शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

संपकरी कर्मचाऱ्यांचे थाळीनाद आंदोलन, 'एकच मिशन जुनी पेन्शन'च्या घोषणांनी परिसर दणाणला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 13:06 IST

सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा 7 वा दिवस. आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा याचाच भाग म्हणून थाळी बाजाव आंदोलन करण्यात आले.

नागपूर : जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील शासकीय कर्मचारीसंपावर आहेत. सोमवारपासून (दि. २०) संपाचा दुसरा आठवडा सुरू होत आहे. संपाबाबत अजुनही तोडगा निघालेला नाही. शासकीय कर्मचारी संपावर कायम आहेत. त्यांनी दुसऱ्या आठवड्यातील आंदोलनाची रूपरेषाही ठरवली असून सोमवारी संविधान चौकात थाळीनाद आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. 'एकच मिशन जुनी पेन्शन', 'पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची'च्या घेषणांनी परिसर दणाणून टाकला. दरम्यान दुसऱ्या आठवड्यात या संपामुळे शासनाचे मोठे नुकसान होणार असून सर्वसामान्य नागरिकांचेही कामे अडल्याने त्यांनाही फटका बसणार आहे.

शनिवारी शासकीय कर्मचाऱ्यांनी भव्य मोर्चा काढून आपल्या एकजुटीचा परिचय दिला. या मोर्चात विविध विभागातील हजारो शासकीय कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन ‘एकच मिशन - जुनी पेन्शन’चा नारा बुलंद केला होता. राज्य सरकारी-निमसरकारी कर्मचारी व शिक्षक, शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. संविधान चौकात झालेल्या जाहीर सभेत मोर्चकऱ्यांनी समाधानकारक तोडगा निघत नाही तोपर्यंत संप मागे न घेण्याचा निर्धार केला होता. तसेच आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला होता.

त्यानुसार साेमवार, २० मार्च रोजी थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यात तलाठी संघानेही कामबंद आंदोलन सुरू करत सहभाग नोंदवला. अवकाळी पावसाने शेकडो हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. निसर्गाने हातातोंडाशी आलेला घास हिसकावला असून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आसवांचे तळे साठले आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, संपात असलो तरी पंचनामे करणार अशी ग्वाही यावेळी आंदोलनकर्त्या तलाठ्यांनी दिली.

दरम्यान, २१ मार्च रोजी धरणे आंदोलन, २३ मार्च रोजी काळे झेंडे दाखविले जातील. २४ तारखेपासून ‘माझी पेन्शन-माझे कुटुंब’ हे अभियान राबविले जाणार आहे. एकीकडे संविधान चौकात विविध आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधले जात आहे. तर दुसरीकडे शासकीय कार्यालये ओस पडल्याने संपूर्ण शासकीय कामकाज ठप्प पडले आहे. हा आर्थिक वर्षाचा महिना आहे. विविध विकास कामांचे कोट्यवधींचे बिल अडून पडले आहेत. विविध विभागांचे बिल कोषागारात पडून आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या विविध दाखल्यांची कामे बंद पडली आहेत. त्यामुळे या मोर्चाबाबत तोडगा निघाला नाही तर या आठवड्यात शासनाचे मोठे नुकसान होणार आहे.

टॅग्स :StrikeसंपPensionनिवृत्ती वेतनEmployeeकर्मचारीGovernmentसरकारnagpurनागपूर