शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

हिवाळी अधिवेशन नागपुरातच घ्या : भाजपच्या आमदारांची स्पष्ट भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 20:07 IST

BJP MLAs, Winter session in Nagpur ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईतच घेण्यासंदर्भात सरकारी हालचाली सुरू असताना शहरातील भाजप उमेदवारांनी अधिवेशनाच्या समर्थनार्थ ठोस भूमिका घेतली आहे.

ठळक मुद्देविधानभवन परिसरात खबरदारीचे उपाय हवेत

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईतच घेण्यासंदर्भात सरकारी हालचाली सुरू असताना शहरातील भाजप उमेदवारांनी अधिवेशनाच्या समर्थनार्थ ठोस भूमिका घेतली आहे. २०१९ या वर्षात नागपुरात एकही अधिवेशन झालेले नाही. विदर्भातील जनतेचे असंख्य प्रश्न सरकारसमोर मांडायचे आहे. शिवाय नागपूर कराराप्रमाणे अधिवेशन हा नागपूरचा हक्कच आहे. त्यामुळे ‘कोरोना’ असला तरी खबरदारीच्या उपाययोजना करुन अधिवेशन नागपुरातच घेण्यात यावे, असा भाजप आमदारांचा सूर आहे.

नागपुरात अधिवेशन घेण्यात येऊ नये हा मुद्दा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी सर्वात अगोदर उपस्थित केला होता. ‘कोरोना’ची स्थिती लक्षात घेता तो निधी आरोग्य यंत्रणेला देण्यात यावा अशी मागणीदेखील त्यांनी केली होती. सरकारकडून अद्यापही नेमकी भूमिका मांडण्यात आलेली नाही. अधिवेशनाला एक महिना बाकी असताना अद्यापही तयारीने हवा तसा वेग घेतलेला नाही. या पार्श्वभूमीवर भाजपच्या आमदारांनी अधिवेशन नागपुरात घेण्याचा मुद्दा लावून धरला आहे. ‘कोरोना’ असतानादेखील संसदेचे अधिवेशन झाले. त्याच पार्श्वभूमीवर खबरदारीच्या सर्व उपाययोजना करुन अधिवेशन घ्यावे व विदर्भाला न्याय मिळावा असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पूर्ण खबरदारीसह अधिवेशन हवे

हिवाळी अधिवेशन नागपुरातच व्हायला हवे. यासंदर्भात आमच्या पक्षाची जी भूमिका असेल त्याचेच आम्ही समर्थन करु. बºयाच प्रयत्नांनंतर नागपुरातील ‘कोरोना’ रुग्णांची संख्या नियंत्रित करण्यात यश आले आहे. त्यामुळे अधिवेशन नागपुरात झाले तर खबरदारीच्या सर्व उपाययोजना झाल्या पाहिजे.

प्रवीण दटके, भाजप शहराध्यक्ष व आमदार, विधान परिषद

तीन आठवडे अधिवेशन चालवावे

अधिवेशन केवळ दोन दिवसांपुरतेच घेण्याचा सरकारचा मानस असल्याची माहिती कळाली आहे. असे होत असेल तर कोट्यवधींचा खर्च करुन अधिवेशनाचा ‘फार्स’ करण्याची काहीच आवश्यकता नाही. जर अधिवेशन झालेच तर ते कमीत कमी तीन आठवडे चालेल याची शाश्वती असली पाहिजे. भाजपकडे सरकारची कोंडी करण्यासाठी भरपूर मुद्दे आहेत. ‘कोरोना’ संसर्ग नागपुरात कमी होत असून अधिवेशन झाल्यास काहीच हरकत नाही.

-कृष्णा खोपडे, आमदार, भाजप

नागपूर कराराचे पालन व्हावे

नागपूर करारानुसार वर्षातील एक अधिवेशन राज्याच्या उपराजधानीत होणे अनिवार्य आहे. मुंबईत झालेल्या अधिवेशनात अभ्यागतांना प्रवेश नाकारण्यात आला होता. शिवाय ‘कोरोना’पासून सुरक्षेसाठी उपाययोजनादेखील करण्यात आल्या होत्या. त्याच धर्तीवर नागपुरातदेखील कमीत कमी दोन आठवड्यांचे अधिवेशन झाले पाहिजे.

-मोहन मते, आमदार, भाजप

विदर्भातील जनतेचे सरकारकडेच लक्ष

सरकारकडून जनतेला अनेक मुद्यावर उत्तर हवे आहे. नागपुरात ‘कोरोना’ नियंत्रणात येत आहे. अधिवेशनामुळे जर खरोखर ‘कोरोना’चा प्रसार होणार असेल तर तो मुंबईतदेखील होईल. विदर्भातील शेतकऱ्यांचे लक्ष अधिवेशनाकडे लागले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या उपाययोजना करुन अधिवेशन नागपुरातच घ्यावे.

- विकास कुंभारे, आमदार, भाजप

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनnagpurनागपूरBJPभाजपाMLAआमदार