संघाचा सरकारवर रिमोट नाही
By Admin | Updated: May 17, 2014 01:03 IST2014-05-17T01:03:05+5:302014-05-17T01:03:05+5:30
लोकशाहीत सरकारची भूमिका महत्त्वाची असते. ते रिमोटवर चालविणे योग्य नाही. नवीन सरकारवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कोणत्याही स्वरूपाचा रिमोट नसल्याचे संघाचे सरकार्यवाह भय्या जोशी यांनी ..

संघाचा सरकारवर रिमोट नाही
पत्रपरिषद : सरकार्यवाह भय्याजी जोशी यांचा युक्तिवाद नागपूर : लोकशाहीत सरकारची भूमिका महत्त्वाची असते. ते रिमोटवर चालविणे योग्य नाही. नवीन सरकारवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कोणत्याही स्वरूपाचा रिमोट नसल्याचे संघाचे सरकार्यवाह भय्या जोशी यांनी शुक्र वारी स्पष्ट केले. निवडणूक निकालानंतर रेशीमबाग येथील स्मृती भवन येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीत संघाची महत्त्वाची भूमिका होती. देशातील लोकांनाही परिवर्तन हवे होते. हे निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे. ३0-३५ वर्षांंनंतर केंद्रात स्थिर सरकार येत आहे. नवीन सरकार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करतील. परिवर्तन ही काळाची गरज आहे. ती दीर्घकाळ चालणारी प्रक्रि या आहे. यात सरकार, प्रशासन, नागरिक व राजकीय पक्ष या सर्वांचाच सहभाग महत्त्वाचा आहे. भ्रष्टाचार व देशाच्या सुरक्षेसंदर्भात नवीन सरकार ठोस पावले उचलतील, अशी ग्वाही जोशी यांनी दिली. भारतातील निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. निवडणुकीत लोकांनी सहभाग घेण्याचे आवाहन संघाने केले होते. याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. शांततेच्या वातावरणात ही प्रक्रि या पार पडली. निवडणूक प्रचारादरम्यान सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. ही एक सामान्य प्रक्रि या असते. त्यामुळे मनातील कटुता विसरून राजकीय नेत्यांनी सकारात्मक विचारांनी या निवडणुका घ्याव्या, असे आवाहन जोशी यांनी केले. जात, धर्माच्या आधारावर निर्णय न घेता, देशातील १२५ कोटी जनतेचा विचार करून सरकार निर्णय घेईल. शोषणमुक्त व सक्षम समाज निर्माण करण्यात सरकारला यश येईल, असा विश्वास जोशी यांनी व्यक्त केला. पत्रपरिषदेला संघाचे महानगर संघटक दिलीप गुप्ता उपस्थित होते. (प्रतिनिधी)