शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पावणेतीन लाख विद्यार्थ्यांना मिळणार सुरक्षेचे धडे; ‘पोलीस फॉर स्कूल, स्कूल फॉर पोलीस’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 23:15 IST

भूकंप आला तरी एवढे लोक मरत नाहीत, जेवढे दरवर्षी अपघातात मरतात. मानवी चुकांमुळे हे अपघात होतात अन् नंतर संबंधित व्यक्तीच्या निर्दोष कुटुंबियांना आयुष्यभर ती दुखरी जखम घेऊन जगावे लागते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर - भूकंप आला तरी एवढे लोक मरत नाहीत, जेवढे दरवर्षी अपघातात मरतात. मानवी चुकांमुळे हे अपघात होतात अन् नंतर संबंधित व्यक्तीच्या निर्दोष कुटुंबियांना आयुष्यभर ती दुखरी जखम घेऊन जगावे लागते. हे टाळण्यासाठी नागपूर जिल्हा (ग्रामीण) पोलिसांनी ‘पोलीस फॉर स्कूल, स्कूल फॉर पोलीस’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमानुसार जिल्ह्यातील २ लाख, ७५ हजार विद्यार्थ्यांना पोलीस अपघात कसा टाळायचा, त्याचे धडे देणार आहे. पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी आज पत्रकारांना ही माहिती दिली.

जिल्ह्यात गेल्या वर्षभरात एकूण ९६९ रस्ते अपघात झाले असून, त्यामध्ये ४४५ अपघातांमध्ये ४६६ जण ठार झाले; तर ९०१ जण गंभीर

जखमी झाले होते. धडकी भरविणारी ही आकडेवारी लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मगर यांनी जिल्ह्यात घडणारे अपघात टाळण्यासाठी हा विशेष उपक्रम सुरू केला असून, १ जानेवारीपासून त्याला सुरुवात झाली आहे. २६ जानेवारीपर्यंत उपक्रमाचा पहिला टप्पा राहील. जिल्ह्यातील १ हजार शाळांंमध्ये पोलीस जातील आणि ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना सुरक्षेचे धडे देतील. अपघात कसे घडतात आणि अपघात कसे टाळायचे, त्यासंबंधीचे व्हिडीओ दाखवतील. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यासोबतच त्यांनी गिरवलेले सुरक्षेचे धडे आई-वडील, भाऊ-बहीण यांनाही देण्याची जबाबदारी सोपविली जाणार आहे.का घडतात अपघात?गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत गतवर्षी रस्ते अपघातांच्या प्रमाणात वाढ होऊन अपघातात सर्वाधिक बळी गेले आहेत. ग्रामीण भागात वाहनचालक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. ९० टक्के दुचाकीचालक हेल्मेट घालत नाहीत. वेगाने तसेच राँगसाईड वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे अपघात होतात. सावनेर विभागात सर्वाधिक अपघात जिल्ह्यात सर्वाधिक अपघात राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग असलेल्या सावनेर विभागात झाले आहेत. २२१ अपघातांत ९९ जणांचा मृत्यू आणि १८५ जण जखमी झाले आहेत. काटोल विभागात रस्त्यांची दयनीय अवस्था असल्यामुळे १९४ अपघातांत ९० जण ठार, तर १८४ जण जखमी झाले. उमरेड विभागात १६१ अपघातांत ८७ जण ठार, तर १७७ जण जखमी झाले आहेत. कन्हान विभागात १४९ रस्ते अपघातात ६५ जण ठार, तर १३२ जण जखमी झाले आहेत; तर नागपूर विभागात १४८ रस्ते अपघातात ६२ जण ठार, तर १३ जण गंभीर जखमी झाल्याची नोंद ग्रामीण पोलिसांकडे आहे.

टॅग्स :nagpurनागपूरAccidentअपघात