शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

परीक्षा घेता, निकाल लावता, मग शिष्यवृत्ती का देत नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 20:54 IST

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी एनएमएमएस (नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशीप) ही शिष्यवृत्ती परीक्षा केंद्र सरकारच्या मानव संसाधन विभागातर्फे घेतली जाते. पण दुर्दैव तीन तीन वर्ष पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची प्रतीक्षा करावी लागते.

ठळक मुद्देएनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र विद्यार्थी तीन तीन वर्षापासून प्रतीक्षेत अधिकारी दाखवितात शाळांच्याच चुका

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी एनएमएमएस (नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशीप) ही शिष्यवृत्ती परीक्षा केंद्र सरकारच्या मानव संसाधन विभागातर्फे घेतली जाते. आठव्या वर्गातील विद्यार्थीच ही परीक्षा देऊ शकतात. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे परीक्षेचे आयोजन केले जाते. परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये शिष्यवृत्ती बाराव्या वर्गापर्यंत दिली जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने ही परीक्षा देतात आणि पात्रही ठरतात. पण दुर्दैव तीन तीन वर्ष पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची प्रतीक्षा करावी लागते.

विशेष म्हणजे या शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात फारशी जनजागृती नाही. पण राज्यभरातून किमान १ लाखावर विद्यार्थी परीक्षा देतात. दरवर्षी नागपूर जिल्ह्यात शिष्यवृत्तीस पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या शंभर ते दीडशेच्या जवळपास असते. जिल्ह्यातील काही शाळा गरीब विद्यार्थ्यांना नियमित या परीक्षेत बसवितात आणि शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्याना आर्थिक साहाय्य मिळविण्यासाठी प्रोत्साहित करतात. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात एका उपशिक्षणाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे या शिष्यवृत्ती जबाबदारी असते. जिल्ह्यातील काही शाळा आणि पात्र ठरलेल्या काही विद्यार्थ्यांकडून गेल्या तीन वर्षापासून शिष्यवृत्तीच मिळाली नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. शिष्यवृत्ती का आल्या नाही, याबाबत शाळांकडून शिक्षण विभागात वारंवार विचारणा केली जाते. बरेचदा सांगितले जाते की हे काम आमच्याकडे नाही. कधी सांगितले जाते की पुण्यावरूनच आली नाही. अनेकदा शाळांवरच दोषारोप ठेवला जातो की तुम्ही मुलांचे डिटेल अपडेटच केले नाही. शाळांनी वारंवार शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांचे अपडेट दिले आहेत. पण शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झाली नाही.

 ४ वर्ष झाले शिष्यवृत्ती मिळाली नाही

अश्विनी बडवाईक या विद्यार्थिनीने आठव्या वर्गात एनएमएमएसची परीक्षा दिली. ती शिष्यवृत्तीसाठी पात्रही ठरली. आता ती बाराव्या वर्गात आहेत. पण शिष्यवृत्ती काही जमा झाली नाही. प्रियांशी साखरे ह्या विद्यार्थिनीचीही अशीच तक्रार आहे.

 तर परीक्षा कशाला घेतली

प्रतीक्षा हाडेकर या विद्यार्थिनीने २०१९ मध्ये एनएमएमएसची परीक्षा दिली आणि ती पात्रही ठरली. पण अजूनही शिष्यवृत्ती मिळाली नाही. शाळेला विचारणा केली तर, त्यांनी शिक्षण विभागाकडे बोट दाखविले. शिक्षण विभागाने पुण्याकडे बोट दाखवून हात वर केले. शिष्यवृत्ती द्यायचीच नव्हती तर परीक्षा का घेतली, असा सवाल प्रतीक्षाने केला.

- तीन तीन वर्षापासून शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. गुणवंत व हुशार विद्यार्थी दिवस रात्र अभ्यास करून परीक्षेद्वारे पात्र ठरतात. त्यांना शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित ठेवणे म्हणजे त्यांच्या परिश्रमाचे व मेहनतीचा अपमान करणे आहे. या परीक्षेत जिल्ह्यातून फक्त १०० ते १५० विद्यार्थी उत्तीर्ण होतात. तरीही शिक्षण विभाग त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती मिळवून देऊ शकत नसेल तर शोकांतिका आहे.

- अनिल शिवणकर, संयोजक, भाजप शिक्षक आघाडी

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीStudentविद्यार्थी