शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
5
२ हेल्थ इन्शुन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
6
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
7
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
8
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
9
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
10
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
11
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
12
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
13
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
14
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
15
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
16
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
17
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
18
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
19
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
20
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

सणासुदीत साखरेचा गोडवा महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 21:49 IST

यंदा उसाच्या भरघोस उत्पादनासह साखरेच्या उत्पादनातही प्रचंड वाढ झाली. त्यामुळे साखरेचे भाव निच्चतम स्तरावर पोहोचले. एप्रिलमध्ये ३० रुपये किलो विकण्यात येणारी साखर आता आॅगस्टमध्ये ४२ रुपयांवर पोहोचली आहे. तीन महिन्यात साखर १२ रुपयांनी महागली असून सणासुदीत साखरेचा गोडवा महागला आहे.

ठळक मुद्देतीन महिन्यात १२ रुपयांची वाढ : किरकोळमध्ये ४२ रुपये

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : यंदा उसाच्या भरघोस उत्पादनासह साखरेच्या उत्पादनातही प्रचंड वाढ झाली. त्यामुळे साखरेचे भाव निच्चतम स्तरावर पोहोचले. एप्रिलमध्ये ३० रुपये किलो विकण्यात येणारी साखर आता आॅगस्टमध्ये ४२ रुपयांवर पोहोचली आहे. तीन महिन्यात साखर १२ रुपयांनी महागली असून सणासुदीत साखरेचा गोडवा महागला आहे.शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरकारचे धोरणयावर्षी एप्रिल महिन्यात मीलमध्ये २५ रुपये आणि ठोकमध्ये २८ रुपयांत सारखेची विक्री झाली. साखर कारखान्यांनी केंद्र सरकारकडे साखर उद्योग वाचविण्याची मागणी केल्यानंतर सरकारने देऊ केलेल्या प्रोत्साहनपर राशीनंतर साखरेच्या किमती वाढल्या आणि कारखान्यांना दिलासा मिळाला. त्यानंतर बाजारात सारखेचे भाव वाढण्यास सुरुवात झाली. एप्रिलमध्ये ३० रुपयांचे भाव एक महिन्यातच ३४ ते ३६ रुपयांवर पोहोचले.ठोक साखर विक्रेते रामदास वजानी यांनी सांगितले की, उसाच्या भरघोस उत्पादनामुळे साखरेचे भाव फारच कमी झाले. त्यामुळे साखर कारखान्यांना तोटा झाला. महाराष्ट्रात २० हजार कोटी रुपयांचे चुकारे ऊस उत्पादकांचे थकीत झाले. एकीकडे साखरेचे कमी भाव तर दुसरीकडे उत्पादकांचे कोट्यवधींच्या थकीत रकमेमुळे कारखानदार दुहेरी पेचात सापडले. कारखाने टिकवून ठेवण्याासाठी त्यांनी थेट पंतप्रधान यांच्याकडे मदतीची मागणी केली. शेतकºयांना वाचविण्यासाठी सरकारने काही योजना आणल्या.उत्पादन ३२२ लाख टन तर देशात विक्री २५५ लाख टनसरकारने निर्यात खुली केली आणि आयात शुल्क माफ केले. निर्यातीत प्रति पोत्यावर (१०० किलो) ७०० रुपये प्रोत्साहनपर राशी देऊ केली. त्यामुळे कारखानदारांना थोडाफार दिलासा मिळाला. पण विदेशातही यावर्षी उसाचे बंपर उत्पादन झाल्यामुळे निर्यात नगण्य होती. त्यानंतरही यावर्षी निर्यात चार लाख टन होण्याची शक्यता आहे. सरकारने मिल मालकांना कोटा बांधून दिला. साखरेचे भाव २९ रुपये निर्धारित केले. त्यामुळे साखरेच्या भावात वाढ होऊ लागली. वजानी यांनी सांगितले की, देशात वार्षिक २५५ लाख टन विक्रीच्या तुलनेत यावर्षी देशात ३२२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. एवढी साखर विकायची कुठे, हा प्रश्न कारखानदारांसमोर उभा राहिला. पुरवठा आणि मागणीत प्रचंड तफावत आल्याने यावर्षी कारखानदारांना मोठा फटका बसला आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेInflationमहागाई