शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

'पुरवणी मागण्यांमध्ये केवळ 750 कोटींची तरतूद, हा तर शेतकऱ्यांचा विश्वासघात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 13:20 IST

राज्य विधिमंडळात 16 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या

नागपूर - हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र, सावरकरांच्या टीकेवरील मुद्द्यावरुन पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय. तसेच, सरकारने पुरवणी मागण्यांमध्ये अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी केवळ 750 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा हा विश्वासघात असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय.

राज्य विधिमंडळात 16 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. आम्ही पुरवणी मागण्या मांडल्या, त्यावेळी आमच्यावर आक्षेप घेतला जात. 8 हजार कोटींच्या मागण्या कशा होतात, अशी टीका आमच्यावर होत. पण, सरकारकडून पुरवणी मागण्या मोठ्या येतील असा आम्हाला विश्वास होता. कारण, शेतकऱ्यांना 25 हजार रुपये हेक्टरी मदत देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं होतं, असे फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.

सरकारच्या या पुरवणी मागण्यांमध्ये 4500 कोटी रुपये आकस्मिता निधीसाठी जे उचलले, ते परत करण्याची तरतूद आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचे जे नुकसान झालंय, त्यासाठी केवळ 750 कोटींची तरतूद केलीय. राज्यात शेतकऱ्यांचं 93 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. त्यासाठी 25 हजार कोटींची नुकसान भारपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी स्वत:च केली होती. पण, तरतूद फक्त 750 कोटी रुपयांची केलीय. या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय. शेतकऱ्यांना दिलेलं पहिलं आश्वासन सरकारने पायदळी तुडवलंय. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत, असे म्हणत फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं. तसेच, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारने 25 हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केलीय.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाFarmerशेतकरीBJPभाजपा