शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिभा, तंत्रज्ञान, विश्वास देशाच्या विकासाची त्रिसूत्री : डॉ. रघुनाथ माशेलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 20:54 IST

नेहमी आपल्या देशातील प्रतिभा व तंत्रज्ञानावर विश्वास ठेवा. त्यातून आपल्याला बळकट राष्ट्र निर्माण करता येईल, असे पद्मविभूषण सन्मानप्राप्त आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर यांनी सोमवारी ‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्डस्-२०२०’ कार्यक्रमात बोलताना सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रतिभा, तंत्रज्ञान व विश्वास या तीन गोष्टी देशाच्या विकासाचा पाया आहेत. नेहमी आपल्या देशातील प्रतिभा व तंत्रज्ञानावर विश्वास ठेवा. त्यातून आपल्याला बळकट राष्ट्र निर्माण करता येईल, असे पद्मविभूषण सन्मानप्राप्त आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर यांनी सोमवारी ‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्डस्-२०२०’ कार्यक्रमात बोलताना सांगितले.

डॉ. माशेलकर या कार्यक्रमात सन्माननीय अतिथी व मुख्य वक्ते म्हणून उपस्थित होते. केमिकल इंजिनियर असलेले डॉ. माशेलकर हे कौन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅन्ड इंडस्ट्रियल रिसर्चचे माजी महासंचालक आणि इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी व इन्स्टिट्यूशन ऑफ केमिकल इंजिनियर्सचे अध्यक्ष होते. त्यांनी पुढे बोलताना शिक्षण व नवनिर्मितीचे महत्त्वही समजावून सांगितले. देशबांधणीत शिक्षण व नवनिर्मितीदेखील महत्त्वाची भूमिका बजावतात. शिक्षणामुळे देशाचे भविष्य घडते तर, नवनिर्मितीमुळे प्रगतीचा वेग वाढतो. आपल्याला आणखी झपाट्याने पुढे जाण्यासाठी शिक्षणामध्ये नवनिर्मिती आणणे गरजेचे आहे. आपण नवनिर्मितीमध्ये मागे राहिल्यास इतर देश पुढे निघून जातील, असे ते म्हणाले.याप्रसंगी प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सुधीर भावे व लोकमत समाचार नागपूरचे संपादक विकास मिश्रा यांनी डॉ. माशेलकर यांची प्रगट मुलाखत घेतली. त्यातही डॉ. माशेलकर यांनी विविध प्रश्नांना विस्तृत उत्तरे दिली. १९७६ मध्ये महासंचालकपदाची सूत्रे स्वीकारली त्यावेळी कौन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅन्ड इंडस्ट्रियल रिसर्चची अवस्था चांगली नव्हती. या संस्थेला आंतरबाह्य बदलण्यासाठी अनेक कामे करावी लागली. त्यामुळे ही संस्था राष्ट्रस्तरावर दखलपात्र झाली. नवनिर्मितीत मोडणाऱ्या या कामाचा प्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ प्रा. जयंत नारळीकर यांनी ‘दि सायंटिफिक एज’ पुस्तकामध्ये उल्लेख केला. या संस्थेने जीवनात सर्वकाही दिले. संस्थेच्या माध्यमातून केलेल्या देशसेवेमुळे समाधानी आहे, असे त्यांनी सांगितले.जीवनात येणाऱ्या संकंटांवर मात करून पुढे जाण्याची प्रत्येकाला प्रेरणा मिळावी व देशाला दिशा देणारे नेतृत्व विकसित व्हावे, या उद्देशाने रवी पंडित यांच्यासोबत मिळून ‘लिप फ्रॉगिंग टू पोल-व्हॉल्टिंग’ हे पुस्तक प्रकाशित केले. त्या पुस्तकाची पहिली आवृत्ती अवघ्या ४५ दिवसांत खपली. त्यानंतर टाटा लिटरेचर लाईव्हने त्या पुस्तकाला २०१९ मधील ‘बिझनेस बुक ऑफ दि इयर’ पुरस्कार प्रदान केला. हे पुस्तक जीवनात हनुमान उडी कशी घ्यायची हे शिकवते, अशी माहिती त्यांनी दिली.जगामध्ये हजारो चुकीचे पेटंटस् देण्यात आले आहेत. त्यात जखम भरून काढण्यासाठी हळदीचा उपयोग करण्याच्या पद्धतीचा आणि बासमती तांदळाच्या वाणाचा समावेश होता. या दोन्हीचे अमेरिकेला पेटंट देण्यात आले होते. त्याविरुद्ध लढा दिला. त्यामुळे दोन्ही पेटंट मागे घेण्यात आले. जखम भरून काढण्यासाठी हळदीचा उपयोग करणे हे भारताचे पारंपरिक ज्ञान आहे. बासमती तांदळाचा उगम भारतातील आहे, असे डॉ. माशेलकर यांनी सांगितले.दिवंगत माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन व डॉ. माशेलकर या दोघांची सुरुवातीला हलाखीची आर्थिक परिस्थिती होती व ते टाटा ट्रस्टकडून मिळालेल्या शिष्यवृत्तीमुळे उच्च शिक्षण घेऊ शकले. कालांतराने नारायणन राष्ट्रपती झाले आणि त्यांच्या हस्ते टाटा समूहाचे रतन टाटा व डॉ. माशेलकर यांना पद्मभूषण सन्मान प्रदान करण्यात आला. डॉ. माशेलकर यांनी हे उदाहरण सांगून शिक्षणाची शक्ती सिद्ध केली.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटdoctorडॉक्टर