शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
4
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
6
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
7
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
8
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
9
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
10
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
12
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
13
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
14
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
15
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
16
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
17
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
18
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
19
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
20
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला

'पुरवणी मागण्यांमध्ये केवळ 750 कोटींची तरतूद, हा तर शेतकऱ्यांचा विश्वासघात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 13:20 IST

राज्य विधिमंडळात 16 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या

नागपूर - हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र, सावरकरांच्या टीकेवरील मुद्द्यावरुन पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय. तसेच, सरकारने पुरवणी मागण्यांमध्ये अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी केवळ 750 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा हा विश्वासघात असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय.

राज्य विधिमंडळात 16 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. आम्ही पुरवणी मागण्या मांडल्या, त्यावेळी आमच्यावर आक्षेप घेतला जात. 8 हजार कोटींच्या मागण्या कशा होतात, अशी टीका आमच्यावर होत. पण, सरकारकडून पुरवणी मागण्या मोठ्या येतील असा आम्हाला विश्वास होता. कारण, शेतकऱ्यांना 25 हजार रुपये हेक्टरी मदत देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं होतं, असे फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.

सरकारच्या या पुरवणी मागण्यांमध्ये 4500 कोटी रुपये आकस्मिता निधीसाठी जे उचलले, ते परत करण्याची तरतूद आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचे जे नुकसान झालंय, त्यासाठी केवळ 750 कोटींची तरतूद केलीय. राज्यात शेतकऱ्यांचं 93 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. त्यासाठी 25 हजार कोटींची नुकसान भारपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी स्वत:च केली होती. पण, तरतूद फक्त 750 कोटी रुपयांची केलीय. या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय. शेतकऱ्यांना दिलेलं पहिलं आश्वासन सरकारने पायदळी तुडवलंय. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत, असे म्हणत फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं. तसेच, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारने 25 हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केलीय.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाFarmerशेतकरीBJPभाजपा