शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

सांगा, या ‘चंद्रिकां’ची जबाबदारी कुणाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 12:02 IST

कुणाच्याही आधाराविना शहरात कुठेही इतस्त: फिरताना दिसतात, त्या ‘चंद्रिकां’चे काय? असा प्रश्न वर्तमानात घडणाऱ्या निर्भया, दिशांसारख्या प्रकरणांवरून सहजच उपस्थित होतो.

ठळक मुद्देगतिमंद मुलींची व्यथा

प्रवीण खापरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सुखवस्तू कुटुंबातील मुलीही छळल्या जातात रोज, उघडकीस येते एखादीच ‘दामिनी-निर्भया’! घराचा रस्ता शोधताना भटकतात मुली, शोध लागतो तेव्हा सापडेच लागतात हाती आणि नामकरण होते ‘दिशा’!’’ रस्तोरस्ती निराधार दिशाहीन भटकणाऱ्या निर्व्याज-गतिमंद मुलींकडे तडफ नाही, आवाज नाही, म्हणून त्यांना ‘चंद्रिका’ म्हणायचे का! तर या चंद्रिका रोजच छळल्या जातात, रोज बलात्काराला बळी पडतात, त्यांचे काय? ही जबाबदारी कुणाची, समाजाची की सरकारची?गतिमंद मुले-मुली, हे काही परग्रहावरचे प्राणी नाहीत. ते सर्वपरिचित असले तरी त्यांना सांभाळण्याचा अनुभव प्रत्येकाजवळ असेलच असेही नाही. कुणी त्यांच्याकडे सहानुभूतीने बघतो तर कुणी तुसड्या नजरेने. अशी मुले-मुली कुटूंबात आहेत, ते सुरक्षित आहेत. त्यांच्या दृष्टीकोनातून सुरक्षा हा संशोधनाचाच विषय असला तरी किमान कुणाच्या तरी आधाराने ते जगत आहेत आणि त्यांना हवे-नको त्याची काळजीही घेतली जात आहे. मात्र, कुणाच्याही आधाराविना शहरात कुठेही इतस्त: फिरताना दिसतात, त्या ‘चंद्रिकां’चे काय? असा प्रश्न वर्तमानात घडणाऱ्या निर्भया, दिशांसारख्या प्रकरणांवरून सहजच उपस्थित होतो. सीताबर्डी, यशवंत स्टेडियम, उड्डाणपुलांच्या खाली भिंतीच्या आसºयाने अशा अनेक चंद्रिका निर्व्याज अवस्थेत बसलेल्या दिसून येतात. भान नसल्यामुळे त्या एकट्याच असतात. त्या शांत असतात, त्यांना देवध्यानीही म्हणतात आणि समाजाला त्यांची ओळख मतीमंद, गतीमंद अशी आहे. त्याही तुमच्या-आमच्यासारखे हाडामासांनीच बनल्या आहेत, आवाजही आहेच. फक्त तहान-भूकेच्या वेळीच त्यांचे शब्द फुटतात. शब्द फुटले रे फुटले, त्यांचे लचके तोडणाऱ्यांचा गलका सज्जच असतो. भानशुन्य असल्यामुळे त्यांच्या आवाजाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. त्या वेळेपुरती त्यांची तहान-भूक मिटलेली असते! आणि तो कळपही तृप्त झालेला असतो. अशा प्रकारे त्या रोजच निर्दयी हातांनी कुस्करल्या जातात. अशा चंद्रिकांसाठी शासन, प्रशासन आणि समाजाची जबाबदारी नाही का? यांच्यासाठी एक जबाबदार समाज म्हणून काय केले जाते? असे प्रश्न उपस्थित होतात.

शासन-प्रशासन काय करते?राज्यात कुणी उपाशी झोपू नये, कुणी उघड्यावर राहू नये आणि सर्वत्र शांतता-आनंद नांदावा हे कर्तव्य राज्यकर्त्यांचे आणि त्यांच्याकरवी योजना राबविणाऱ्या प्रशासनाचे असते. मात्र, शासन-प्रशासन अशा चंद्रिकांकडे सारासार दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. कधीकाळी याच शहरात भीक मागून जगणाऱ्या दिसायला कुरूप, वेड्या आणि चक्क म्हाताऱ्या बाईला दिवस गेल्याची घटना पुढे आली होती. अशाच परिस्थितीला एका भीक मागणाऱ्या कोवळ्या गतिमंद मुलीलाही सामोरे जावे लागले होते. या घटना अनेक प्रश्न उपस्थित करणाऱ्या ठरल्या. त्यानंतर मात्र त्यावर कोणत्याच उपाययोजना राबविल्या गेल्या नाहीत, हेही सत्यच आहे.

म्हातारी गेल्यानंतर लेकीचे काय?शहरात काही ठिकाणी माय लेकीच्या जोड्या उघड्यावर भीक मागून जगत आहेत. म्हातारीचे वय ७०च्या वर आणि गतीमंद लेकीचे वय ३०-३५. अशा म्हाताऱ्या किती दिवस जगणार आणि त्यांच्यानंतर त्या गतिमंद लेकीचे काय होणार? हा सुन्न करणारा प्रश्न उपस्थित होतो. शहरातील काही स्थळांवर एखाद दुसरी तरुण मुलगी देवध्यानी अवस्थेत फिरताना दिसते. त्यातील बऱ्यापैकी देखणी आहे. मानसिक स्थिती आणि प्रासंगिक परिस्थितीमुळे तिचा चेहरा काळवंडलेला. रस्त्यावर बसून चपलांना देव मानून हातांनी टाळ्या वाजवून अंतर्मनीच्या देवाची आराधना करताना दिसते. नंदनवन, सक्करदरा, रेशीमबाग, हनुमाननगर अशा ठिकाणी ती दिसून येते. ती कशी जगत असेल? हा प्रश्न तिचे तीच जाणे.

टॅग्स :Socialसामाजिक