शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

इंग्रजीचा पेपर लिहून लिहून विद्यार्थी दमले; साेपा वाटला पण कठीण झाला 

By निशांत वानखेडे | Published: February 21, 2024 5:15 PM

बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी मुलांचा इंग्रजी या कठीण वाटणाऱ्या विषयाशी सामना झाला.

निशांत वानखेडे, नागपूर : बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी मुलांचा इंग्रजी या कठीण वाटणाऱ्या विषयाशी सामना झाला. टेंशन घेऊनच परीक्षा हॉलमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांवर पेपर संपवून बाहेर पडताना काहीसे दडपण आल्याचे जाणवले. पेपर सोपा होता पण खुपच वर्णनात्मक होता. लिहून लिहून हात दुखले, दमायला आले पण पूर्ण प्रश्न सोडवायला दमछाक झाल्याची प्रतिक्रिया मुलांनी हॉलमधून बाहेर पडताना दिली.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली. नागपूर जिल्ह्यातून ६६ हजार ४४५ विद्यार्थी यंदा परीक्षा देत असून शहरातील ३९,८३४ आणि ग्रामीण भागातील २६,२७९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शहरात ८५ आणि ग्रामीण भागात ८३ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. इंग्रजीचा पेपर असला की विद्यार्थ्यांवर दडपण असते. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी हा विषय फारसा कठीण वाटत नाही पण कला व वाणिज्य शाेखतील विद्यार्थ्यांसाठी टेंशन देणारा असताे. मात्र बुधवारचा पेपर शाखानिहाय फरकापेक्षा लेखनाच्या गतीवर अवलंबून ठरला. ज्यांची लिहिण्याची गती चांगली, त्यांच्या साठी समाधानकारक तर लेखनगती कमी असलेल्यांची मात्र दमछाक झाली.

खुपच वर्णनात्मक, लिहून हात दुखले :

पेपर खुप ‘लेंदी’ असल्याचे मुलांचे म्हणणे हाेते. प्रश्नपत्रिकेतील निबंध असलेल्या पहिल्याच प्रश्नाचे उत्तर साेडविताना खुप वेळ लागल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. शेवटचा ‘नाॅव्हेल’वरील प्रश्नही दमायला लावणारा हाेता. उत्तर साेपे हाेते पण लिहावे खुप लागल्याचे मुलांनी सांगितले. लिहून लिहून हात दुखले पण पेपर काही पूर्ण झाला नाही, असेही काहींनी सांगितले.

वेळेचे नियोजन गडबडले :

खुप वर्णनात्मक असल्याने वेळेचे नियाेजन गडबडल्याचे काहींनी सांगितले. काेणता प्रश्न आधी साेडवायचा याचा विचार करून साेडविणे आवश्यक होते. काही प्रश्न सोडवायला खुप चेळ लागल्याने पूर्ण पेपर साेडविता आला नाही, असे काहींचे म्हणणे हाेते, तर काही विद्यार्थ्यांनी शेवटच्या अर्ध्या तासात घाईघाईत पेपर पूर्ण केल्याचे सांगितले. लिहिण्याची गती चांगली असलेल्यांनी मात्र पेपर खुप चांगला गेल्याचे सांगितले.

मिळालेले १० मिनिटेही कमी पडले :

यावेळी पेपर संपल्यानंतर अतिरिक्त १० मिनिटे विद्यार्थ्यांना देण्यात आले हाेते. मात्र हा वेळही कमी पडल्याची भावना काहींनी व्यक्त केली. पेपर साेपा असला तरी लिहायला कठीण झाल्याचे त्यांचे म्हणणे हाेते.

टॅग्स :nagpurनागपूरHSC / 12th Exam12वी परीक्षा