शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थी दोन दिवसांपासून उपाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 21:36 IST

संत चोखामेळा वसतिगृहाच्या समोर विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत. त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून मेसचे जेवण जेवण्यास नकार दिल्याने, अनेक विद्यार्थी उपाशीपोटी आंदोलनात सहभागी झाली आहेत.

ठळक मुद्देमेस कंत्राटदार बदलण्याची मागणी : जेवणात अळ्या, दुधात पाणी, निकृष्ट दर्जाची फळे देत असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणात अळ्या निघातात, जेवण निकृष्ट दर्जाचे असते, महिनोन्महिने केळी किंवा एखाद्या वेळी दुसरे फळ मिळाल्यास ते कीड लागलेले असते, दुधात पाणी असते, मांसाहारही नावापुरताच असतो, अशा अनेक तक्रारी करूनही कुणीच लक्ष देत नसल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, गड्डीगोदाम येथील विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. मंगळवारी संत चोखामेळा वसतिगृहाच्या समोर आंदोलनाला बसले. येथील विद्यार्थ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून मेसचे जेवण जेवण्यास नकार दिल्याने, अनेक विद्यार्थी उपाशीपोटी आंदोलनात सहभागी झाली आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, शाखा गड्डीगोदाम येथे दरवर्षी १५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या वसतिगृहाच्या मेसचे कंत्राट आनंद टेंभुर्णे यांना देण्यात आले आहे. सकाळचा नाश्त्यासह दोनवेळच्या भोजनाची जबाबदारी या कंत्राटदाराकडे आहे. एका विद्यार्थ्याकडून कंत्राटदाराला महिन्याकाठी ४,८५० रुपये दिले जातात. परंतु दोन हजार रुपये लायकीचे भोजनही मिळत नसल्याचे येथील विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार, काही दिवसांपूर्वीच भाजीत अळ्या निघाल्या होत्या, त्यापूर्वी वरणात अळी निघाली होती. नियमानुसार भोजनाच्या वेळी मेस कंत्राटदाराने उपस्थित राहणे आवश्यक आहे, परंतु कंत्राटदार कधी येत नाही. निकृष्ट आणि दर्जाहीन भोजन दिले जात असतानाही कुणाचेच लक्ष नाही. १५० विद्यार्थी असताना केवळ ४० अंडी दिली जातात. एवढ्या विद्यार्थ्यांसाठी १२ लिटर दूध आणले जाते. ते सर्वांना पुरविण्यासाठी त्यात तिप्पट पाणी ओतले जाते. नियमानुसार ऋतुनुसार उपलब्ध फळे देण्याचा नियम आहे, परंतु कंत्राटदार सहा-सहा महिने केवळ केळी देतो. एखादवेळी दुसरे फळ दिल्यास कीड लागलेले किंवा खराब असते. तीन-चार महिन्यांपूर्वी यासंदर्भातील तक्रारी वॉर्डन यांच्याकडे केली. परंतु त्यांनी उपाययोजना केली नाही. गेल्या दोन आठवड्यापासून भोजनाचा दर्जा फारच घसरला. यामुळे विद्यार्थ्यांनी दोन दिवसांपासून मेसमधील जेवण बंद केले आहे. सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून यासंदर्भातील तक्रारीचे निवेदनही देण्यात आले. परंतु कुणावरच कारवाई होत नसल्याने मंगळवारपासून आंदोलनाचा मार्ग निवडल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगितले. आंदोलनात २० अंध व पाच दिव्यांग विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.पाण्याची बिकट समस्यायेथील विद्यार्थ्यांनी सांगितले की, वसतिगृहात एकच ‘वॉटर कूलर’ असून, तोही नादुरुस्त आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महानगरपालिकेच्या नळावर अवलंबून राहावे लागते. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागते. ज्या दिवशी पाणीपुरवठा ठप्प पडतो, त्या दिवशी बाहेरून पाणी विकत घ्यावे लागते.प्रवेश रद्द करण्याच्या धमक्यामेस कंत्राटदार व वॉर्डनविरोधात आंदोलन सुरू केल्याने पुढील वर्षी वसतिगृहात प्रवेश रद्द करण्याच्या धमक्या वॉर्डन देत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार, वॉर्डन घरी फोन करून तुमचा मुलगा आंदोलन करीत असल्याने त्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल, याची माहिती देत आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीagitationआंदोलन