शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

'पुरवणी मागण्यांमध्ये केवळ 750 कोटींची तरतूद, हा तर शेतकऱ्यांचा विश्वासघात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 13:20 IST

राज्य विधिमंडळात 16 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या

नागपूर - हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र, सावरकरांच्या टीकेवरील मुद्द्यावरुन पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय. तसेच, सरकारने पुरवणी मागण्यांमध्ये अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी केवळ 750 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा हा विश्वासघात असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय.

राज्य विधिमंडळात 16 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. आम्ही पुरवणी मागण्या मांडल्या, त्यावेळी आमच्यावर आक्षेप घेतला जात. 8 हजार कोटींच्या मागण्या कशा होतात, अशी टीका आमच्यावर होत. पण, सरकारकडून पुरवणी मागण्या मोठ्या येतील असा आम्हाला विश्वास होता. कारण, शेतकऱ्यांना 25 हजार रुपये हेक्टरी मदत देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं होतं, असे फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.

सरकारच्या या पुरवणी मागण्यांमध्ये 4500 कोटी रुपये आकस्मिता निधीसाठी जे उचलले, ते परत करण्याची तरतूद आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचे जे नुकसान झालंय, त्यासाठी केवळ 750 कोटींची तरतूद केलीय. राज्यात शेतकऱ्यांचं 93 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. त्यासाठी 25 हजार कोटींची नुकसान भारपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी स्वत:च केली होती. पण, तरतूद फक्त 750 कोटी रुपयांची केलीय. या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय. शेतकऱ्यांना दिलेलं पहिलं आश्वासन सरकारने पायदळी तुडवलंय. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत, असे म्हणत फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं. तसेच, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारने 25 हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केलीय.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाFarmerशेतकरीBJPभाजपा