शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

एव्हरेस्टवरून सूर्योदयाचे दृश्य विसरणार नाही : प्रणवने मांडला ३५ दिवसांचा भावनिक प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 23:43 IST

एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न प्रत्येक गिर्यारोहकाचे असते, तसे ते बालपणापासून माझाही पिच्छा सोडत नव्हते. २०१६ ला अपयशी झालो आणि हे स्वप्न अधिकच बळावले. तीन वर्षाच्या तयारीनंतर २०१९ हे वर्ष माझे ठरले. २३ मेचा अंतिम दिवस असताना आम्ही २० मेच्या पहाटे ७.३० वाजता एव्हरेस्टवर पोहचलो. त्या अत्युच्च शिखरावरून पाहताना केशरी रंग चढविलेला सूर्य हळूहळू वर येत होता. एव्हरेस्ट सर करण्यासह त्या टोकावरून सूर्योदय पाहण्याचे स्वप्नही पूर्ण झाले. हे दृश्य मी आयुष्यात कधीही विसरणार नाही, असे भावनिक मनोगत विदर्भाचा एव्हरेस्टवीर प्रणव बांडबुचे याने व्यक्त केले.

ठळक मुद्देएव्हरेस्टवीराचा हृद्य सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न प्रत्येक गिर्यारोहकाचे असते, तसे ते बालपणापासून माझाही पिच्छा सोडत नव्हते. २०१६ ला अपयशी झालो आणि हे स्वप्न अधिकच बळावले. तीन वर्षाच्या तयारीनंतर २०१९ हे वर्ष माझे ठरले. २३ मेचा अंतिम दिवस असताना आम्ही २० मेच्या पहाटे ७.३० वाजता एव्हरेस्टवर पोहचलो. त्या अत्युच्च शिखरावरून पाहताना केशरी रंग चढविलेला सूर्य हळूहळू वर येत होता. एव्हरेस्ट सर करण्यासह त्या टोकावरून सूर्योदय पाहण्याचे स्वप्नही पूर्ण झाले. हे दृश्य मी आयुष्यात कधीही विसरणार नाही, असे भावनिक मनोगत विदर्भाचा एव्हरेस्टवीर प्रणव बांडबुचे याने व्यक्त केले.सीएसी ऑलराऊंडर अ‍ॅडव्हेंचरतर्फे नागपूरचे भूषण ठरलेल्या प्रणव बांडबुचे याचा हृद्य सत्कार शुक्रवारी विष्णूजी की रसोई, बजाजनगर येथे करण्यात आला. यावेळी प्रणवने एव्हरेस्टच्या सर्वोच्च स्थानावर पोहचण्याचा प्रवास मांडला. याप्रसंगी मैत्री परिवारचे अध्यक्ष संजय भेंडे, निखिल मुंडले, तेजिंदर सिंह रेणू व शेफ विष्णू मनोहर उपस्थित होते. प्रणवने सांगितले, १५ एप्रिलला काठमांडूवरून हेलिकाप्टरने एव्हरेस्टच्या पायथ्याशी नामचे येथे पोहचलो. त्यानंतर १९ एप्रिलपासून रोटेशननुसार आमच्या टीमचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर बेस कॅम्पपासून १६ मे रोजी प्रत्यक्ष समिट पुशला सुरुवात झाली. पुढे पहिला डेथ झोन समजला जाणारा खुंब आईसफॉल पार केला.प्रणवने पुढे सांगितले, यावर्षीचे वातावरण अतिशय धोकादायक असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले होते. त्यामुळेच यावर्षी ११ गिर्यारोहकांचे एव्हरेस्ट सर करताना मृत्यू झाले तर १४ लोकांना दृष्टिदोषाची समस्या निर्माण झाली. आधीच्या अंदाजानुसार आम्हाला २३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. त्यामुळे समिट पुशपासून आम्ही आमचे नियोजन केले होते. सुदैवाने नियोजनानुसार बऱ्याच गोष्टी घडत गेल्या. त्यानुसार कॅम्प २, कॅम्प ३ आणि सर्वात धोकादायक कॅम्प ४ नंतरचा प्रवास करून आम्ही १९ मे रोजी साऊथ पोलला पोहचलो. तिथे अधिक वेळ न थांबता आमचा प्रवास सुरू केला आणि २० मेच्या पहाटे ७.३० वाजता आम्ही जगातील सर्वात उंच शिखरावर होतो. सर्वोच्च शिखरावर पोहचण्याचा आनंद शब्दात सांगू शकत नसल्याची भावना त्याने व्यक्त केली. शिखरावर गेले की खाली यावेच लागते. १० मिनिटे तेथे घालविल्यानंतर पुढचा धोका लक्षात घेऊन आम्हाला परतावे लागले व तो प्रसंग निराशादायी वाटल्याची भावना त्याने मांडली.प्रणव आता अनेक तरुणांचा प्रेरणास्रोत ठरला आहे. तो सांगतो, एकदा नापास झाले की पुन्हा परीक्षा देऊन पास व्हावेच लागते. माझेही तसेच झाले. २०१६ ला अपयशी झाल्यानंतर मला पास व्हायचे होते आणि हीच माझी प्रेरणा ठरल्याचे तो म्हणाला. खाली आलो तेव्हा नागपूरची अनेक मुले तयार होती. त्यांना पाहून थकवा दूर झाला व पुन्हा त्यांच्यासोबत बेस कॅम्पपर्यंत गेल्याचे त्याने सांगितले. त्याने गिर्यारोहणाच्या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध असल्याचे सांगत तरुणांना या क्षेत्रात येण्याचे आवाहन केले.यावेळी एव्हरेस्ट प्रवासात प्रणवने वापरलेले साहित्यही आणि प्रवासातील छायाचित्रांचे पडद्यावर प्रदर्शन येथे करण्यात आले. सीएसीचे अमोल खंते व विजय जत्थे यांनी संचालन केले.

टॅग्स :Everestएव्हरेस्ट