शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्री सतीश चतुर्वेदींवरील कारवाई मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:04 IST

माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्यावर केलेली कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी करीत माजी खासदार गेव्ह आवारी व विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळही मंगळवारी दिल्लीत दाखल झाले. शिष्टमंडळाने अहमद पटेल, मोतीलाल व्होरा, जनार्दन द्विवेदी, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, आॅस्कर फर्नांडिस, मधुसुदन मिस्त्री आदी नेत्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी शहर काँग्रेसची संघटनात्मक निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली.

ठळक मुद्देआवारी, वनवेंसह समर्थकांचे दिल्लीत नेत्यांना साकडेशहर काँग्रेसची निवडणूक घ्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्यावर केलेली कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी करीत माजी खासदार गेव्ह आवारी व विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळही मंगळवारी दिल्लीत दाखल झाले. शिष्टमंडळाने अहमद पटेल, मोतीलाल व्होरा, जनार्दन द्विवेदी, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, आॅस्कर फर्नांडिस, मधुसुदन मिस्त्री आदी नेत्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी शहर काँग्रेसची संघटनात्मक निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली.चतुर्वेदी दिल्ली येथे तळ ठोकून आहेत. त्यांनीही आपल्या समर्थकांना दिल्ली येथे बोलावून घेतले. समर्थकांनी नेत्यांच्या भेटी घेत आपली बाजू मांडली. तानाजी वनवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, माजी खासदार गेव्ह आवारी यांच्या नेतृत्वात कुणाल राऊत, यशवंत कुंभलकर, विजय बाभरे, दीपक कापसे, नगरसेवक कमलेश चौधरी, किशोर जिचकार, परसराम मानवटकर, दिनेश यादव, पुरुषोत्तम हजारे, मनोज गावंडे, प्रणिता शहाणे, राकेश निकोसे, अरुण डवरे, आयशा अन्सारी, शादाब खान, अनिल मछले, आमीर नुरी, धीरज पांडे, राजेश जरगर, बाबा वकील, राजू पाली, विजय वनवे, बाबा घोरपडे, नीरज चौबे यांच्यासह एकूण ५५ जाणाचे शिष्टमंडळ मंगळवारी सकाळी दिल्लीत दाखल झाले.एकीकडे पक्ष बळकट करण्यासाठी बाहेरचे लोक पक्षात घेणे सुरू आहे तर दुसरीकडे पक्षातील सक्षम नेत्यांना कट रचून बाहेर काढले जात आहे. चतुर्वेदींवरील कारवाई योग्य नाही. त्यांना परत पक्षात घेण्यात यावे, अशी बाजू या शिष्टमंडळाने मांडली. सोबत नागपूर शहरातील संघटनेच्या निवडणुका थांबल्या आहेत. निरीक्षक पाठवून निवडणूक घेण्यात यावी. शहर अध्यक्ष पक्ष विरोधी कारवाया करीत आहे. पक्षाची बदनामी करीत आहेत. त्यांना पदमुक्त करावे, अशी मागणीही करण्यात आल्याचे तानाजी वनवे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

 

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर