शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पावणेतीन लाख विद्यार्थ्यांना मिळणार सुरक्षेचे धडे; ‘पोलीस फॉर स्कूल, स्कूल फॉर पोलीस’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 23:15 IST

भूकंप आला तरी एवढे लोक मरत नाहीत, जेवढे दरवर्षी अपघातात मरतात. मानवी चुकांमुळे हे अपघात होतात अन् नंतर संबंधित व्यक्तीच्या निर्दोष कुटुंबियांना आयुष्यभर ती दुखरी जखम घेऊन जगावे लागते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर - भूकंप आला तरी एवढे लोक मरत नाहीत, जेवढे दरवर्षी अपघातात मरतात. मानवी चुकांमुळे हे अपघात होतात अन् नंतर संबंधित व्यक्तीच्या निर्दोष कुटुंबियांना आयुष्यभर ती दुखरी जखम घेऊन जगावे लागते. हे टाळण्यासाठी नागपूर जिल्हा (ग्रामीण) पोलिसांनी ‘पोलीस फॉर स्कूल, स्कूल फॉर पोलीस’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमानुसार जिल्ह्यातील २ लाख, ७५ हजार विद्यार्थ्यांना पोलीस अपघात कसा टाळायचा, त्याचे धडे देणार आहे. पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी आज पत्रकारांना ही माहिती दिली.

जिल्ह्यात गेल्या वर्षभरात एकूण ९६९ रस्ते अपघात झाले असून, त्यामध्ये ४४५ अपघातांमध्ये ४६६ जण ठार झाले; तर ९०१ जण गंभीर

जखमी झाले होते. धडकी भरविणारी ही आकडेवारी लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मगर यांनी जिल्ह्यात घडणारे अपघात टाळण्यासाठी हा विशेष उपक्रम सुरू केला असून, १ जानेवारीपासून त्याला सुरुवात झाली आहे. २६ जानेवारीपर्यंत उपक्रमाचा पहिला टप्पा राहील. जिल्ह्यातील १ हजार शाळांंमध्ये पोलीस जातील आणि ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना सुरक्षेचे धडे देतील. अपघात कसे घडतात आणि अपघात कसे टाळायचे, त्यासंबंधीचे व्हिडीओ दाखवतील. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यासोबतच त्यांनी गिरवलेले सुरक्षेचे धडे आई-वडील, भाऊ-बहीण यांनाही देण्याची जबाबदारी सोपविली जाणार आहे.का घडतात अपघात?गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत गतवर्षी रस्ते अपघातांच्या प्रमाणात वाढ होऊन अपघातात सर्वाधिक बळी गेले आहेत. ग्रामीण भागात वाहनचालक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. ९० टक्के दुचाकीचालक हेल्मेट घालत नाहीत. वेगाने तसेच राँगसाईड वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे अपघात होतात. सावनेर विभागात सर्वाधिक अपघात जिल्ह्यात सर्वाधिक अपघात राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग असलेल्या सावनेर विभागात झाले आहेत. २२१ अपघातांत ९९ जणांचा मृत्यू आणि १८५ जण जखमी झाले आहेत. काटोल विभागात रस्त्यांची दयनीय अवस्था असल्यामुळे १९४ अपघातांत ९० जण ठार, तर १८४ जण जखमी झाले. उमरेड विभागात १६१ अपघातांत ८७ जण ठार, तर १७७ जण जखमी झाले आहेत. कन्हान विभागात १४९ रस्ते अपघातात ६५ जण ठार, तर १३२ जण जखमी झाले आहेत; तर नागपूर विभागात १४८ रस्ते अपघातात ६२ जण ठार, तर १३ जण गंभीर जखमी झाल्याची नोंद ग्रामीण पोलिसांकडे आहे.

टॅग्स :nagpurनागपूरAccidentअपघात