शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
3
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
4
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
5
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
6
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
7
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
8
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
9
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
10
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
11
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
12
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
13
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
14
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
15
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
16
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
17
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
18
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
19
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
20
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?

विद्यार्थीनींनो अशी करा स्वत:ची सुरक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 00:27 IST

जर आणि तुमचा आवाज हे तुमचे प्रभावी शस्त्र आहेत. ते २४ तास तुमच्या सोबत असतात. त्याचा योग्य पद्धतीने वापर करून स्वत:ची सुरक्षा स्वत:च करा, असा सल्ला वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींना दिला.

ठळक मुद्दे‘जागरूक मी आणि समाज’महिला पोलीस अधिकाऱ्यांनी दिले विद्यार्थिनींना धडे८२ महाविद्यालयातील ३२५० विद्यार्थिनींशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाईट नजरेने बघणाऱ्याकडे तितक्याच त्वेषाने बघा. करड्या आवाजात त्याला जाब विचारा. नजर आणि तुमचा आवाज हे तुमचे प्रभावी शस्त्र आहेत. ते २४ तास तुमच्या सोबत असतात. त्याचा योग्य पद्धतीने वापर करून स्वत:ची सुरक्षा स्वत:च करा, असा सल्ला वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींना दिला. 

स्वत:ची सुरक्षा स्वत:च कशी करायची, याचे धडे देण्यासाठी पोलिसांनी उपराजधानीतील शाळा - महाविद्यालयात ‘जागरूक मी आणि समाज’ हा विशेष उपक्रम राबविला. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून खास विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सहआयुक्त रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली २६ ऑगस्टपासून या उपक्रमाची सुरूवात जरीपटक्यातील म. गांधी विद्यालयातून झाली तर समारोप ३० ऑगस्टला नंदनवनमधील केडीके कॉलेजमध्ये झाला. पाच दिवसाच्या या उपक्रमात पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, उपायुक्त विनिता साहू आणि उपायुक्त निर्मला देवी यांनी ८२ शाळा महाविद्यालयातील एकूण ३२५० विद्यार्थिनीशी संवाद साधून त्यांना सुरक्षेचे धडे दिले.गुन्हे शाखा ईओडब्ल्यूच्या उपायुक्त श्वेता खेडकर यांनी बाहेरगावी शिकणाऱ्या विद्यार्थिनी, महिलांना कसा त्रास होतो, त्याबाबतची काही उदाहरणे सांगितली आणि स्वत:ची सुरक्षा स्वत:च कशी करायची, त्याबाबतही मार्गदर्शन केले. तुमची नजर आणि तुमचा आवाज हेच तुमच्याजवळचे प्रभावी शस्त्र आहे. तुमच्याकडे वाईट नजरेने बघणाऱ्याकडे तितक्याच करड्या नजरेने बघा आणि कडक आवाजात त्याला जाब विचारा छेड काढण्यासाठी आलेला गुंड तुमच्या आजूबाजूला रेंगाळणारच नाही, असे त्यांनी विद्यार्थिनीना सांगितले. मोबाईल हाताळताना कुणाच्या जाळ्यात अडकणार नाही, याची कशी काळजी घ्यायची, त्याबाबतही उपायुक्त खेडकर यांनी विद्यार्थिनींना मौलिक सल्ला दिला.न पटणाऱ्या, न आवडणाऱ्या चुकीच्या गोष्टीचा वेळीच विरोध करा. आम्ही वर्दीतील पोलीस आहोत आणि तुम्ही शाळेच्या गणवेशातील पोलीस आहात असे समजा. सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करा आणि अडचण आल्यास आम्हाला (पोलिसांना) कळवा) असा सल्ला पोलीस उपायुक्त निर्मला देवी यांनी विद्यार्थिनीशी हितगूज करताना दिला.विद्यार्थिनींचे कायदेशीर हक्क काय आहेत, ते समजावून सांगतानाच आपल्या सुरक्षेविषयी नेहमी सतर्क असायला हवे. सोबतच आपल्या आजूबाजूच्या महिला-मुलींसोबत काही चुकीचे घडत असेल तर आपण कायदेशीर मार्गाचा अवलंब करून गैरकायदेशीर प्रकार थांबवले पाहिजे, असे पोलीस उपायुक्त विनिता साहू म्हणाल्या. नेहमी जागरूक रहा, असा हितोपदेशही त्यांनी विद्यार्थिनींना दिला.या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींच्या मनातील भीती काढण्यासाठी पोलीस अधिकारी त्यांना मंचावर येऊन मनातील प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करायच्या. काय अडचण आहे अन् कोणती उपाययोजना करायची, त्यासंबंधानेही विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले जायचे.समारोपीय कार्यक्रमाला मोठ्या संख्येत विद्यार्थिनी, शिक्षिका, प्राध्यापिका, प्राचार्या आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन सहायक पोलीस निरीक्षक अनुपमा जगताप यांनी केले. गुन्हे शाखेच्या भरोसा सेलच्या प्रमुख पोलीस निरीक्षक शुभदा संख्ये तसेच सामाजिक सुरक्षा विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार वानखेडे, पोलीस उपनिरीक्षक उज्ज्वला मडावी, निशा भूते, हवालदार संतोष पुंडकर, नायक मंजू फुलबांधे, पूनम रामटेके, प्रभा खानझोडे, पूनम शेंडे आदींनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.

टॅग्स :Studentविद्यार्थीPoliceपोलिस