शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

उष्ण हवेमुळे तापले नागपूर : तापमान ४५.२ अंश सेल्सिअसवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 23:40 IST

कडक उन्हामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. शुक्रवारी या मोसमातील नागपूरचे तापमान पहिल्यांदाच ४५.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले. दुसरीकडे पुढील पाच दिवस अशीच भीषण गर्मी राहणार आहे.

ठळक मुद्देपाच दिवस दिलासा नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कडक उन्हामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. शुक्रवारी या मोसमातील नागपूरचे तापमान पहिल्यांदाच ४५.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले. दुसरीकडे पुढील पाच दिवस अशीच भीषण गर्मी राहणार आहे. हवामान विभागाने अगोदरच याचा अंदाज वर्तवित इशारा दिलेला आहे. शहरात शुक्रवारी सकाळपासूनच उन तापू लागले आहे. तर दुपारी उष्ण हवेच्या वाऱ्यामुळे त्रास आणखीनच वाढला आहे. सायंकाळनंतरही उष्ण वारे वाहत आहे.सकाळी ८.३० वाजता आर्द्रता ३९ टक्के होती. यातूनच उन्ह किती कडक असेल याचा अंदाज लावता येतो. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत नागपुरात ही आर्द्रता कमी होऊन १४ टक्के राहिली आहे. आर्द्रता कमी झाल्याने उन लागण्याची शक्यता वाडते. यामुळे शरीरातील पाण्याचा स्तर कमी होतो. नागपूरसह संपूर्ण विदर्भातच भीषण गर्मी आहे. अकोला ४६.४ डिग्रीसह राज्यभरात सर्वात गरम राहिले ब्रह्मपुरी (४५.८), वर्धा (४५.७), चंद्रपूर (४५.६), अमरावती (४५.४) येथे तापमान सरासरी पेक्षा तीन ते चार अंश सेल्सिअस जास्त राहिले. तर यवतमाळमध्ये ४४.५, वाशिममध्ये ४४.२, गोंदिया ४३.८, गडचिरोलीमध्ये ४३.२ व बुलडाणामध्ये ४३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.ऑरेंज अलर्टवर विदर्भातील सहा जिल्हे३० एप्रिलपर्यंत विदर्भातील सहा जिल्ह्यात भीषण उन पडणार आहे. यात नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, वाशीम व यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश आहे. याला आॅरेंज अलर्ट असे म्हटले आहे. या दरम्यान तापमान सामान्यपेक्षा ३ ते ५ अंश सेल्सिअस अधिक राहील. या काळात आर्द्रता २० टक्के पेक्षा खाली राहील. उन्हाच्या थेट संपर्कात आल्याने बेशुद्ध होणे, उलटी येणे, ताप आदी होऊ शकतो. त्यामुळे दुपारी १२ ते ४.३० या कालावधीत घराबाहेर पडणे टाळावे.असे वाढले तापमानदिनांक तापमान (अंश सेल्सिअस)२१ एप्रिल ३९.५२२ एप्रिल ४१.४२३ एप्रिल ४२.५२४ एप्रिल ४३.४२५ एप्रिल ४४.३२६ एप्रिल ४५.२

टॅग्स :Heat Strokeउष्माघातnagpurनागपूर