शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

गणवेशधारी सेवेकडे विद्यार्थ्यांचा कल : बोर्डाच्या कल चाचणीचे निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 23:49 IST

विद्यार्थ्यांकडून पालकांच्या अपेक्षा डॉक्टर अथवा इंजिनीअर होण्याच्या असल्या तरी, विद्यार्थ्यांचा कल गणवेशधारी सेवेकडे वाढल्याचा दिसतो आहे. राज्य शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या घेण्यात आलेल्या कल चाचणीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात विद्यार्थ्यांचा कल इंजिनीअरिंग व मेडिकलच्या तुलनेत कॉमर्स व ललित कला विषयाकडे वाढल्याचा दिसतो आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतर ३० टक्के विद्यार्थ्यांनी गणवेशधारी सेवेत जाण्याची इच्छा दर्शविली आहे.

ठळक मुद्देइंजिनीअरिंग व मेडिकलपेक्षा कॉमर्स व ललित कला विषयाकडे फोकस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विद्यार्थ्यांकडून पालकांच्या अपेक्षा डॉक्टर अथवा इंजिनीअर होण्याच्या असल्या तरी, विद्यार्थ्यांचा कल गणवेशधारी सेवेकडे वाढल्याचा दिसतो आहे. राज्य शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या घेण्यात आलेल्या कल चाचणीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात विद्यार्थ्यांचा कल इंजिनीअरिंग व मेडिकलच्या तुलनेत कॉमर्स व ललित कला विषयाकडे वाढल्याचा दिसतो आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतर ३० टक्के विद्यार्थ्यांनी गणवेशधारी सेवेत जाण्याची इच्छा दर्शविली आहे.नागपूर विभागात १ लाख ६१ हजार ९६५ विद्यार्थ्यांची कल चाचणी झाली. नागपूर विभागातील विद्यार्थ्यांचा कल हा इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाकडे कमी होताना दिसतो आहे. शैक्षणिक सत्र २०१७-१८ मध्ये इंजिनीअरिंगकडे १५.५० टक्के विद्यार्थी वळले होते. परंतु या वर्षात केवळ ९.५० टक्के विद्यार्थ्यांनी आपला कल इंजिनीअरिंगकडे दिला आहे. मेडिकलसाठी गेल्या वर्षी १०.९७ टक्के विद्यार्थ्यांचा कल होता. तो यावर्षीही सारखाच आहे. पण या अभ्यासक्रमाच्या तुलनेत विद्यार्थ्यांनी कॉमर्स अभ्यासक्रमाला विशेष पसंती दर्शविली आहे. चाचणीच्या अहवालात ३२ टक्के विद्यार्थ्यांचा कल हा कॉमर्सकडे आहे. दुसऱ्या क्रमांकावर ललित कला विषयाचा अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. मानव्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमालासुद्धा विद्यार्थ्यांनी पसंती दर्शविली आहे.सात क्षेत्रासाठी विद्यार्थ्यांची कल चाचणीकृषी, कला, मानव्यशास्त्र, कॉमर्स, ललित कला, मेडिकल, बायोसायन्स, इंजिनीअरिंग व टेक्नॉलॉजी व गणवेशधारी सेवेचा यात समावेश होता. पहिल्यांदा मोबाईलवर विद्यार्थ्यांची टेस्ट घेण्यात आली. अहवालानुसार ही स्थिती संपूर्ण राज्याची आहे.इंजिनीअरिंग व टेक्नालॉजीच्या कॉलेजची चिंता वाढलीयावर्षी १ लाख ६१ हजार ९६५ विद्यार्थ्यांची कल चाचणी घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेता, इंजिनीअरिंग व टेक्नालॉजीचा अभ्यासक्रम संचालित करणाऱ्या महाविद्यालयांची चिंता वाढली आहे. गेल्या चार वर्षात विभागासह राज्यभरात इंजिनीअरिंग अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात इंजीनिअरिंग अभ्यासक्रमाच्या २५ हजार जागेपैकी १२ हजाराहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्यासुद्धा १८ हजाराहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षण