शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

भारतात एवढे तापमान वाढेल, की जगणे हाेईल मुश्कील; वर्ल्ड बँकेचा अतिगंभीर अहवाल  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2022 13:37 IST

३८ कोटी लाेक हाेतील प्रभावित

निशांत वानखेडे

नागपूर : जागतिक तापमान वाढीच्या अनुषंगाने जागतिक बँकेने नुकताच जाहीर केलेला अहवाल भारतभारतीय उपखंडातील देशांसाठी गंभीर धाेक्याचा इशारा देणारा आहे. येत्या काही वर्षांत किंवा २०३० नंतरच भारतात वारंवार आणि अधिक काळ टिकणाऱ्या उष्णतेच्या लाटा येतील. सहन करण्याच्या पलीकडे तापमान वाढेल, की लाेकांचे जगणे मुश्कील हाेईल. थेट उन्हाच्या संपर्कात येणारे लाखाे लाेक यामुळे प्रभावित हाेतील आणि देशाला काेट्यवधी डाॅलरचे नुकसान सहन करावे लागेल.

‘भारताच्या कूलिंग सेक्टरमध्ये हवामान गुंतवणूक संधी’ असे शीर्षक असलेल्या जागतिक बँकेच्या अहवालात उष्णतेची तीव्रता जगण्याच्या मर्यादेपलीकडे वाढणारे भारत हे पहिले ठिकाण ठरेल, असा धाेका अधाेरेखित केला आहे. केरळ सरकारच्या भागीदारीत जागतिक बँकेने आयोजित केलेल्या दोन दिवसीय ‘इंडिया क्लायमेट अँड डेव्हलपमेंट पार्टनर्स मीट’ दरम्यान हा अहवाल जारी केला जाईल.

विशेष म्हणजे ‘इंटर गव्हर्न्मेंट पॅनेल ऑन क्लायमेट चेंज’ (आयपीसीसी) ने ऑगस्ट २०२१ मध्ये सहाव्या मूल्यांकन अहवालात हा धाेका अधाेरेखित करून येत्या दशकात भारतात अतितीव्र उष्ण लाटांची वारंवारता वाढण्याची भीती नमूद केली हाेती. जी-२० क्लायमेट रिस्क ॲटलसने कार्बन उत्सर्जनाचा स्तर असाच अधिक राहिल्यास २०३६ पासून भारतात उष्णतेच्या लाटा २५ पट अधिक काळ टिकून राहतील, असे म्हटले आहे. दक्षिण आशियातील तापमानवाढीच्या संदर्भात बऱ्याच हवामान शास्त्रज्ञांनीही सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.

अहवालात नमूद असलेल्या गंभीर बाबी

  • येत्या दशकात भारतीय उपखंडातील तापमान वाढ सहन करण्याच्या मर्यादेच्या पलीकडे असेल.
  • भारतात ३८ कोटी लाेक म्हणजे ७५ टक्के मनुष्यबळ थेट उन्हाच्या संपर्कात येणारी नाेकरी करतात. त्यांच्यावर प्रभाव पडणार आहे.
  • २०३० नंतर उष्णतेच्या कारणाने भारतातील ८ कोटी जागतिक नाेकऱ्यांपैकी ३.४ कोटी नाेकऱ्यांवर प्रभाव पडेल. त्याचा थेट परिणाम उत्पादकतेवर हाेईल.
  • दक्षिण आशियायी देशातील जड श्रमांवर उष्णतेचा प्रभाव पडताे व यामुळे दरवर्षी १०१ अब्ज तासांपेक्षा अधिक वेळ वाया जाताे.
  • मॅकिन्से ॲन्ड कंपनी या जागतिक व्यवस्थापन संस्थेच्या अहवालानुसार येत्या दशकाच्या अखेरपर्यंत वाढत्या उष्णतेच्या प्रभावाने गमावलेल्या श्रमांमुळे भारताच्या जीडीपीच्या ४.५ टक्के अंदाजे १५० ते २५० अब्ज अमेरिकन डाॅलरचे नुकसान हाेण्याचा धाेका आहे.
  • भारताची अन्न सुरक्षा व सार्वजनिक आराेग्य सुविधा कोल्ड चेन नेटवर्कवर अवलंबून असेल. तापमान वाढीमुळे शीतसाखळी खंडित हाेऊन ताज्या अन्न उत्पादनाचे १३ अब्ज डाॅलरपेक्षा अधिकचे नुकसान हाेईल.
  • भारताने तापमान-संवेदनशील वैद्यकीय उत्पादने आणि २५ टक्के लस शीतसाखळी खंडित झाल्याने गमावल्या व यामुळे ३१.३ कोटी डॉलर्सचे नुकसान झाले.
  • भारतातील केवळ ८ टक्के कुटुंबांकडे एअर कंडिशनिंग युनिट्स आहेत. ४० टक्के कुटुंबाकडे पंखे, कूलरसारखे उपकरण आहे.
  • अनेक गरीब आणि उपेक्षित लाेक अपर्याप्त कूलिंग सुविधा, गरम आणि गर्दीच्या घरात राहतात. अति उष्णतेच्या लाटांमध्ये त्यांची सुरक्षा धाेक्यात येईल.

विदर्भातील अनेक शहरे यावर्षी जागतिक क्रमवारीत

याच वर्षी भारताने तीव्र उष्णतेच्या लाटा सहन केल्या आहेत. विदर्भातीलच अनेक शहरांचे तापमान जागतिक क्रमवारीत पहिल्या दहामध्ये आले हाेते. नागपूर आणि राजधानी दिल्लीचे तापमान ४६ अंशांवर गेले हाेते. यावर्षी पुराने महाराष्ट्रासह देशभरात थैमान घातले, ज्यामध्ये हजाराे लाेकांनी प्राण गमावले व लाखाे विस्थापित झाले. काेट्यवधी रुपयांचे नुकसानही झाले.

टॅग्स :environmentपर्यावरणTemperatureतापमानVidarbhaविदर्भIndiaभारत