शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

मामेभावाने केला आतेभावाचा खून; पत्नीवर वाईट नजर ठेवतो म्हणून काढला काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2022 15:29 IST

दारूच्या नशेत आशिषने नीलेंद्रच्या पत्नीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे चिडलेल्या नीलेंद्रने आशिषचा दगडाने ठेचून खून केला.

ठळक मुद्देचार दिवसांपासून हाेता बेपत्ता

हिंगणा/वाडी : आपल्या पत्नीवर वाईट नजर असल्याच्या संशयावरून मामेभावाने सख्ख्या आतेभावाचा दगडाने ठेचून खून केला. विशेष म्हणजे आतेभाऊ चार दिवसांपासून बेपत्ता हाेता. त्यातच हिंगणा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील डाेंगरगाव येथील जुन्या टाेल नाका परिसरात बुधवारी (दि. ३०) मृतदेह आढळून आल्याने त्याचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पाेलिसांनी आराेपी मामेभावास अटक केली आहे.

आशिष जयलाल बिसेन (२६, रा. डाॅ.आंबेडकर नगर, वाडी, नागपूर) असे मृत आतेभावाचे तर नीलेंद्र कपूरचंद बघेल (२५, रा. खापरी, ता. हिंगणा) असे अटक करण्यात आलेल्या आराेपी मामेभावाचे नाव आहे. आशिष वाडी परिसरात मजुरी तर नीलेंद्र वर्धा राेडवरील धाब्यावर काम करायचा. आशिषने शनिवारी (दि. २६) सकाळी त्याच्या मुलीला चाॅकलेट विकत घेऊन दिले आणि घराबाहेर पडला. घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी ताे बेपत्ता असल्याची तक्रार वाडी पाेलीस ठाण्यात नाेंदविली हाेती.

दरम्यान, बुधवारी सायंकाळी डाेंगरगाव शिवारातील जुन्या टाेल नाक्याजवळ आशिषचा मृतदेह आढळून आला. त्याचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले हाेते. तपासादरम्यान, पाेलिसांनी त्याच्या मामेभावाला (नीलेंद्र) संशयाच्या बळावर ताब्यात घेत विचारपूस केली. त्याने खुनाची कबुली देत कारण सांगितल्याने हिंगणा पाेलिसांनी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा नाेंदवून त्याला अटक केली.

पत्नीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य

नीलेंद्र शनिवारी वाडीला आला आणि त्याने आशिषला खापरी येथे नेले. दारू पिताना उशीर झाल्याने आशिष नीलेंद्रच्या घरी मुक्कामी हाेता. दाेघेही रविवारी (दि. २७) सायंकाळी डाेंगरगाव शिवारात गेले. तिथे दारूच्या नशेत आशिषने नीलेंद्रच्या पत्नीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे चिडलेल्या नीलेंद्रने आशिषचा दगडाने ठेचून खून केला. दुसरीकडे, वाडी पाेलिसांनी त्याचा शाेध सुरू केला हाेता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूnagpurनागपूर