शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
3
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
4
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
5
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
6
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
7
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
8
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
9
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
10
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
11
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
12
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
13
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
14
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
15
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
16
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
17
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
18
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
19
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
20
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर

नागपुरातील कॉंग्रेसच्या संकल्प मेळाव्यात खदखदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 00:05 IST

लोकसभा निवडणुकांच्या अपयशातून कार्यकर्ते बाहेर पडावे व विधानसभेच्या निवडणुकांसाठी नव्याने सुरुवात व्हावी यासाठी नागपूर शहर कॉंग्रेस कमिटीतर्फे संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या मेळाव्यात नवीन दमाने लढण्यासाठी संकल्पाऐवजी कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यातील खदखदच जास्त प्रमाणात समोर आली. विविध नेत्यांनी भाषणातून आपल्या मनातील नाराजी मांडलीच, मात्र कार्यकर्त्यांनीदेखील उघडपणे आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना बोलून दाखविली.

ठळक मुद्देपदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मांडली नाराजी : मतभेदांसोबतच मनभेददेखील दिसले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकांच्या अपयशातून कार्यकर्ते बाहेर पडावे व विधानसभेच्या निवडणुकांसाठी नव्याने सुरुवात व्हावी यासाठी नागपूर शहर कॉंग्रेस कमिटीतर्फे संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या मेळाव्यात नवीन दमाने लढण्यासाठी संकल्पाऐवजी कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यातील खदखदच जास्त प्रमाणात समोर आली. विविध नेत्यांनी भाषणातून आपल्या मनातील नाराजी मांडलीच, मात्र कार्यकर्त्यांनीदेखील उघडपणे आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना बोलून दाखविली. 

सिव्हील लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृह येथे मंगळवारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळावा सुरू झाल्यानंतरदेखील सभागृहातील ३० ते ४० टक्के खुर्च्या रिकाम्या होत्या. भाषण करताना बऱ्याच नेत्यांनी निवडणूक काळात कॉंग्रेसच्या प्रचार प्रणालीतील त्रुटींवर बोट ठेवले. माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांनी तर पूर्व नागपुरातील एका ब्लॉक अध्यक्षाने बूथ कार्यकर्त्यांच्या निधीमध्येच गडबड केल्याचा आरोप केला. यात त्यांनी कुणाचेही नाव घेतले नाही. मात्र पूर्व नागपुरातच काम पाहणाऱ्या एका महिला ब्लॉक अध्यक्षाने आक्रमक पवित्रा घेतला. हुसेन यांचे भाषण सुरू असतानाच ही महिला कार्यकर्त्यांमधून उठून संतापानेच थेट मंचावरच गेली व हुसेन यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. हुसेन यांनीदेखील आक्रमक पवित्रा घेतला. अखेर शहराध्यक्ष विकास ठाकरे यांना हस्तक्षेप करावा लागला. मात्र यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता प्रामुख्याने दिसून आली. 
या मेळाव्याला कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे, नागपूर लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार नाना पटोले, रामटेक लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार किशोर गजभिये, माजी खासदार विलास मुत्तेमवार, प्रदेश महासचिव डॉ.बबन तायवाडे, प्रदेश सचिव अतुल कोटेचा, उमाकांत अग्निहोत्री, माजी शहराध्यक्ष शेख हुसैन, अ‍ॅड. अभिजित वंजारी, गिरीश पांडव प्रामुख्याने उपस्थित होते.तिकीट देताना कार्यकर्त्यांना विचारता का ?उमाकांत अग्निहोत्री आपले मत मांडत असताना पक्ष ज्यांना तिकीट देईल त्यांच्या पाठीशी सर्व उभे राहू, असे प्रतिपादन केले. यावेळी सभागृहातील काही कार्यकर्ते उभे झाले. निवडणूकांमध्ये नेत्यांना तिकीट देत असताना कार्यकर्त्यांना विचारता का, असा संतप्त सवाल केला. इतर कार्यकर्त्यांनीदेखील हा मुद्दा उचलून धरला. अखेर अग्निहोत्री यांनी मिनीटभरातच आपले बोलणे आवरते घेतले.वंजारी आक्रमक, स्वपक्षीयांवरच टीकास्त्रअभिजित वंजारी यावेळी आक्रमक पवित्र्यात दिसून आले. कॉंग्रेस पक्षात बाहेरील लोकांना कुठलाही ‘स्कोप’ नाही हे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी कार्यकर्त्यांना नेहमी गुलाम म्हणूनच वागणूक दिली आहे. त्यांनी केवळ आपलीच घरे भरली. अशा नेत्यांपासून पक्षाला वाचविले पाहिजे. स्थानिक नेत्यांमुळेच कॉंग्रेस बुडाली असा आरोप करत कुणाचेही नाव न घेता ‘टोपीबाज’ नेत्यांपासून पक्षाला मुक्त करा, अशी भावना त्यांनी मांडली.शेळकेंची नेत्यांवर अप्रत्यक्ष टीकामेळाव्यामध्ये नगरसेवक बंटी शेळके यांना बोलू द्या, अशी मागणी करत युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आरडाओरड सुरू केली. अखेर नाना पटोले यांच्याऐवजी शेळकेंना बोलण्याची संधी देण्यात आली. लोकसभा निवडणुकीत नेत्यांमुळे नव्हे तरुण कार्यकर्त्यांमुळे मतं मिळाली. कॉंग्रेसचे नेते तरुण कार्यकर्त्यांकडे नेहमीच दुर्लक्ष करतात. शहरातील सर्व ‘बूथ’वरून एक जण गृहित धरला तरी मेळाव्याला हजारहून अधिक जण सहज येऊ शकले असते. मात्र रिकाम्या खुर्च्या बरंच काही सांगत आहेत, असे म्हणत त्यांनी पक्षातीलच नेत्यांना चिमटा काढला. नगरसेवक मनोज सांगोळे हेदेखील भाषणासाठी उभे झाले. माझे भाषण फारसे चांगले नाही, त्यामुळे नाराज झाले तर बूट मारू नका, अशी विनंतीच त्यांनी कार्यकर्त्यांना केली.संकल्प मेळाव्यातदेखील दुफळीलोकसभा निवडणुकांनंतर कॉंग्रेसचे नेते मतभेद विसरून एकत्र येतील अशी अपेक्षा होती. मात्र या संकल्प मेळाव्याला नुकताच कॉंग्रेस कमेटीच्या ‘एससी सेल’चा राजीनामा दिलेले नितीन राऊत, अनिस अहमद, गेव्ह आवारी इत्यादी नेते अनुपस्थित होते.पटोले, गजभिये करणार याचिकादरम्यान, रामटेक लोकसभा मतदारसंघात आपला विजयच झाल्याचा दावा, किशोर गजभिये यांनी केला. ‘ईव्हीएम’च्या घोळामुळे तांत्रिक पराभव झाला आहे. यासंदर्भात न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करणार असल्याची माहिती गजभिये व नाना पटोले यांनी दिली.आंदोलनासाठी तयार रहायावेळी विकास ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याची सूचना केली. प्रशासन व सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा व आंदोलनांसाठी सज्ज रहा असे ते म्हणाले. निवडणुकांसाठी सर्वांंनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांत मतभेद असले तर चालतील पण मनभेद नको. सर्वांनी कार्यकर्त्यांचा सन्मान केला पाहिजे, असे आवाहन डॉ.बबन तायवाडे यांनी केले. लोकसभेसाठी कार्यकर्त्यांनी मेहनत केली मात्र त्याला यश आले नाही. विधानसभेसाठी तरुण उमेदवारांना तिकीट दिले पाहिजे, असे प्रतिपादन अतुल कोटेचा यांनी केले.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर