शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

गणवेशधारी सेवेकडे विद्यार्थ्यांचा कल : बोर्डाच्या कल चाचणीचे निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 23:49 IST

विद्यार्थ्यांकडून पालकांच्या अपेक्षा डॉक्टर अथवा इंजिनीअर होण्याच्या असल्या तरी, विद्यार्थ्यांचा कल गणवेशधारी सेवेकडे वाढल्याचा दिसतो आहे. राज्य शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या घेण्यात आलेल्या कल चाचणीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात विद्यार्थ्यांचा कल इंजिनीअरिंग व मेडिकलच्या तुलनेत कॉमर्स व ललित कला विषयाकडे वाढल्याचा दिसतो आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतर ३० टक्के विद्यार्थ्यांनी गणवेशधारी सेवेत जाण्याची इच्छा दर्शविली आहे.

ठळक मुद्देइंजिनीअरिंग व मेडिकलपेक्षा कॉमर्स व ललित कला विषयाकडे फोकस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विद्यार्थ्यांकडून पालकांच्या अपेक्षा डॉक्टर अथवा इंजिनीअर होण्याच्या असल्या तरी, विद्यार्थ्यांचा कल गणवेशधारी सेवेकडे वाढल्याचा दिसतो आहे. राज्य शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या घेण्यात आलेल्या कल चाचणीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात विद्यार्थ्यांचा कल इंजिनीअरिंग व मेडिकलच्या तुलनेत कॉमर्स व ललित कला विषयाकडे वाढल्याचा दिसतो आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतर ३० टक्के विद्यार्थ्यांनी गणवेशधारी सेवेत जाण्याची इच्छा दर्शविली आहे.नागपूर विभागात १ लाख ६१ हजार ९६५ विद्यार्थ्यांची कल चाचणी झाली. नागपूर विभागातील विद्यार्थ्यांचा कल हा इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाकडे कमी होताना दिसतो आहे. शैक्षणिक सत्र २०१७-१८ मध्ये इंजिनीअरिंगकडे १५.५० टक्के विद्यार्थी वळले होते. परंतु या वर्षात केवळ ९.५० टक्के विद्यार्थ्यांनी आपला कल इंजिनीअरिंगकडे दिला आहे. मेडिकलसाठी गेल्या वर्षी १०.९७ टक्के विद्यार्थ्यांचा कल होता. तो यावर्षीही सारखाच आहे. पण या अभ्यासक्रमाच्या तुलनेत विद्यार्थ्यांनी कॉमर्स अभ्यासक्रमाला विशेष पसंती दर्शविली आहे. चाचणीच्या अहवालात ३२ टक्के विद्यार्थ्यांचा कल हा कॉमर्सकडे आहे. दुसऱ्या क्रमांकावर ललित कला विषयाचा अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. मानव्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमालासुद्धा विद्यार्थ्यांनी पसंती दर्शविली आहे.सात क्षेत्रासाठी विद्यार्थ्यांची कल चाचणीकृषी, कला, मानव्यशास्त्र, कॉमर्स, ललित कला, मेडिकल, बायोसायन्स, इंजिनीअरिंग व टेक्नॉलॉजी व गणवेशधारी सेवेचा यात समावेश होता. पहिल्यांदा मोबाईलवर विद्यार्थ्यांची टेस्ट घेण्यात आली. अहवालानुसार ही स्थिती संपूर्ण राज्याची आहे.इंजिनीअरिंग व टेक्नालॉजीच्या कॉलेजची चिंता वाढलीयावर्षी १ लाख ६१ हजार ९६५ विद्यार्थ्यांची कल चाचणी घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेता, इंजिनीअरिंग व टेक्नालॉजीचा अभ्यासक्रम संचालित करणाऱ्या महाविद्यालयांची चिंता वाढली आहे. गेल्या चार वर्षात विभागासह राज्यभरात इंजिनीअरिंग अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात इंजीनिअरिंग अभ्यासक्रमाच्या २५ हजार जागेपैकी १२ हजाराहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्यासुद्धा १८ हजाराहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षण