शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

असर'च्या माध्यमातून जि. प. शाळा टार्गेट असल्याचा शिक्षकांचा आरोप !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 17:10 IST

प्राथमिक शिक्षक समितीचा आरोप : शैक्षणिक साहित्य, विक्रीचा 'प्रथम'चा डाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांना टार्गेट केले जात आहे. शाळांच्या दर्जाबाबत समाजात जाणीवपूर्वक गैरसमज पसरवून व शिक्षकांची अवहेलना होईल अशी मांडणी 'असर' या अहवालातून प्रथम संस्थेकडून केली जात आहे. त्यामाध्यमातून शैक्षणिक साहित्य सरकारी शाळांच्या माथी मारण्याचा प्रथम संस्थेचा डाव असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता संपादणुकीचे सर्वेक्षण असरदार व्हायचे असेल तर पुढील वर्षापासून शिक्षकांनाही सोबत घेऊन गुणवत्तेची पडताळणी करावी. शहरातील शाळांचेही सर्वेक्षण करावे, अशी भूमिका शिक्षण समितीने मांडली आहे.

सर्वेक्षण वास्तवदर्शी'प्रथम'चे कार्यकर्ते कोणत्याही शाळेत जात नाहीत. ते गावात पारावर, मैदानावर, रस्त्यावर खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून शैक्षणिक गुणवत्तेची पडताळणी करतात. त्यामुळे हे तथाकथित सर्वेक्षण वास्तवदर्शी, वस्तुनिष्ठ व पारदर्शक नसल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे व नागपूर जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे यांनी केला आहे.

असर'वर संघटनेचे कोणते आक्षेप

  • सर्वेक्षणातून ग्रामीण भागातील शाळा-शिक्षकांची बदनामी
  • विद्यार्थ्यांच्या गुणवत्ताविषयक प्रगतीची योग्य दखल नाही.
  • सरकारी शाळांविषयी गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न
  • गुणवत्तेत सतत घसरण आणि कधीकधी किंचित वाढ दाखवून संस्थानिर्मित शैक्षणिक साहित्य सरकारी शाळेत पुरविण्यासाठी सर्वे
  • सरकारचे पाठबळ नसतानाही गुणवत्तेचा आलेख उंचावलेला
  • अनेक सरकारी प्राथमिक शाळेत एकच शिक्षक, मुख्याध्यापकांवर शिक्षणाबरोबरच प्रशासकीय ताणाचा उल्लेख नाही.
  • भौतिक सुविधांची वानवा, ऑनलाइन-ऑफलाइन अशैक्षणिक कामांमुळे प्रभावित अध्यापनावर सर्वेक्षणात भाष्य नाही.

"शासकीय यंत्रणेमार्फत राबविणाऱ्या मूल्यमापन प्रक्रियेत तसेच शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून जि. प. च्या विद्यार्थ्यांचा दर्जा सुधारत आहे. दुसरीकडे नकारात्मक असर अहवाल प्रथम संस्थेकडून सादर केला जातो. ही प्रक्रियाच संशयास्पद आहे."- लीलाधर ठाकरे, जिल्हाध्यक्ष, म. रा. प्रा. शिक्षक समिती

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाEducationशिक्षणnagpurनागपूर