शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
3
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
4
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
5
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
6
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
7
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
8
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
9
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
11
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
12
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
13
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
14
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
15
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
17
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
18
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
19
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
20
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?

तावडे साहेब, बैठका सोडा... आधी किल्ल्यांवरील व्यावसायिक आक्रमण थोपवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 23:48 IST

पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी घेतलेला गडकोट किल्ल्यांवरील हॉटेल व्यवसायाला परवानगी देण्याबाबतचा निर्णय राज्यातील दुर्गप्रेमींना रुचलेला नाही. त्याच पार्श्वभूमीवर विविध संघटना रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असून, राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना या प्रकरणात जातीने लक्ष घालण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, तावडे आणि रावल दोघेही पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत व्यस्त असल्याने, त्यांच्या कानापर्यंत अद्याप दुर्गप्रेमींचा आवाज पोहोचला नसल्याचे स्पष्ट होत आहे.

ठळक मुद्देकिल्ले संवर्धन समिती ‘हॉटेल’ निर्णयाबाबत आक्रमक पवित्र्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी घेतलेला गडकोट किल्ल्यांवरील हॉटेल व्यवसायाला परवानगी देण्याबाबतचा निर्णय राज्यातील दुर्गप्रेमींना रुचलेला नाही. त्याच पार्श्वभूमीवर विविध संघटना रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असून, राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना या प्रकरणात जातीने लक्ष घालण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, तावडे आणि रावल दोघेही पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत व्यस्त असल्याने, त्यांच्या कानापर्यंत अद्याप दुर्गप्रेमींचा आवाज पोहोचला नसल्याचे स्पष्ट होत आहे.विशेष म्हणजे, सांस्कृतिक मंत्री तावडे यांच्याच अध्यक्षतेत स्थापन झालेल्या किल्ले संवर्धन समितीने पर्यटन मंत्र्यांच्या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, समितीच्या सदस्यांचा तावडेंसोबत संपर्क होत नसल्याने, सदस्यांचा तावडेंच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण होत असल्याचेही दिसून येते. २०१५ मध्ये स्थापन झालेल्या या समितीमध्ये पूर्वी नऊ सदस्य होते. आता सदस्यांची संख्या १२ झाली आहे. यात मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक, औरंगाबाद व नागपूर येथील तज्ज्ञांचा समावेश होतो. निनाद बेडेकर, पांडुरंग बलकवडे, प्र.के. घाणेकर यांच्यासारखे अभ्यासक या समितीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीने लक्ष घालून, स्वराज्याच्या आरमाराची सुरुवात करणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ल्याची निवड हॉटेल व्यवसायासाठी ‘पायलट प्रोजेक्ट’ म्हणून करण्यात आल्याने, समितीच्या सदस्यांचे माथे भडकले आहे. याबाबत शिवप्रेमी व दुर्गप्रेमी संघटनांनी थेट रावल यांच्याकडे विविध मार्गाने निर्णयाच्या निषेधाची निवेदनेही पाठविली आहेत. शिवाय, किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे प्रमुख म्हणून तावडे यांनाही ऐतिहासिक किल्ल्यांवर शासनाच्याच धोरणाद्वारे होत असलेले आक्रमण थोपविण्याची मागणी केली जात आहे. मात्र, अद्याप दोन्ही मंत्र्यांकडून याबाबत कुठलीच प्रतिक्रिया उमटलेली नाही. किल्ले संवर्धन समितीच्या सदस्यांनी या निर्णयाविरोधात एकमताने उभे राहण्याचा निर्णय घेतला असून, तावडे आपल्या व्यस्ततेतून कधी मोकळे होतात, त्यावरच पुढची भूमिका निर्धारित होणार आहे.पर्यटन मंत्र्यांनी रायगडावरील निवासव्यवस्था नीट करावी समितीने आपला निर्णय स्पष्ट केला असून, किल्ल्यांवर हॉटेल व्यवसायाच्या निर्णयाचा विरोध करण्याचे निश्चितच झाले आहे. लवकरच त्यांना समितीचे पत्र मिळेल, अशी माहिती किल्ले संवर्धन समितीचे नागपूरमधील तज्ज्ञ सदस्य प्रफुल्ल माटेगावकर यांनी दिली. पर्यटन मंत्र्यांनी गड-दुर्ग-किल्ल्यांवर पर्यटकांना आकृष्ट करण्यासाठी असले निर्णय घेण्यापेक्षा, रायगडावर पर्यटन विकास महामंडळातर्फे उभारण्यात आलेल्या निवासव्यवस्थेची दुरुस्ती करण्याकडे लक्ष केंद्रित करण्याचा टोला माटेगावकर यांनी मारला आहे. गेल्या सात-आठ वर्षापासून या निवासाची दुरवस्था असून, छप्पर उडालेल्या अवस्थेत असल्याचे माटेगावकर यांनी सांगितले.किल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करू नका - दत्ता शिर्के शासनाचे एक खाते किल्ल्यांचे संवर्धन करण्यास पुढाकार घेते आणि दुसरे खाते, त्या संवर्धनावर माती फेरते, अशी विसंगती दिसून येत आहे. गड-दुर्ग-किल्ल्यांचे संवर्धन व्हावे आणि पावित्र्य राखले जावे, यासाठी राज्यभरातील विविध स्वयंसेवक आणि संघटना स्वयंपे्ररणेने आणि स्व:खर्चाने झटत आहेत. असला निर्णय घेऊन पर्यटन विभागाने, किल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्याचे प्रयत्न करू नये. अन्यथा, शिवप्रेमी जनता रस्त्यावर उतरेल, असा इशारा श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे संयोजक दत्ता शिर्के यांनी दिला आहे.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेFortगड