शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वेगळ्या विदर्भाशिवाय आत्महत्या थांबणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 20:41 IST

शेतकरी ज्या हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे, ते जगासमोर आणण्यासाठी साहेबराव पाटील यांनी १९ मार्च १९८६ रोजी आत्महत्या केली होती. तेव्हापासूनचे सरकारचे धोरण अजूनही बदललेले नाही. आत्महत्या वाढतच आहेत. वेगळा विदर्भ झाल्याशिवाय शेतकऱ्यांची स्थिती सुधारणार नाही, असे मत आत्महत्या केलेले शेतकरी साहेबराव पाटील यांचे बंधू प्रकाश पाटील यांच्या पत्नी छाया पाटील यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देछाया पाटील : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या दुसऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकरी ज्या हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे, ते जगासमोर आणण्यासाठी साहेबराव पाटील यांनी १९ मार्च १९८६ रोजी आत्महत्या केली होती. तेव्हापासूनचे सरकारचे धोरण अजूनही बदललेले नाही. आत्महत्या वाढतच आहेत. वेगळा विदर्भ झाल्याशिवाय शेतकऱ्यांची स्थिती सुधारणार नाही, असे मत आत्महत्या केलेले शेतकरी साहेबराव पाटील यांचे बंधू प्रकाश पाटील यांच्या पत्नी छाया पाटील यांनी व्यक्त केले.विदर्भ राज्य आंदोलन समितीचे दुसरे राष्ट्रीय अधिवेशन डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. दोन दिवसीय संमेलनाचे सोमवारी प्रकाश पाटील व छाया पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. वामनराव चटप होते तर व्यासपीठावर मुख्य संयोजक राम नेवले, आर. एस. रुईकर, संस्थेचे संचालक डॉ. श्रीनिवास खांदेवाले, धनंजय धार्मिक, प्रबीर चक्रवर्ती, डॉ. जी. एस. ख्वाजा, अ‍ॅड. नंदा पराते, विजया धोटे, राजकुमार तिरपुडे, अरुण केदार, ओंकार बुलबले, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, स्वतंत्र कोकण आंदोलनाचे अभ्यासक, प्रतिनिधी भाऊ पानसरे, आत्महत्यग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य प्रकाश राठोड, गोपाल दाभाडकर, दत्ता राठोड, सुमन सरोदे, त्रिवेणाबाई गुल्हाने, विठ्ठल राठोड, पारोमिता गोस्वामी, इंद्रजित आमगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विदर्भ राज्यात विकासच विकास, आनंदच आनंद या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.साहेबराव पाटील यांनी कशा परिस्थितीमध्ये आत्महत्या केली हे सांगताना छाया पाटील भावुक झाल्या होत्या. साहेबरावांनी कुटुंबासह आत्मबलिदान केले आहे. भारत कृषिप्रधान देश असून बहुतेक कुटुंबे शेतीवर अवलंबून आहेत. अवाढव्य लोकसंख्या असलेल्या या देशात स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही हजारो गावांमध्ये ज्ञानगंगा, विकासाची गंगा पोहोचली नाही. कष्टकरी, मजूर, कारागिरांची अवस्था उसाच्या चिपाडापेक्षाही दयनीय झाली आहे. सावकारी पाश, महागाईमुळे गरिबी पाचवीलाच पुजली आहे. साहेबराव उच्च शिक्षित होते, तरी त्यांनी कुटुंबासह आत्महत्या केली. शेतकºयांचे प्रश्न शासन दरबारी पोहोचावेत म्हणून त्यांनी सामूहिक आत्महत्या केल्याचे त्यांनी सांगितले.प्रास्ताविक राम नेवले यांनी केले. संचालन डॉ. मंजूषा ठाकरे यांनी तर आभार कैलाश फाटे यांनी मानले.सुरेश द्वादशीवार, बंग दाम्पत्य आणि विदर्भातील क्रिकेटपटूंचे अभिनंदनअधिवेशनाचे अध्यक्ष अ‍ॅड. वामनराव चटप यांनी यावेळी रुईकर इन्स्टिट्यूटने दोन वर्ष अखंड परिश्रम करून विदर्भाच्या सर्व बाजूच्या अभ्यासाचा तयार केलेल्या अहवालाला इंग्रजी व मराठीत प्रकाशित करण्याची आयसीएसएसआरने शिफारस केली व त्यासाठी अनुदान देऊ केल्याची घोषणा केली. सोबतच, त्यांनी रणजी ट्राफी खेचून आणणाऱ्या विदर्भातील क्रिकेटपटूच्या अभिनंदनाचा तसेच, प्रा. सुरेश द्वादशीवार यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि गडचिरोली जिल्ह्यात जनसेवेचे कार्य करणाऱ्या डॉ. अभय व राणी बंग यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला.नवीन राज्य निर्मितीचे नियम हवेतविदर्भ संसद या दुसऱ्या सत्रात आयोजित डॉ. श्रीनिवास खांदेवाले म्हणाले, विदर्भाचे आंदोलन अहिंसक राहिले पाहिजे असे म्हणतात पण हिंसक झाल्याशिवाय शासन प्रश्नच ऐकायला तयार होत नाही, असाही अनुभव आहे. १९५० पासून आतापर्यंत वेगळ्या राज्यासाठीचे असे काही नियमच नाही. लोकांनी फक्त मरावे पण आम्ही राज्य देणार नाही. नवीन राज्य निर्माण करण्याचे काही नियम पाहिजेत, यासाठी राज्यकर्त्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. तशी मागणी या विदर्भ संसदेने सभापती, पंतप्रधान यांच्याकडे करावी, असे आवाहनही केले.स्वातंत्र्याची ज्योत पुढे न्याअध्यक्षीय भाषणात अ‍ॅड. वामनराव चटप म्हणाले, काहीही झाले तरी आता आम्ही सहन करणार नाही. विदर्भाचे आंदोलन हे स्वातंत्र्याची ज्योत आहे. ही ज्योत पुढे न्या. काही झाले तरी एकदा स्वतंंत्र विदर्भ राज्य हे माझे स्वप्न आहे, हे माझे स्वातंत्र्य आहे, असा संदेश येथून घेऊन जा, असे आवाहन केले.

टॅग्स :Vidarbhaविदर्भagitationआंदोलन