शहरं
Join us  
Trending Stories
1
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
2
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
3
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
4
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
5
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
6
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
7
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
8
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
9
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
10
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
11
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
12
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
13
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
14
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
15
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
16
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
17
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
18
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
19
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
20
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
Daily Top 2Weekly Top 5

१०० टक्के वेतन घेणाऱ्या शिक्षकांना आणले २० टक्क्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 00:23 IST

वारंवार बदलणाऱ्या शिक्षण विभागाच्या धोरणाचा फटका जिल्ह्यातील दोन शिक्षकांना बसला आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाची दाद मागण्यासाठी हे दोन शिक्षक शासनाच्या दारोदारी भटकत आहे. परंतु त्यांच्या तक्रारी कुणीच ऐकून घेण्यास तयार नाही. त्यामुळे हे दोन्ही शिक्षक मानसिक तणावात आहे.

ठळक मुद्देशिक्षण विभागाचा अजब कारभार : न्यायासाठी शिक्षकांची वणवण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वारंवार बदलणाऱ्या शिक्षण विभागाच्या धोरणाचा फटका जिल्ह्यातील दोन शिक्षकांना बसला आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाची दाद मागण्यासाठी हे दोन शिक्षक शासनाच्या दारोदारी भटकत आहे. परंतु त्यांच्या तक्रारी कुणीच ऐकून घेण्यास तयार नाही. त्यामुळे हे दोन्ही शिक्षक मानसिक तणावात आहे. या शिक्षकांचे वेतन जुलै २०१७ पासून थांबविण्यात आले आहे. विशेष म्हणजे या शिक्षकांनी नोकरीसाठी लाखो रुपयांचे डोनेशन दिले आहे.विशाल राठोड व सचिन वरघणे सहायक शिक्षक म्हणून शांतिनिकेतन उच्च प्राथमिक विद्यालय, राजीव गांधीनगर, हिंगणा रोड येथे जून/जुलै २०१० पासून कार्यरत आहे. जून २०१७ पर्यंत त्यांना १०० टक्के वेतन मिळाले. परंतु १९ सप्टेंबर २०१६ आलेल्या जीआरचा आधार घेत, संस्थाचालकांनी सांगितले की तुम्हाला २० टक्केच वेतन घ्यावे लागेल. मुळात हा जीआरसुद्धा या दोन शिक्षकांना लागू होत नाही, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे संस्थाचालकाने हे दोन शिक्षक ज्या तुकड्यांवर शिकवित होते, त्या तुकड्यावर बोगस पटसंख्या दाखवून सहा शिक्षकांची नियुक्ती २०१४, २०१५ ला केली. या शिक्षकांचे अधिकाºयांच्या संगनमताने अंशत: अनुदानित मान्यता घेऊन, १०० टक्केनुसार त्यांचे वेतन काढण्यात आल्याचा आरोप या दोन शिक्षकांनी केला आहे. हे सर्व शिक्षक संस्थाचालकांचे आप्तस्वकीय असल्याचा सुद्धा त्यांचा आरोप आहे. शिक्षण आयुक्तांनी काढली रिकव्हरी२०१४-१५ मान्यता नसतानाही शिक्षकांची नियुक्ती केली, त्यांना वेतन बहाल करण्यात आल्याने विभागावर अतिरिक्त भुर्दंड बसला होता. त्यामुळे शिक्षण आयुक्तांनी २०१७ मध्ये चौकशी केली. दरम्यान आयुक्तांनी ९ शिक्षकांवर १८ लाखाची रिकव्हरी काढली. परंतु ही रिकव्हरी फक्त या दोन्ही शिक्षकांकडून भरण्यासंदर्भात दबाव आणला आणि जुलै २०१७ पासून वेतन थांबविले. परंतु वेतन का थांबविले याचे कुठेही लेखी दिले नाही. शिवाय ही रिकव्हरी कोणत्या शिक्षकांची आहे, ते अद्याप स्पष्ट केले नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.सुनावणीतही समाधान नाहीयासंदर्भात शिक्षकांनी शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, पे युनिटचे अधिकाºयांना तक्रारी दिल्या. या प्रकरणात शिक्षण उपसंचालक कार्यालयात सुनावणी सुद्धा झाली. परंतु सुनावणीतही त्यांना समाधान मिळाले नाही.शिक्षणाधिकारी म्हणतात,यासंदर्भात शिक्षणाधिकारी (प्रा.) दीपेंद्र लोखंडे यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की, शिक्षकांना अन्याय झाला असे वाटत असेल तर, त्यांनी न्यायालयात जावे.संस्थाचालक म्हणतात माझा दोष नाहीयासंदर्भात शाळेचे संस्थाचालक विठ्ठलराव कोहाळ यांना विचारणा केली असता, त्यांनी स्पष्ट केले की, या दोन शिक्षकांवर झालेल्या अन्यायासंदर्भात माझा दोष नाही. मी त्यांना २० टक्क्यांवर आणण्यासंदर्भात कुठलेही पत्र दिले नाही. त्यात शिक्षण विभागाचा दोष आहे. त्यांनी जून २०१७ पर्यंत १०० टक्के वेतनही घेतले आहे. मी कधीच त्यांना थांबविले नाही. उलट त्यांच्यावर काढलेली १८ लाखाची रिकव्हरी न्यायालयात जाऊन स्थगिती मिळविली आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकnagpurनागपूर