शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

माजी मंत्री सतीश चतुर्वेदींवरील कारवाई मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:04 IST

माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्यावर केलेली कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी करीत माजी खासदार गेव्ह आवारी व विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळही मंगळवारी दिल्लीत दाखल झाले. शिष्टमंडळाने अहमद पटेल, मोतीलाल व्होरा, जनार्दन द्विवेदी, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, आॅस्कर फर्नांडिस, मधुसुदन मिस्त्री आदी नेत्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी शहर काँग्रेसची संघटनात्मक निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली.

ठळक मुद्देआवारी, वनवेंसह समर्थकांचे दिल्लीत नेत्यांना साकडेशहर काँग्रेसची निवडणूक घ्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्यावर केलेली कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी करीत माजी खासदार गेव्ह आवारी व विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळही मंगळवारी दिल्लीत दाखल झाले. शिष्टमंडळाने अहमद पटेल, मोतीलाल व्होरा, जनार्दन द्विवेदी, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, आॅस्कर फर्नांडिस, मधुसुदन मिस्त्री आदी नेत्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी शहर काँग्रेसची संघटनात्मक निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली.चतुर्वेदी दिल्ली येथे तळ ठोकून आहेत. त्यांनीही आपल्या समर्थकांना दिल्ली येथे बोलावून घेतले. समर्थकांनी नेत्यांच्या भेटी घेत आपली बाजू मांडली. तानाजी वनवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, माजी खासदार गेव्ह आवारी यांच्या नेतृत्वात कुणाल राऊत, यशवंत कुंभलकर, विजय बाभरे, दीपक कापसे, नगरसेवक कमलेश चौधरी, किशोर जिचकार, परसराम मानवटकर, दिनेश यादव, पुरुषोत्तम हजारे, मनोज गावंडे, प्रणिता शहाणे, राकेश निकोसे, अरुण डवरे, आयशा अन्सारी, शादाब खान, अनिल मछले, आमीर नुरी, धीरज पांडे, राजेश जरगर, बाबा वकील, राजू पाली, विजय वनवे, बाबा घोरपडे, नीरज चौबे यांच्यासह एकूण ५५ जाणाचे शिष्टमंडळ मंगळवारी सकाळी दिल्लीत दाखल झाले.एकीकडे पक्ष बळकट करण्यासाठी बाहेरचे लोक पक्षात घेणे सुरू आहे तर दुसरीकडे पक्षातील सक्षम नेत्यांना कट रचून बाहेर काढले जात आहे. चतुर्वेदींवरील कारवाई योग्य नाही. त्यांना परत पक्षात घेण्यात यावे, अशी बाजू या शिष्टमंडळाने मांडली. सोबत नागपूर शहरातील संघटनेच्या निवडणुका थांबल्या आहेत. निरीक्षक पाठवून निवडणूक घेण्यात यावी. शहर अध्यक्ष पक्ष विरोधी कारवाया करीत आहे. पक्षाची बदनामी करीत आहेत. त्यांना पदमुक्त करावे, अशी मागणीही करण्यात आल्याचे तानाजी वनवे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

 

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर