शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कॅनमधून थंड पाणी विकणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 20:47 IST

मिनरल वॉटरच्या नावाखाली कॅनमधून केवळ थंड पाणी विकणाऱ्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत कडक करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतने केली आहे.

ठळक मुद्देअ.भा.ग्राहक पंचायतची : प्रशासनाकडून तक्रारीची दखल नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिनरल वॉटरच्या नावाखाली कॅनमधून केवळ थंड पाणी विकणाऱ्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत कडक करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतने केली आहे.सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. लग्नसमारंभ व कार्यक्रमांमध्ये गावागावांत आणि शहरांमध्ये पाण्याच्या कॅनमधून मिनरल वॉटरच्या नावाखाली केवळ थंड पाण्याची विक्री करण्यात येत आहे. पाण्याची सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेमार्फत तपासणी करण्याची मागणी पंचायतचे विदर्भ प्रांत अध्यक्ष गजानन पांडे यांनी केली आहे.पाणी खरोखरच शुद्ध आहे का? हा गंभीर मुद्दा आहे. नळ्याच्या पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता केवळ थंड पाणी आपल्या गळी उतरवले जाते, ही वस्तुस्थिती आहे. याकडे आरोग्य विभागाकडून पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. यूव्ही स्टरीलायझेशन, सूक्ष्म गाळणी व ओझोनायझेशन इत्यादी प्रक्रिया करूनच हे पाणी कॅनद्वारे उपलब्ध करायला हवे. २० लिटर एक कॅन (प्रत्यक्षात १७ लिटर) २० ते ४० रुपयांपर्यंत विकण्यात येते. हा खेळ प्रशासनाच्या लक्षात का येत नाही, असा सवालही ग्राहक पंचायतने उपस्थित केला आहे. अन्न व औषधी प्रशासन तसेच आरोग्य विभागाच्या सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या माध्यमाद्वारे कुठलीही चाचणी व शहानिशा होत नसल्याची तक्रार वारंवार अन्न व औषधी प्रशासन, वैधमापनशास्त्र विभागाकडे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत करण्यात आली आहे. परंतु याची प्रशासन गंभीर दखल घेत नाही, असा आरोपही पांडे यांनी केला आहे.कॅनमधून पाणी विक्री करणारे कारखाने शहरात गल्लीबोळात आहेत. त्यांच्यावर अन्न व औषधी प्रशासन, आरोग्य विभाग तसेच वैधमापनशास्त्र विभागाचे कुठलेही नियंत्रण नाही. थंड पाण्याच्या कॅनची प्रत्यक्षात किंमत किती? विकले जाणारे पाणी आरोग्याला फायद्याचे आहे का? विक्रीचे परवाने आहेत का? कारखान्याला परवानगी कुणी दिली, यासंदर्भात विस्तृत माहिती प्रशासनाने ग्राहकांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी गजानन पांडे यांच्यासह प्रांत सचिव संजय धर्माधिकारी, जिल्हा संघटन मंत्री गणेश शिरोळे, अशोक पात्रीकर, सहसंघटनमंत्री नरेंद्र कुळकर्णी, प्रांत महिला प्रमुख तृप्ती आकांत, अ‍ॅड. स्मिता देशपांडे, श्रीपाद भट्टलवार, विनोद देशमुख, श्रीपाद हरदास, उदय दिवे, दत्तात्रय कठाळे, संध्या पुनियानी, विलास ठोसर आणि इतर पदाधिकारी यांनी केली आहे.

टॅग्स :Waterपाणीagitationआंदोलन