शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

परप्रांतात दहावी झालेले एमबीबीएसच्या प्रवेशातून बाद; शेकडाे पात्र विद्यार्थ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 8:13 PM

Nagpur News २०१७ नंतर परप्रांतातून दहावी झालेल्या विद्यार्थ्यांना एमबीबीएससह वैद्यकीय शाखेतील अभ्यासक्रमात प्रवेश घेता येणार नाही, या निर्णयाचा शेकडाे विद्यार्थ्यांना फटका बसत आहे.

नागपूर : २०१७ नंतर परप्रांतातून दहावी झालेल्या विद्यार्थ्यांना एमबीबीएससह वैद्यकीय शाखेतील अभ्यासक्रमात प्रवेश घेता येणार नाही, या निर्णयाचा शेकडाे विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. तत्कालीन फडणवीस सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना एमबीबीएसच्या प्रवेशापासून वंचित राहावे लागणार असून त्यांचे शैक्षणिक भविष्य अंधकारमय हाेण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते राजानंद कावळे यांनी राज्याचे वैद्यकीय व उच्च शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना पत्र पाठवून फडणवीस सरकारच्या निर्णयात सुधारणा करून ‘नीट’ प्रवेशातील ही अट तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. या निर्णयामुळे एमबीबीएससह नर्सिंग प्रवेशाच्या ८५ टक्के कोट्याअंतर्गत विद्यार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असला तरी दहावी २०१७ नंतर परप्रांतात झाल्यास त्याला प्रवेश नाकारण्यात येत आहे़ विशेष म्हणजे, शेजारील कुठल्याही राज्यात अशाप्रकारची अट नाही़ मग, राज्यासाठी इतका गुंतागुंतीचा नियम का, असा सवालही पालकवर्गात आहे़ याउलट, सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मुलांना पूर्णत: सूट देण्यात आली आहे. गुणवत्ता व पात्रता असतानाही तत्कालीन सरकारच्या एका अटीमुळे शेकडो विद्यार्थी डॉक्टर होण्यापासून वंचित हाेतील. २०१७ नंतर दहावी परप्रांतात व १२ वी आणि पुढील शिक्षण महाराष्ट्रात झाल्यास एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीयूएमएस आणि बीएचएमएस आदी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणार नसल्याची अट आहे. विद्यार्थ्यांना ‘नीट’साठी ऑनलाइन अर्ज भरताना या कॉलममध्ये क्लिक केल्यास हा अर्जच पुढे सरकत नाही. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय असल्याचे पालकांचे म्हणणे आहे़ महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असताना काहींचे शिक्षण अडचणीमुळे परप्रांतात तर काही पालक खासगी नोकरीत असल्याने कुटुंबासह तिथे स्थायिक व्हावे लागते़ त्यामुळे शिक्षणही तिथेच होते़ त्यानंतर परत अशी कुटुंबे महाराष्ट्रात येतात़ मात्र, वैद्यकीय शिक्षण त्यांच्या पाल्यांना घ्यायचे झाल्यास या जाचक अटीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे सरकारने ही अट ‘नीट’ अर्जातून काढून टाकावी, अशी मागणी पालकांची आहे.

‘नीट’ परीक्षेचे राउंड लवकरच सुरू होतील़ अशावेळी पात्र विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून राज्याचे वैद्यकीय व उच्च शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी लक्ष घालावे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनाही सविस्तर निवेदन ऑनलाइन पाठविले आहे. येत्या आठवड्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयीचा धोरणात्मक निर्णय घ्यावा.

- राजानंद कावळे, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :NEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालEducation Sectorशिक्षण क्षेत्र