तिघांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:27 IST2020-12-15T04:27:16+5:302020-12-15T04:27:16+5:30
नागपूर : शहरातील विविध भागात एकाने विष घेतले तर दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. इमामवाडा, पाचपावली आणि यशोधरानगर पोलीस ...

तिघांची आत्महत्या
नागपूर : शहरातील विविध भागात एकाने विष घेतले तर दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. इमामवाडा, पाचपावली आणि यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या.
इमामवाड्यातील पाचनल चौक, रामबागमध्ये राहणारे नंदू नत्थूजी नाईक (वय ३९) यांनी १२ डिसेंबरला विष प्राशन केले. त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना सोमवारी पहाटे डॉक्टरांनी नाईक यांना मृत घोषित केले. पाचपावलीतील भावेश चंद्रकांत मुनियाल (वय २८) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. भावेश इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान चालवायचा. त्याने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, ते पोलिसांकडून उघड होऊ शकले नाही. जितेंद्र शामसुंदर सराफ (वय ५२) यांनी दिलेल्या माहितीवरून पाचपावली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
अशाच प्रकारे पिवळीनदी धम्मानंद नगरात राहणारे कन्हैयालाल घनश्याम यादव (वय ३०) यांनी गळफास लावल्याची घटना सोमवारी दुपारी १ वाजता उघडकीस आली. कन्हैया पानटपरी चालवत होता, असे पोलीस सांगतात. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट झाले नाही. अशोक घनश्याम यादव यांनी दिलेल्या सूचनेवरून यशोधरानगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
---