शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

पोरांनी ९० टक्के गुण प्राप्त केले, शिष्यवृत्तीची राशी कधी देणार?; बार्टीची टाळाटाळ

By निशांत वानखेडे | Updated: August 31, 2023 17:13 IST

डॉ. आंबेडकर विशेष अनुदान योजना कागदावरच

नागपूर : दहावीच्या परीक्षेत ९० टक्के व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी प्रतिवर्ष १ लक्ष रुपये शिष्यवृत्ती देण्याची घाेषणा सामाजिक न्याय विभागाने केली होती. विद्यार्थ्यांनी हवे तेवढे गुण प्राप्त करूनही दाेन वर्षापासून शिष्यवृत्तीचा एक पैसाही मिळाला नाही.

हाेतकरू विद्यार्थ्यांना क्षमता असूनही केवळ आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने आयआयटी, इंजिनीअरिंग यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे जाता येत नाही. या अभ्यासक्रमाच्या तयारीसाठीच मोठा खर्च करावा लागतो. शिवाय अभ्यासक्रमात प्रवेश केल्यानंतर तेथील खर्च करणेही शक्य होत नाही. त्यामुळे त्यांचे शिक्षण अपूर्ण राहते. त्यामुळे उच्च शिक्षणात अनुसूचित जातीच्या मुलांची घट होते. 

ही अडचण लक्षात घेता राज्य सरकारने २०२०-२१ या शैक्षणिक सत्रापासून दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बार्टीमार्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना सुरू केली होती. यात व्यावसायिक अभ्यासक्रमाची तयारी करण्यासाठी दोन वर्षासाठी प्रतिवर्ष १ लक्ष रुपये प्राेत्साहनपर शिष्यवृत्ती देण्याची घोषणा करण्यात आली.

मात्र दोन वर्षापासून ९० टक्क्यापेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा एक पैसाही मिळाला नाही. शेतकरी व कामगार नेते राजानंद कावळे यांनी याबाबत बार्टीच्या महासंचालकांना निवेदन सादर करून या गाेष्टीकडे लक्ष वेधले आहे. बार्टीद्वारे अशा पात्र विद्यार्थ्यांकडून अर्जही मागविण्यात आले होते. मात्र दोन वर्षे लोटूनही विद्यार्थ्यांच्या पदरात शिष्यवृत्तीची रक्कम पडली नाही. याकडे बार्टीने तातडीने लक्ष देऊन पात्र विद्यार्थ्यांना त्याचा लाभ द्यावा, अशी मागणी राजानंद कावळे यांनी केली. बार्टीने लक्ष दिले नाही तर आंदाेलनाचा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :Educationशिक्षणScholarshipशिष्यवृत्तीStudentविद्यार्थी