शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

नागपुरात डेंग्यूच्या सानिध्यात विद्यार्थी करताहेत अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 12:51 PM

डेंग्यूचे सर्वाधिक शिकार विद्यार्थी ठरत आहे. असे असतानाही मनपा प्रशासनासह शाळा व शिक्षण विभागाचे अधिकारी हात गुंडाळून बसले आहेत. गेल्या १५ दिवसात डेंग्यूमुळे तीन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देमनपा, शाळा व शिक्षण विभागाचे दुर्लक्ष स्वच्छतेच्या बाबतीत निष्काळजीपणा पालकांच्या तक्रारीकडेही लक्ष नाही

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डेंग्यूचे सर्वाधिक शिकार विद्यार्थी ठरत आहे. असे असतानाही मनपा प्रशासनासह शाळा व शिक्षण विभागाचे अधिकारी हात गुंडाळून बसले आहेत. गेल्या १५ दिवसात डेंग्यूमुळे तीन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक शाळकरी मुले शहरातील खासगी व सरकारी रुग्णालयात भरती आहेत.यासंदर्भात प्र्राथमिक शिक्षण अधिकारी यांच्या विचारणा केली असता, ते म्हणाले की विद्यार्थ्यांना शाळेत नाही, तर घरीच डेंग्यू होत आहे. ते म्हणाले की, डेंग्यूचे डास हे साफ पाण्यात होतात आणि शाळेत साफ पाणी कुठे असते. ते असेही म्हणाले की, डेंग्यूचे डास हे दिवसा नाही तर रात्री चावतात.अधिकाऱ्यांचे हे उत्तर विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करण्यासारखे आहे. कारण विद्यार्थी शाळेत सकाळपासून सायंकाळपर्यंत असतात.सूत्रांच्या मते डेंग्यू आजाराने ग्रस्त असलेले सर्वाधिक विद्यार्थी हे सरकारी व अनुदानित शाळेचे आहेत. खासगी शाळेत डेंग्यूचे प्रकरण पुढे आले आहे.शहरी भागात डेंग्यूचा प्रसार वेगाने वाढतो आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना डेंग्यू होऊ शकतो, यासंदर्भात पालकांनी शिक्षण विभाग व मनपा प्रशासनाकडे तक्रारही केली होती. परंतु पालकांच्या तक्रारीकडे लक्ष दिले नाही.

आकडे आहे, योजना नाहीसूत्रांच्या मते मनपा, शाळा प्रशासन व शिक्षण विभागातील अधिकाºयांना या प्रकरणी माहिती आहे. डेंग्यू किती विद्यार्थ्यांना झाला याची सुद्धा त्यांना माहिती आहे. असे असतानाही कुठलीही ठोस कारवाई करण्यात येत नाही. प्रत्येकजण एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहे. शाळा व परिसरात डेंग्यू होण्यापासून कसे वाचविता येऊ शकते, यासंदर्भात कुठलीही माहिती देण्यात येत नाही. स्वच्छतेच्या बाबतीत दुर्लक्ष होत आहे.

अधिकारी म्हणाले होय झाला मृत्यूप्राथमिक शिक्षण अधिकारी चिंतामण वंजारी यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी मान्य केले की, डेंग्यूमुळे काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. काही मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना यासंदर्भात माहितीही मिळाली आहे. कारवाई संदर्भात विचारले असता, यासंदर्भात शाळांना तत्काळ उपाययोजना करण्याची सूचना देण्यात येईल.

टॅग्स :dengueडेंग्यू