शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

गुंडांना धडा शिकवा! नागपूर पोलीस आयुक्तांचे ठाणेदारांना निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 21:38 IST

पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शहरात घडलेल्या हत्यांच्या प्रकरणांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सोबतच गुंडांना चांगला धडा शिकवा, असे निर्देश पोलीस निरीक्षकांना दिले आहेत. मंगळवारी सकाळी त्यांनी क्राईम मीटिंगमध्ये पोलीस ठाण्यांच्या निरीक्षकांशी चर्चा केली.

ठळक मुद्देकठोर कारवाई करावी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शहरात घडलेल्या हत्यांच्या प्रकरणांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सोबतच गुंडांना चांगला धडा शिकवा, असे निर्देश पोलीस निरीक्षकांना दिले आहेत. मंगळवारी सकाळी त्यांनी क्राईम मीटिंगमध्ये पोलीस ठाण्यांच्या निरीक्षकांशी चर्चा केली.गेल्या काही दिवसात शहरात हत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही घटना तर अगदी किरकोळ वादातून झाल्या आहेत. मात्र या घटनेतील आरोपी कुख्यात गुन्हेगार आहेत. सक्करदरा येथे तडीपार कार्तिक चौबे याने साथीदारांच्या मदतीने गौरव खडतकर याची हत्या केली. वाठोड्यात एका युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. नंदनवनमध्ये एका आरोपीने महिलेची हत्या केली. या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. उपराजधानीला क्राईममुक्त करण्यासाठी ऑपरेशन क्रॅक डाऊन तसेच हॅण्ड्सऑफ चालविण्यात येत आहे. टॉप टेन गुन्हेगारांची यादी तयार करून तपास सुरू आहे. या गुन्हेगारांना ठाण्यात आणून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, असे डॉ. उपाध्याय म्हणाले. आरोपींच्या हालचालींवर नजर ठेवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. केवळ प्रतिबंधात्मक कारवाई न करता, गुन्हेगारांविरुद्धचा ठोस पुरावा न्यायालयात सादर करावा. पोलीस निरीक्षकांनी आपल्या हद्दीत मजबूत नेटवर्क बनविण्याची गरज आहे. नागरिक आणि खबऱ्यांकडून आरोपींची माहिती गोळा करण्यात यावी, अशा सूचना पोलीस आयुक्तांनी ठाणेदारांना दिल्या.

टॅग्स :Policeपोलिसcommissionerआयुक्तnagpurनागपूर