शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

सांगा आम्ही खेळायचे कसे? नागपुरातील बालगोपालांचा मनपाला सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 10:25 AM

उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. शहरातील उद्यानात मौैजमजा करण्याचा आग्रह बच्चे कंपनी पालकांकडे करीत आहे. मात्र शहरातील उद्यानांची अवस्था बघता ‘सांगा खेळायचे कसे ?’ असा प्रश्न बच्चे कंपनीकडून मनपाला केला जात आहे.

ठळक मुद्देघसरगुंडी तुटलेली, उद्यानाचीही दुर्दशामहापालिका प्रशासनाचे दुर्लक्षदेखभालीअभावी प्रचंड दुरवस्थाहिरवळ गायब आणि शौचालयाची दुर्गंधी

मंगेश व्यवहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. शहरातील उद्यानात मौैजमजा करण्याचा आग्रह बच्चे कंपनी पालकांकडे करीत आहे. मात्र शहरातील उद्यानांची अवस्था बघता ‘सांगा खेळायचे कसे ?’ असा प्रश्न बच्चे कंपनीकडून पालकांना केला जात आहे. महापालिकेने शहरात उद्याने उभारली आहेत. मात्र, या उद्यानांची पाहिजे तशी देखभाल केली जात नाही. शहरातील महापालिकेच्या भकास उद्यानाचे भयाण वास्तव समोर आले. बहुतांश उद्यानांच्या सभोवताल नागरिक कचरा आणून टाकतात. कचरागाडीही येथील कचरा दररोज उचलून नेत नाही. काही ठिकाणी कारंजे लावले आहेत; मात्र, त्यापैकी बहुतांश बंद आहेत. ‘लोकमत’ने नंदनवनमधील त्रिशताब्दी बालोद्यानाला भेट देऊन तेथील वास्तव जाणून घेतले तेव्हा अनेक असुविधा दिसून आल्या. शिवाय देखभालीकडे कमालीचे दुर्लक्ष दिसून आले.

बहुतांश खेळणी तुटलेलीउद्यानातील बहुतांश खेळणी तुटलेली आहेत. त्यामुळे लहानग्यांना उद्यानात खेळताना आई-वडिलांना त्यांच्यावर देखरेख ठेवावी लागले. तुटलेल्या खेळण्यामुळे गंभीर दुखापतीची शक्यता नाकारता येत नाही.

आरोग्यास धोकाबंद फाऊंटेनमुळे कित्येक दिवसांपासून येथे पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी सुटलेली आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लाखो रुपये खर्चून फाऊं टेन तयार केले, बंद ठेवून उपयोग काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका