शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

कॅनमधून थंड पाणी विकणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 20:47 IST

मिनरल वॉटरच्या नावाखाली कॅनमधून केवळ थंड पाणी विकणाऱ्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत कडक करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतने केली आहे.

ठळक मुद्देअ.भा.ग्राहक पंचायतची : प्रशासनाकडून तक्रारीची दखल नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिनरल वॉटरच्या नावाखाली कॅनमधून केवळ थंड पाणी विकणाऱ्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत कडक करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतने केली आहे.सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. लग्नसमारंभ व कार्यक्रमांमध्ये गावागावांत आणि शहरांमध्ये पाण्याच्या कॅनमधून मिनरल वॉटरच्या नावाखाली केवळ थंड पाण्याची विक्री करण्यात येत आहे. पाण्याची सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेमार्फत तपासणी करण्याची मागणी पंचायतचे विदर्भ प्रांत अध्यक्ष गजानन पांडे यांनी केली आहे.पाणी खरोखरच शुद्ध आहे का? हा गंभीर मुद्दा आहे. नळ्याच्या पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता केवळ थंड पाणी आपल्या गळी उतरवले जाते, ही वस्तुस्थिती आहे. याकडे आरोग्य विभागाकडून पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. यूव्ही स्टरीलायझेशन, सूक्ष्म गाळणी व ओझोनायझेशन इत्यादी प्रक्रिया करूनच हे पाणी कॅनद्वारे उपलब्ध करायला हवे. २० लिटर एक कॅन (प्रत्यक्षात १७ लिटर) २० ते ४० रुपयांपर्यंत विकण्यात येते. हा खेळ प्रशासनाच्या लक्षात का येत नाही, असा सवालही ग्राहक पंचायतने उपस्थित केला आहे. अन्न व औषधी प्रशासन तसेच आरोग्य विभागाच्या सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या माध्यमाद्वारे कुठलीही चाचणी व शहानिशा होत नसल्याची तक्रार वारंवार अन्न व औषधी प्रशासन, वैधमापनशास्त्र विभागाकडे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत करण्यात आली आहे. परंतु याची प्रशासन गंभीर दखल घेत नाही, असा आरोपही पांडे यांनी केला आहे.कॅनमधून पाणी विक्री करणारे कारखाने शहरात गल्लीबोळात आहेत. त्यांच्यावर अन्न व औषधी प्रशासन, आरोग्य विभाग तसेच वैधमापनशास्त्र विभागाचे कुठलेही नियंत्रण नाही. थंड पाण्याच्या कॅनची प्रत्यक्षात किंमत किती? विकले जाणारे पाणी आरोग्याला फायद्याचे आहे का? विक्रीचे परवाने आहेत का? कारखान्याला परवानगी कुणी दिली, यासंदर्भात विस्तृत माहिती प्रशासनाने ग्राहकांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी गजानन पांडे यांच्यासह प्रांत सचिव संजय धर्माधिकारी, जिल्हा संघटन मंत्री गणेश शिरोळे, अशोक पात्रीकर, सहसंघटनमंत्री नरेंद्र कुळकर्णी, प्रांत महिला प्रमुख तृप्ती आकांत, अ‍ॅड. स्मिता देशपांडे, श्रीपाद भट्टलवार, विनोद देशमुख, श्रीपाद हरदास, उदय दिवे, दत्तात्रय कठाळे, संध्या पुनियानी, विलास ठोसर आणि इतर पदाधिकारी यांनी केली आहे.

टॅग्स :Waterपाणीagitationआंदोलन