व आंबेडकरी पक्ष एकत्रित येऊ शकतात. माझा त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. मात्र आंबेडकरांकडून अद्याप हवी तशी साथ मिळालेली नाही. स्वबळावरच लढण्याची त्यांची भूमिका आहे. त्यांनी खरे तर बाबासाहेबांच्या विचारातून समोर आलेला पक्षच चालविला पाहिजे, असे आठवले म्हणाले.

तर महाविकासआघाडीतून उद्धव दूर होतीलउद्धव ठाकरेराज ठाकरे सोबत यावे अशी माझीदेखील इच्छा आहे. ते सोबत आले तर महाविकास आघाडीत निश्चित फूट पडेल. महाविकासआघाडी कधीही राज ठाकरे यांना सोबत घेणार नाही. त्याचा फटका मविआला बसेल. मात्र कुणीही एकत्रित आले तरी महायुतीवर कुठलाही परिणाम होणार नाही, असा दावा रामदास आठवले यांनी केला.

बौद्धगयेसाठी पंतप्रधानांना भेटणारबौद्धगया येथील महाबोधी महाविहारचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात दिले पाहिजे. त्यासाठी महाबोधी टेम्पल ऍक्ट १९४९ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी व्यापक आंदोलन सुरू आहे. याचा तोडगा निघावा यासाठी माझा प्रयत्न सुरू असून मी पंतप्रधानांना भेटणार आहे, असे आठवले यांनी सांगितले.

आम्हाला मतदारसंघच तयार करता आले नाहीतमी ज्यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते व मलादेखील त्यामुळे सत्तेत राहता येते. माझा स्वभाव ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासारखा नसल्यामुळे अनेकदा हक्काच्या गोष्टीदेखील आम्ही मिळवू शकत नाही. राजकीयदृष्ट्या पक्षाला हवी तशी मजबूती मिळाली नाही, कारण मतांच्या राजकारणात प्रभाव दाखवू शकलेलो नाही. पक्षासाठी समर्पित कार्यकर्ते असले तरी आम्हाला तगडे मतदारसंघ तयार करता आले नाही अशी खंत यावेळी आठवले यांनी बोलून दाखविली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेRamdas Athawaleरामदास आठवलेnagpurनागपूर