शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

परीक्षा घेता, निकाल लावता, मग शिष्यवृत्ती का देत नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 20:54 IST

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी एनएमएमएस (नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशीप) ही शिष्यवृत्ती परीक्षा केंद्र सरकारच्या मानव संसाधन विभागातर्फे घेतली जाते. पण दुर्दैव तीन तीन वर्ष पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची प्रतीक्षा करावी लागते.

ठळक मुद्देएनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र विद्यार्थी तीन तीन वर्षापासून प्रतीक्षेत अधिकारी दाखवितात शाळांच्याच चुका

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी एनएमएमएस (नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशीप) ही शिष्यवृत्ती परीक्षा केंद्र सरकारच्या मानव संसाधन विभागातर्फे घेतली जाते. आठव्या वर्गातील विद्यार्थीच ही परीक्षा देऊ शकतात. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे परीक्षेचे आयोजन केले जाते. परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये शिष्यवृत्ती बाराव्या वर्गापर्यंत दिली जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने ही परीक्षा देतात आणि पात्रही ठरतात. पण दुर्दैव तीन तीन वर्ष पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची प्रतीक्षा करावी लागते.

विशेष म्हणजे या शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात फारशी जनजागृती नाही. पण राज्यभरातून किमान १ लाखावर विद्यार्थी परीक्षा देतात. दरवर्षी नागपूर जिल्ह्यात शिष्यवृत्तीस पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या शंभर ते दीडशेच्या जवळपास असते. जिल्ह्यातील काही शाळा गरीब विद्यार्थ्यांना नियमित या परीक्षेत बसवितात आणि शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्याना आर्थिक साहाय्य मिळविण्यासाठी प्रोत्साहित करतात. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात एका उपशिक्षणाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे या शिष्यवृत्ती जबाबदारी असते. जिल्ह्यातील काही शाळा आणि पात्र ठरलेल्या काही विद्यार्थ्यांकडून गेल्या तीन वर्षापासून शिष्यवृत्तीच मिळाली नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. शिष्यवृत्ती का आल्या नाही, याबाबत शाळांकडून शिक्षण विभागात वारंवार विचारणा केली जाते. बरेचदा सांगितले जाते की हे काम आमच्याकडे नाही. कधी सांगितले जाते की पुण्यावरूनच आली नाही. अनेकदा शाळांवरच दोषारोप ठेवला जातो की तुम्ही मुलांचे डिटेल अपडेटच केले नाही. शाळांनी वारंवार शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांचे अपडेट दिले आहेत. पण शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झाली नाही.

 ४ वर्ष झाले शिष्यवृत्ती मिळाली नाही

अश्विनी बडवाईक या विद्यार्थिनीने आठव्या वर्गात एनएमएमएसची परीक्षा दिली. ती शिष्यवृत्तीसाठी पात्रही ठरली. आता ती बाराव्या वर्गात आहेत. पण शिष्यवृत्ती काही जमा झाली नाही. प्रियांशी साखरे ह्या विद्यार्थिनीचीही अशीच तक्रार आहे.

 तर परीक्षा कशाला घेतली

प्रतीक्षा हाडेकर या विद्यार्थिनीने २०१९ मध्ये एनएमएमएसची परीक्षा दिली आणि ती पात्रही ठरली. पण अजूनही शिष्यवृत्ती मिळाली नाही. शाळेला विचारणा केली तर, त्यांनी शिक्षण विभागाकडे बोट दाखविले. शिक्षण विभागाने पुण्याकडे बोट दाखवून हात वर केले. शिष्यवृत्ती द्यायचीच नव्हती तर परीक्षा का घेतली, असा सवाल प्रतीक्षाने केला.

- तीन तीन वर्षापासून शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. गुणवंत व हुशार विद्यार्थी दिवस रात्र अभ्यास करून परीक्षेद्वारे पात्र ठरतात. त्यांना शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित ठेवणे म्हणजे त्यांच्या परिश्रमाचे व मेहनतीचा अपमान करणे आहे. या परीक्षेत जिल्ह्यातून फक्त १०० ते १५० विद्यार्थी उत्तीर्ण होतात. तरीही शिक्षण विभाग त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती मिळवून देऊ शकत नसेल तर शोकांतिका आहे.

- अनिल शिवणकर, संयोजक, भाजप शिक्षक आघाडी

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीStudentविद्यार्थी