शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

एव्हरेस्टवरून सूर्योदयाचे दृश्य विसरणार नाही : प्रणवने मांडला ३५ दिवसांचा भावनिक प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 23:43 IST

एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न प्रत्येक गिर्यारोहकाचे असते, तसे ते बालपणापासून माझाही पिच्छा सोडत नव्हते. २०१६ ला अपयशी झालो आणि हे स्वप्न अधिकच बळावले. तीन वर्षाच्या तयारीनंतर २०१९ हे वर्ष माझे ठरले. २३ मेचा अंतिम दिवस असताना आम्ही २० मेच्या पहाटे ७.३० वाजता एव्हरेस्टवर पोहचलो. त्या अत्युच्च शिखरावरून पाहताना केशरी रंग चढविलेला सूर्य हळूहळू वर येत होता. एव्हरेस्ट सर करण्यासह त्या टोकावरून सूर्योदय पाहण्याचे स्वप्नही पूर्ण झाले. हे दृश्य मी आयुष्यात कधीही विसरणार नाही, असे भावनिक मनोगत विदर्भाचा एव्हरेस्टवीर प्रणव बांडबुचे याने व्यक्त केले.

ठळक मुद्देएव्हरेस्टवीराचा हृद्य सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न प्रत्येक गिर्यारोहकाचे असते, तसे ते बालपणापासून माझाही पिच्छा सोडत नव्हते. २०१६ ला अपयशी झालो आणि हे स्वप्न अधिकच बळावले. तीन वर्षाच्या तयारीनंतर २०१९ हे वर्ष माझे ठरले. २३ मेचा अंतिम दिवस असताना आम्ही २० मेच्या पहाटे ७.३० वाजता एव्हरेस्टवर पोहचलो. त्या अत्युच्च शिखरावरून पाहताना केशरी रंग चढविलेला सूर्य हळूहळू वर येत होता. एव्हरेस्ट सर करण्यासह त्या टोकावरून सूर्योदय पाहण्याचे स्वप्नही पूर्ण झाले. हे दृश्य मी आयुष्यात कधीही विसरणार नाही, असे भावनिक मनोगत विदर्भाचा एव्हरेस्टवीर प्रणव बांडबुचे याने व्यक्त केले.सीएसी ऑलराऊंडर अ‍ॅडव्हेंचरतर्फे नागपूरचे भूषण ठरलेल्या प्रणव बांडबुचे याचा हृद्य सत्कार शुक्रवारी विष्णूजी की रसोई, बजाजनगर येथे करण्यात आला. यावेळी प्रणवने एव्हरेस्टच्या सर्वोच्च स्थानावर पोहचण्याचा प्रवास मांडला. याप्रसंगी मैत्री परिवारचे अध्यक्ष संजय भेंडे, निखिल मुंडले, तेजिंदर सिंह रेणू व शेफ विष्णू मनोहर उपस्थित होते. प्रणवने सांगितले, १५ एप्रिलला काठमांडूवरून हेलिकाप्टरने एव्हरेस्टच्या पायथ्याशी नामचे येथे पोहचलो. त्यानंतर १९ एप्रिलपासून रोटेशननुसार आमच्या टीमचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर बेस कॅम्पपासून १६ मे रोजी प्रत्यक्ष समिट पुशला सुरुवात झाली. पुढे पहिला डेथ झोन समजला जाणारा खुंब आईसफॉल पार केला.प्रणवने पुढे सांगितले, यावर्षीचे वातावरण अतिशय धोकादायक असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले होते. त्यामुळेच यावर्षी ११ गिर्यारोहकांचे एव्हरेस्ट सर करताना मृत्यू झाले तर १४ लोकांना दृष्टिदोषाची समस्या निर्माण झाली. आधीच्या अंदाजानुसार आम्हाला २३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. त्यामुळे समिट पुशपासून आम्ही आमचे नियोजन केले होते. सुदैवाने नियोजनानुसार बऱ्याच गोष्टी घडत गेल्या. त्यानुसार कॅम्प २, कॅम्प ३ आणि सर्वात धोकादायक कॅम्प ४ नंतरचा प्रवास करून आम्ही १९ मे रोजी साऊथ पोलला पोहचलो. तिथे अधिक वेळ न थांबता आमचा प्रवास सुरू केला आणि २० मेच्या पहाटे ७.३० वाजता आम्ही जगातील सर्वात उंच शिखरावर होतो. सर्वोच्च शिखरावर पोहचण्याचा आनंद शब्दात सांगू शकत नसल्याची भावना त्याने व्यक्त केली. शिखरावर गेले की खाली यावेच लागते. १० मिनिटे तेथे घालविल्यानंतर पुढचा धोका लक्षात घेऊन आम्हाला परतावे लागले व तो प्रसंग निराशादायी वाटल्याची भावना त्याने मांडली.प्रणव आता अनेक तरुणांचा प्रेरणास्रोत ठरला आहे. तो सांगतो, एकदा नापास झाले की पुन्हा परीक्षा देऊन पास व्हावेच लागते. माझेही तसेच झाले. २०१६ ला अपयशी झाल्यानंतर मला पास व्हायचे होते आणि हीच माझी प्रेरणा ठरल्याचे तो म्हणाला. खाली आलो तेव्हा नागपूरची अनेक मुले तयार होती. त्यांना पाहून थकवा दूर झाला व पुन्हा त्यांच्यासोबत बेस कॅम्पपर्यंत गेल्याचे त्याने सांगितले. त्याने गिर्यारोहणाच्या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध असल्याचे सांगत तरुणांना या क्षेत्रात येण्याचे आवाहन केले.यावेळी एव्हरेस्ट प्रवासात प्रणवने वापरलेले साहित्यही आणि प्रवासातील छायाचित्रांचे पडद्यावर प्रदर्शन येथे करण्यात आले. सीएसीचे अमोल खंते व विजय जत्थे यांनी संचालन केले.

टॅग्स :Everestएव्हरेस्ट