शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

सांगा, या ‘चंद्रिकां’ची जबाबदारी कुणाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 12:02 IST

कुणाच्याही आधाराविना शहरात कुठेही इतस्त: फिरताना दिसतात, त्या ‘चंद्रिकां’चे काय? असा प्रश्न वर्तमानात घडणाऱ्या निर्भया, दिशांसारख्या प्रकरणांवरून सहजच उपस्थित होतो.

ठळक मुद्देगतिमंद मुलींची व्यथा

प्रवीण खापरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सुखवस्तू कुटुंबातील मुलीही छळल्या जातात रोज, उघडकीस येते एखादीच ‘दामिनी-निर्भया’! घराचा रस्ता शोधताना भटकतात मुली, शोध लागतो तेव्हा सापडेच लागतात हाती आणि नामकरण होते ‘दिशा’!’’ रस्तोरस्ती निराधार दिशाहीन भटकणाऱ्या निर्व्याज-गतिमंद मुलींकडे तडफ नाही, आवाज नाही, म्हणून त्यांना ‘चंद्रिका’ म्हणायचे का! तर या चंद्रिका रोजच छळल्या जातात, रोज बलात्काराला बळी पडतात, त्यांचे काय? ही जबाबदारी कुणाची, समाजाची की सरकारची?गतिमंद मुले-मुली, हे काही परग्रहावरचे प्राणी नाहीत. ते सर्वपरिचित असले तरी त्यांना सांभाळण्याचा अनुभव प्रत्येकाजवळ असेलच असेही नाही. कुणी त्यांच्याकडे सहानुभूतीने बघतो तर कुणी तुसड्या नजरेने. अशी मुले-मुली कुटूंबात आहेत, ते सुरक्षित आहेत. त्यांच्या दृष्टीकोनातून सुरक्षा हा संशोधनाचाच विषय असला तरी किमान कुणाच्या तरी आधाराने ते जगत आहेत आणि त्यांना हवे-नको त्याची काळजीही घेतली जात आहे. मात्र, कुणाच्याही आधाराविना शहरात कुठेही इतस्त: फिरताना दिसतात, त्या ‘चंद्रिकां’चे काय? असा प्रश्न वर्तमानात घडणाऱ्या निर्भया, दिशांसारख्या प्रकरणांवरून सहजच उपस्थित होतो. सीताबर्डी, यशवंत स्टेडियम, उड्डाणपुलांच्या खाली भिंतीच्या आसºयाने अशा अनेक चंद्रिका निर्व्याज अवस्थेत बसलेल्या दिसून येतात. भान नसल्यामुळे त्या एकट्याच असतात. त्या शांत असतात, त्यांना देवध्यानीही म्हणतात आणि समाजाला त्यांची ओळख मतीमंद, गतीमंद अशी आहे. त्याही तुमच्या-आमच्यासारखे हाडामासांनीच बनल्या आहेत, आवाजही आहेच. फक्त तहान-भूकेच्या वेळीच त्यांचे शब्द फुटतात. शब्द फुटले रे फुटले, त्यांचे लचके तोडणाऱ्यांचा गलका सज्जच असतो. भानशुन्य असल्यामुळे त्यांच्या आवाजाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. त्या वेळेपुरती त्यांची तहान-भूक मिटलेली असते! आणि तो कळपही तृप्त झालेला असतो. अशा प्रकारे त्या रोजच निर्दयी हातांनी कुस्करल्या जातात. अशा चंद्रिकांसाठी शासन, प्रशासन आणि समाजाची जबाबदारी नाही का? यांच्यासाठी एक जबाबदार समाज म्हणून काय केले जाते? असे प्रश्न उपस्थित होतात.

शासन-प्रशासन काय करते?राज्यात कुणी उपाशी झोपू नये, कुणी उघड्यावर राहू नये आणि सर्वत्र शांतता-आनंद नांदावा हे कर्तव्य राज्यकर्त्यांचे आणि त्यांच्याकरवी योजना राबविणाऱ्या प्रशासनाचे असते. मात्र, शासन-प्रशासन अशा चंद्रिकांकडे सारासार दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. कधीकाळी याच शहरात भीक मागून जगणाऱ्या दिसायला कुरूप, वेड्या आणि चक्क म्हाताऱ्या बाईला दिवस गेल्याची घटना पुढे आली होती. अशाच परिस्थितीला एका भीक मागणाऱ्या कोवळ्या गतिमंद मुलीलाही सामोरे जावे लागले होते. या घटना अनेक प्रश्न उपस्थित करणाऱ्या ठरल्या. त्यानंतर मात्र त्यावर कोणत्याच उपाययोजना राबविल्या गेल्या नाहीत, हेही सत्यच आहे.

म्हातारी गेल्यानंतर लेकीचे काय?शहरात काही ठिकाणी माय लेकीच्या जोड्या उघड्यावर भीक मागून जगत आहेत. म्हातारीचे वय ७०च्या वर आणि गतीमंद लेकीचे वय ३०-३५. अशा म्हाताऱ्या किती दिवस जगणार आणि त्यांच्यानंतर त्या गतिमंद लेकीचे काय होणार? हा सुन्न करणारा प्रश्न उपस्थित होतो. शहरातील काही स्थळांवर एखाद दुसरी तरुण मुलगी देवध्यानी अवस्थेत फिरताना दिसते. त्यातील बऱ्यापैकी देखणी आहे. मानसिक स्थिती आणि प्रासंगिक परिस्थितीमुळे तिचा चेहरा काळवंडलेला. रस्त्यावर बसून चपलांना देव मानून हातांनी टाळ्या वाजवून अंतर्मनीच्या देवाची आराधना करताना दिसते. नंदनवन, सक्करदरा, रेशीमबाग, हनुमाननगर अशा ठिकाणी ती दिसून येते. ती कशी जगत असेल? हा प्रश्न तिचे तीच जाणे.

टॅग्स :Socialसामाजिक