शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अभियांत्रिकीचे विद्यार्थ्यांची होतेय फरफट : प्रवेशाची लगबग आणि सर्व्हर डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 21:06 IST

अभियांत्रिकी, टेक्नॉलॉजी आणि फार्मसी कॉलेजसाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेला सर्व्हर डाऊनचा चांगलाच फटका बसतो आहे. सलग तिसऱ्या दिवशी सर्व्हर डाऊन असल्याने सेतू केंद्रावर विद्यार्थ्यांसह पालकांच्या रांगा लागल्या होत्या. विद्यार्थ्यांची गर्दी आणि सेतू केंद्रावरील असुविधा यामुळे विद्यार्थी आणि पालकांकडून चांगलाच संताप व्यक्त होत होता. अखेर विद्यार्थ्यांची गर्दी लक्षात घेता, सेतू केंद्राने दीडशे विद्यार्थ्यांच्या दस्तावेजाच्या तपासणीचा निर्णय घेतला. दुपारी १२ वाजता १५० विद्यार्थ्यांना टोकन देऊन इतरांना घरी पाठविण्यात आले.

ठळक मुद्देसेतू केंद्रात व्यक्त केला विद्यार्थ्यांनी संताप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अभियांत्रिकी, टेक्नॉलॉजी आणि फार्मसी कॉलेजसाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेला सर्व्हर डाऊनचा चांगलाच फटका बसतो आहे. सलग तिसऱ्या दिवशी सर्व्हर डाऊन असल्याने सेतू केंद्रावर विद्यार्थ्यांसह पालकांच्या रांगा लागल्या होत्या. विद्यार्थ्यांची गर्दी आणि सेतू केंद्रावरील असुविधा यामुळे विद्यार्थी आणि पालकांकडून चांगलाच संताप व्यक्त होत होता. अखेर विद्यार्थ्यांची गर्दी लक्षात घेता, सेतू केंद्राने दीडशे विद्यार्थ्यांच्या दस्तावेजाच्या तपासणीचा निर्णय घेतला. दुपारी १२ वाजता १५० विद्यार्थ्यांना टोकन देऊन इतरांना घरी पाठविण्यात आले.सलग दोन दिवस सेतू केंद्रावरील सर्व्हर डाऊन असल्यामुळे दस्तावेजाच्या पडताळणीचे काम थांबविले होते. त्यामुळे बुधवारी सकाळी ७ पासून विद्यार्थ्यांनी सेतू केंद्रावर गर्दी केली होती. यावर्षीपासून व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलच्या नियंत्रणात करण्यात येत आहे. या प्रक्रियेंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करायची आहे. त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र अपलोड करण्यासाठी २१ जूनपर्यंत कालावधी देण्यात आला होता. या प्रक्रियेसाठी शहरातील काही कॉलेजमध्ये सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सीईटी सेलने ही सर्व प्रक्रिया कल्प टेक्नॉलॉजिस्ट प्रा. लि. या कं पनीला दिली आहे. परंतु सर्व्हर डाऊन असल्यामुळे सेतू सुविधा केंद्रावर दस्तावेजाची तपासणीचे कामाला अडथळा येत आहे. सक्करदरा येथील कमला नेहरू महाविद्यालयात हे सेतू केंद्र सुरू करण्यात आले आहे. बुधवारी या केंद्रावर जवळपास ७०० ते ८०० विद्यार्थी व पालक पोहचले होते. सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. दुपारी १२ नंतर सर्व्हर सुरू झाले. पण काम संथ गतीने होत असल्याने सेतू केंद्रातील ऑपरेटरने फक्त १५० विद्यार्थ्यांचे दस्तावेजाचे काम पूर्ण होईल, असे सांगून इतर विद्यार्थ्यांनी दोन-तीन दिवसानंतरचेही टोकन वाटप केले.जे विद्यार्थी सकाळपासून पोहचले होते. त्यातील १५० विद्यार्थ्यांना दस्तावेजाच्या तपासणीसाठी रात्री उशिरापर्यंत थांबावे लागणार आहे. या प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे. विशेष म्हणजे सेतू केंद्रावर अपेक्षित माहिती देण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही. सुरक्षा रक्षकाकडून अडवणूक करण्यात येत आहे.सीईटी सेलचे नियंत्रण फेलयापूर्वी प्रवेश प्रक्रिया डीटीईद्वारे राबविण्यात येत होती. तेव्हा एवढा त्रास विद्यार्थ्यांना झाला नाही. यावर्षी सीईटी सेलने ही प्रक्रिया स्वत:कडे घेऊन, त्यात चांगलीच गुंतागुंत वाढविली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे. सीईटी सेलचे नियंत्रण फेल ठरल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीNagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालय