शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

अभियांत्रिकीचे विद्यार्थ्यांची होतेय फरफट : प्रवेशाची लगबग आणि सर्व्हर डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 21:06 IST

अभियांत्रिकी, टेक्नॉलॉजी आणि फार्मसी कॉलेजसाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेला सर्व्हर डाऊनचा चांगलाच फटका बसतो आहे. सलग तिसऱ्या दिवशी सर्व्हर डाऊन असल्याने सेतू केंद्रावर विद्यार्थ्यांसह पालकांच्या रांगा लागल्या होत्या. विद्यार्थ्यांची गर्दी आणि सेतू केंद्रावरील असुविधा यामुळे विद्यार्थी आणि पालकांकडून चांगलाच संताप व्यक्त होत होता. अखेर विद्यार्थ्यांची गर्दी लक्षात घेता, सेतू केंद्राने दीडशे विद्यार्थ्यांच्या दस्तावेजाच्या तपासणीचा निर्णय घेतला. दुपारी १२ वाजता १५० विद्यार्थ्यांना टोकन देऊन इतरांना घरी पाठविण्यात आले.

ठळक मुद्देसेतू केंद्रात व्यक्त केला विद्यार्थ्यांनी संताप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अभियांत्रिकी, टेक्नॉलॉजी आणि फार्मसी कॉलेजसाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेला सर्व्हर डाऊनचा चांगलाच फटका बसतो आहे. सलग तिसऱ्या दिवशी सर्व्हर डाऊन असल्याने सेतू केंद्रावर विद्यार्थ्यांसह पालकांच्या रांगा लागल्या होत्या. विद्यार्थ्यांची गर्दी आणि सेतू केंद्रावरील असुविधा यामुळे विद्यार्थी आणि पालकांकडून चांगलाच संताप व्यक्त होत होता. अखेर विद्यार्थ्यांची गर्दी लक्षात घेता, सेतू केंद्राने दीडशे विद्यार्थ्यांच्या दस्तावेजाच्या तपासणीचा निर्णय घेतला. दुपारी १२ वाजता १५० विद्यार्थ्यांना टोकन देऊन इतरांना घरी पाठविण्यात आले.सलग दोन दिवस सेतू केंद्रावरील सर्व्हर डाऊन असल्यामुळे दस्तावेजाच्या पडताळणीचे काम थांबविले होते. त्यामुळे बुधवारी सकाळी ७ पासून विद्यार्थ्यांनी सेतू केंद्रावर गर्दी केली होती. यावर्षीपासून व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलच्या नियंत्रणात करण्यात येत आहे. या प्रक्रियेंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करायची आहे. त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र अपलोड करण्यासाठी २१ जूनपर्यंत कालावधी देण्यात आला होता. या प्रक्रियेसाठी शहरातील काही कॉलेजमध्ये सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सीईटी सेलने ही सर्व प्रक्रिया कल्प टेक्नॉलॉजिस्ट प्रा. लि. या कं पनीला दिली आहे. परंतु सर्व्हर डाऊन असल्यामुळे सेतू सुविधा केंद्रावर दस्तावेजाची तपासणीचे कामाला अडथळा येत आहे. सक्करदरा येथील कमला नेहरू महाविद्यालयात हे सेतू केंद्र सुरू करण्यात आले आहे. बुधवारी या केंद्रावर जवळपास ७०० ते ८०० विद्यार्थी व पालक पोहचले होते. सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. दुपारी १२ नंतर सर्व्हर सुरू झाले. पण काम संथ गतीने होत असल्याने सेतू केंद्रातील ऑपरेटरने फक्त १५० विद्यार्थ्यांचे दस्तावेजाचे काम पूर्ण होईल, असे सांगून इतर विद्यार्थ्यांनी दोन-तीन दिवसानंतरचेही टोकन वाटप केले.जे विद्यार्थी सकाळपासून पोहचले होते. त्यातील १५० विद्यार्थ्यांना दस्तावेजाच्या तपासणीसाठी रात्री उशिरापर्यंत थांबावे लागणार आहे. या प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे. विशेष म्हणजे सेतू केंद्रावर अपेक्षित माहिती देण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही. सुरक्षा रक्षकाकडून अडवणूक करण्यात येत आहे.सीईटी सेलचे नियंत्रण फेलयापूर्वी प्रवेश प्रक्रिया डीटीईद्वारे राबविण्यात येत होती. तेव्हा एवढा त्रास विद्यार्थ्यांना झाला नाही. यावर्षी सीईटी सेलने ही प्रक्रिया स्वत:कडे घेऊन, त्यात चांगलीच गुंतागुंत वाढविली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे. सीईटी सेलचे नियंत्रण फेल ठरल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीNagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालय