शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भारतात एवढे तापमान वाढेल, की जगणे हाेईल मुश्कील; वर्ल्ड बँकेचा अतिगंभीर अहवाल  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2022 13:37 IST

३८ कोटी लाेक हाेतील प्रभावित

निशांत वानखेडे

नागपूर : जागतिक तापमान वाढीच्या अनुषंगाने जागतिक बँकेने नुकताच जाहीर केलेला अहवाल भारतभारतीय उपखंडातील देशांसाठी गंभीर धाेक्याचा इशारा देणारा आहे. येत्या काही वर्षांत किंवा २०३० नंतरच भारतात वारंवार आणि अधिक काळ टिकणाऱ्या उष्णतेच्या लाटा येतील. सहन करण्याच्या पलीकडे तापमान वाढेल, की लाेकांचे जगणे मुश्कील हाेईल. थेट उन्हाच्या संपर्कात येणारे लाखाे लाेक यामुळे प्रभावित हाेतील आणि देशाला काेट्यवधी डाॅलरचे नुकसान सहन करावे लागेल.

‘भारताच्या कूलिंग सेक्टरमध्ये हवामान गुंतवणूक संधी’ असे शीर्षक असलेल्या जागतिक बँकेच्या अहवालात उष्णतेची तीव्रता जगण्याच्या मर्यादेपलीकडे वाढणारे भारत हे पहिले ठिकाण ठरेल, असा धाेका अधाेरेखित केला आहे. केरळ सरकारच्या भागीदारीत जागतिक बँकेने आयोजित केलेल्या दोन दिवसीय ‘इंडिया क्लायमेट अँड डेव्हलपमेंट पार्टनर्स मीट’ दरम्यान हा अहवाल जारी केला जाईल.

विशेष म्हणजे ‘इंटर गव्हर्न्मेंट पॅनेल ऑन क्लायमेट चेंज’ (आयपीसीसी) ने ऑगस्ट २०२१ मध्ये सहाव्या मूल्यांकन अहवालात हा धाेका अधाेरेखित करून येत्या दशकात भारतात अतितीव्र उष्ण लाटांची वारंवारता वाढण्याची भीती नमूद केली हाेती. जी-२० क्लायमेट रिस्क ॲटलसने कार्बन उत्सर्जनाचा स्तर असाच अधिक राहिल्यास २०३६ पासून भारतात उष्णतेच्या लाटा २५ पट अधिक काळ टिकून राहतील, असे म्हटले आहे. दक्षिण आशियातील तापमानवाढीच्या संदर्भात बऱ्याच हवामान शास्त्रज्ञांनीही सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.

अहवालात नमूद असलेल्या गंभीर बाबी

  • येत्या दशकात भारतीय उपखंडातील तापमान वाढ सहन करण्याच्या मर्यादेच्या पलीकडे असेल.
  • भारतात ३८ कोटी लाेक म्हणजे ७५ टक्के मनुष्यबळ थेट उन्हाच्या संपर्कात येणारी नाेकरी करतात. त्यांच्यावर प्रभाव पडणार आहे.
  • २०३० नंतर उष्णतेच्या कारणाने भारतातील ८ कोटी जागतिक नाेकऱ्यांपैकी ३.४ कोटी नाेकऱ्यांवर प्रभाव पडेल. त्याचा थेट परिणाम उत्पादकतेवर हाेईल.
  • दक्षिण आशियायी देशातील जड श्रमांवर उष्णतेचा प्रभाव पडताे व यामुळे दरवर्षी १०१ अब्ज तासांपेक्षा अधिक वेळ वाया जाताे.
  • मॅकिन्से ॲन्ड कंपनी या जागतिक व्यवस्थापन संस्थेच्या अहवालानुसार येत्या दशकाच्या अखेरपर्यंत वाढत्या उष्णतेच्या प्रभावाने गमावलेल्या श्रमांमुळे भारताच्या जीडीपीच्या ४.५ टक्के अंदाजे १५० ते २५० अब्ज अमेरिकन डाॅलरचे नुकसान हाेण्याचा धाेका आहे.
  • भारताची अन्न सुरक्षा व सार्वजनिक आराेग्य सुविधा कोल्ड चेन नेटवर्कवर अवलंबून असेल. तापमान वाढीमुळे शीतसाखळी खंडित हाेऊन ताज्या अन्न उत्पादनाचे १३ अब्ज डाॅलरपेक्षा अधिकचे नुकसान हाेईल.
  • भारताने तापमान-संवेदनशील वैद्यकीय उत्पादने आणि २५ टक्के लस शीतसाखळी खंडित झाल्याने गमावल्या व यामुळे ३१.३ कोटी डॉलर्सचे नुकसान झाले.
  • भारतातील केवळ ८ टक्के कुटुंबांकडे एअर कंडिशनिंग युनिट्स आहेत. ४० टक्के कुटुंबाकडे पंखे, कूलरसारखे उपकरण आहे.
  • अनेक गरीब आणि उपेक्षित लाेक अपर्याप्त कूलिंग सुविधा, गरम आणि गर्दीच्या घरात राहतात. अति उष्णतेच्या लाटांमध्ये त्यांची सुरक्षा धाेक्यात येईल.

विदर्भातील अनेक शहरे यावर्षी जागतिक क्रमवारीत

याच वर्षी भारताने तीव्र उष्णतेच्या लाटा सहन केल्या आहेत. विदर्भातीलच अनेक शहरांचे तापमान जागतिक क्रमवारीत पहिल्या दहामध्ये आले हाेते. नागपूर आणि राजधानी दिल्लीचे तापमान ४६ अंशांवर गेले हाेते. यावर्षी पुराने महाराष्ट्रासह देशभरात थैमान घातले, ज्यामध्ये हजाराे लाेकांनी प्राण गमावले व लाखाे विस्थापित झाले. काेट्यवधी रुपयांचे नुकसानही झाले.

टॅग्स :environmentपर्यावरणTemperatureतापमानVidarbhaविदर्भIndiaभारत