शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पाच हजार शाळा बंद करण्याचे ‘टार्गेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 21:46 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या झपाट्याने घसरत चालली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. २०१७-१८ मध्ये शासनाने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या राज्यातील १३०० शाळा बंद केल्या होत्या. यंदा हा आकडा पाच हजाराच्या जवळपास पोहचणार आहे.

ठळक मुद्दे२० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांवर संकट : राज्य सरकारवर बसतोय भुर्दंड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या झपाट्याने घसरत चालली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. २०१७-१८ मध्ये शासनाने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या राज्यातील १३०० शाळा बंद केल्या होत्या. यंदा हा आकडा पाच हजाराच्या जवळपास पोहचणार आहे.नागपूर जिल्ह्याचा विचार केल्यास जि. प.च्या २५९ शाळांमध्ये ११ ते १९ विद्यार्थ्यांचा पट आहे. ९४ शाळांमध्ये ६ ते १० विद्यार्थ्यांचा पट असून, ३४ शाळांमध्ये पाचच्या खाली विद्यार्थ्यांचा पट आहे. अशा ३८७ शाळा केवळ नागपूर जि.प.च्या आहेत. प्रत्येक शाळेत दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकाच्या वेतनावर होणारा खर्च, सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळेवर होणार खर्च लक्षात घेता, शासनावर कोट्यवधीचा बोझा पडतो आहे. २० पेक्षा कमी पट असलेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांचे इतर शाळांमध्ये समायोजन करून या शाळा बंद करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षण सचिवांनी यासंदर्भात एक बैठक घेऊन २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचा आढावा घेतला. कमी पटसंख्या असलेल्या पाच हजार शाळा बंद करण्याचे टार्गेट ठेवले आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या १५५५ शाळा असून, ४३०० शिक्षक कार्यरत आहेत.पटसंख्या कमी असूनही विद्यार्थी अप्रगतचजेवढे विद्यार्थी कमी तेवढी गुणवत्ता अधिक असे समीकरण मांडले जाते. पण कमी पटसंख्येच्या शाळेत उलट होत आहे. कमी पटसंख्येच्या शाळांची गुणवत्ता घसरत चालली असल्याचे निदर्शनास आले आहे. कारण कमी पटसंख्या असलेल्या शाळांना शिकविण्याची मानसिकता शिक्षकांची नसल्याचे दिसते आहे. तसेच विद्यार्थ्यांचीसुद्धा मानसिकता शिकण्याची नसल्याचे दिसते आहे. त्यामुळे या शाळांमध्ये अप्रगत विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.समायोजनानंतर विद्यार्थ्यांना मिळणार प्रवासभत्ताकमी पटसंख्येच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शाळेत दाखल करण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. घरापासून शाळा जर एक किलोमीटरच्या वर असेल तर विद्यार्थ्यांना प्रवास भत्तासुद्धा दिला जाणार आहे. गेल्यावर्षी ५५ विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी तीन हजार रुपये प्रवास भत्ता दिला गेला होता. प्रवासभत्त्याची रक्कम सहा हजार करण्यात आली आहे.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाMaharashtraमहाराष्ट्र