शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

थेट सांगा ना, मराठी विद्यापीठ आम्हाला नकोच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:07 IST

नागपूर : मराठी विद्यापीठ स्थापन झाले तर पारंपरिक विद्यापीठांना कोणतेच काम उरणार नाही, ते पांढरा हत्ती बनून राहतील, अशी ...

नागपूर : मराठी विद्यापीठ स्थापन झाले तर पारंपरिक विद्यापीठांना कोणतेच काम उरणार नाही, ते पांढरा हत्ती बनून राहतील, अशी कारणे रेटून मराठी विद्यापीठ स्थापनेबाबत कायम रोडा टाकण्याचे काम शासनामार्फत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. माहिती अधिकारांतर्गत मागवण्यात आलेल्या दस्तऐवजांवरून हेच स्पष्ट होत आहे. याबाबत महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीने ‘तुम्हाला मराठी विद्यापीठ नको आहे का’ असा सवाल शासनाला विचारला आहे.

महाराष्ट्रात मराठी विद्यापीठाच्या स्थापनेची मागणी ८५ वर्षापासून प्रलंबित आहे. एका अर्थाने मराठी भाषिक राज्यात मराठी विद्यापीठ स्थापनेबाबत असलेली ही उदासीनता बघूनच, राज्यकर्ते मराठीच्या अधोगतीला कसे कारणीभूत आहेत हे स्पष्ट होते. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी शासनाकडे विद्यापीठ स्थापनेसंदर्भातील हालचाली, शासकीय टिपण्या व दस्तऐवजांची मागणी केली होती. त्यातूनच सातत्याने शासन, शासनाचे विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि मराठी भाषा विभाग यात टोलवला जाणारा मराठी विद्यापीठाच्या मागणीचा चेंडू, स्थापनेबाबत तयार करावयाची समिती, केलेली पुळचट कारणमीमांसा, पारंपरिक विद्यापीठांचे भविष्य अशी एक ना अनेक रोडे टाकण्याचेच काम झाल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे डॉ. श्रीपाद जोशी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र, केवळ अभिवचने देण्याशिवाय प्रत्यक्ष कृती कधीच झाली नसल्याचे व कृती होऊ नये म्हणून केवळ कारणे देण्याचेच काम महाराष्ट्र शासनाकडून झाल्याचे स्पष्ट होत आहे.

* कार्यवाही लांबण्याची कारणे

- १ फेब्रुवारी २०१३ रोजी स्थापनेचा ठराव.

- २५ फेब्रुवारी २०१३ रोजी भाषा सल्लागार समितीचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाला निर्देश.

- १४ जून २०१३च्या टिपणीत ते निर्देश गाळले गेले. पारंपरिक विद्यापीठ निकामी होण्याची व्यक्त केली भीती.

- २५ मार्च २०१४ रोजीच्या टिपणीत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने केली तज्ज्ञ समिती स्थापित करण्याची सूचना.

- तब्बल आठ महिने हा विषय तसा पडून राहिला हे ११ नोव्हेंबर २०१४ च्या टिपणीत स्पष्ट होते.

- ३ जानेवारी २०१५ रोजी तंत्रशिक्षण विभागाच्या संचालकांनी प्रधान सचिवांना समितीसाठीची नावे कळवली.

- सहा महिन्यानंतर ११ जून २०१५ रोजी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने समिती स्थापण्याची विनंती करा व नंतर नावे निश्चित करावी असा निर्णय घेतला.

- २७ जानेवारी २०१६ रोजी पुन्हा त्यात सुधारणा करण्याचे सुचविण्यात आले.

- ३० जानेवारी २०१६ रोजी पुन्हा नावे पाठविण्याची सूचना झाली.

- १६ जुलै २०१६ रोजी मराठी भाषा विभागाने उच्च व तंत्रशिक्षण विभागास कार्यवाहीचे स्मरण करवून दिले.

- १० जुलै २०१७ रोजी अवर मुख्य सचिवांनी बैठक व चर्चा आयोजित करण्याचे सुचवले.

- २० जुलै २०१८ रोजी बैठकीच्या आयोजनाची विनंती सादर केली.

- ८ ऑक्टोबर २०१८ रोजी समितीसाठी नव्याने नावे सुचविण्यात आली. त्यात विदर्भाबाबत उदासीनता बाळगण्यात आली.

- २४ जुलै २०१९ रोजी या संदर्भातील नस्ती पुन्हा सादर झाली.

...............