शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तावडे साहेब, बैठका सोडा... आधी किल्ल्यांवरील व्यावसायिक आक्रमण थोपवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 23:48 IST

पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी घेतलेला गडकोट किल्ल्यांवरील हॉटेल व्यवसायाला परवानगी देण्याबाबतचा निर्णय राज्यातील दुर्गप्रेमींना रुचलेला नाही. त्याच पार्श्वभूमीवर विविध संघटना रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असून, राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना या प्रकरणात जातीने लक्ष घालण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, तावडे आणि रावल दोघेही पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत व्यस्त असल्याने, त्यांच्या कानापर्यंत अद्याप दुर्गप्रेमींचा आवाज पोहोचला नसल्याचे स्पष्ट होत आहे.

ठळक मुद्देकिल्ले संवर्धन समिती ‘हॉटेल’ निर्णयाबाबत आक्रमक पवित्र्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी घेतलेला गडकोट किल्ल्यांवरील हॉटेल व्यवसायाला परवानगी देण्याबाबतचा निर्णय राज्यातील दुर्गप्रेमींना रुचलेला नाही. त्याच पार्श्वभूमीवर विविध संघटना रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असून, राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना या प्रकरणात जातीने लक्ष घालण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, तावडे आणि रावल दोघेही पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत व्यस्त असल्याने, त्यांच्या कानापर्यंत अद्याप दुर्गप्रेमींचा आवाज पोहोचला नसल्याचे स्पष्ट होत आहे.विशेष म्हणजे, सांस्कृतिक मंत्री तावडे यांच्याच अध्यक्षतेत स्थापन झालेल्या किल्ले संवर्धन समितीने पर्यटन मंत्र्यांच्या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, समितीच्या सदस्यांचा तावडेंसोबत संपर्क होत नसल्याने, सदस्यांचा तावडेंच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण होत असल्याचेही दिसून येते. २०१५ मध्ये स्थापन झालेल्या या समितीमध्ये पूर्वी नऊ सदस्य होते. आता सदस्यांची संख्या १२ झाली आहे. यात मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक, औरंगाबाद व नागपूर येथील तज्ज्ञांचा समावेश होतो. निनाद बेडेकर, पांडुरंग बलकवडे, प्र.के. घाणेकर यांच्यासारखे अभ्यासक या समितीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीने लक्ष घालून, स्वराज्याच्या आरमाराची सुरुवात करणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ल्याची निवड हॉटेल व्यवसायासाठी ‘पायलट प्रोजेक्ट’ म्हणून करण्यात आल्याने, समितीच्या सदस्यांचे माथे भडकले आहे. याबाबत शिवप्रेमी व दुर्गप्रेमी संघटनांनी थेट रावल यांच्याकडे विविध मार्गाने निर्णयाच्या निषेधाची निवेदनेही पाठविली आहेत. शिवाय, किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे प्रमुख म्हणून तावडे यांनाही ऐतिहासिक किल्ल्यांवर शासनाच्याच धोरणाद्वारे होत असलेले आक्रमण थोपविण्याची मागणी केली जात आहे. मात्र, अद्याप दोन्ही मंत्र्यांकडून याबाबत कुठलीच प्रतिक्रिया उमटलेली नाही. किल्ले संवर्धन समितीच्या सदस्यांनी या निर्णयाविरोधात एकमताने उभे राहण्याचा निर्णय घेतला असून, तावडे आपल्या व्यस्ततेतून कधी मोकळे होतात, त्यावरच पुढची भूमिका निर्धारित होणार आहे.पर्यटन मंत्र्यांनी रायगडावरील निवासव्यवस्था नीट करावी समितीने आपला निर्णय स्पष्ट केला असून, किल्ल्यांवर हॉटेल व्यवसायाच्या निर्णयाचा विरोध करण्याचे निश्चितच झाले आहे. लवकरच त्यांना समितीचे पत्र मिळेल, अशी माहिती किल्ले संवर्धन समितीचे नागपूरमधील तज्ज्ञ सदस्य प्रफुल्ल माटेगावकर यांनी दिली. पर्यटन मंत्र्यांनी गड-दुर्ग-किल्ल्यांवर पर्यटकांना आकृष्ट करण्यासाठी असले निर्णय घेण्यापेक्षा, रायगडावर पर्यटन विकास महामंडळातर्फे उभारण्यात आलेल्या निवासव्यवस्थेची दुरुस्ती करण्याकडे लक्ष केंद्रित करण्याचा टोला माटेगावकर यांनी मारला आहे. गेल्या सात-आठ वर्षापासून या निवासाची दुरवस्था असून, छप्पर उडालेल्या अवस्थेत असल्याचे माटेगावकर यांनी सांगितले.किल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करू नका - दत्ता शिर्के शासनाचे एक खाते किल्ल्यांचे संवर्धन करण्यास पुढाकार घेते आणि दुसरे खाते, त्या संवर्धनावर माती फेरते, अशी विसंगती दिसून येत आहे. गड-दुर्ग-किल्ल्यांचे संवर्धन व्हावे आणि पावित्र्य राखले जावे, यासाठी राज्यभरातील विविध स्वयंसेवक आणि संघटना स्वयंपे्ररणेने आणि स्व:खर्चाने झटत आहेत. असला निर्णय घेऊन पर्यटन विभागाने, किल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्याचे प्रयत्न करू नये. अन्यथा, शिवप्रेमी जनता रस्त्यावर उतरेल, असा इशारा श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे संयोजक दत्ता शिर्के यांनी दिला आहे.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेFortगड