शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

कायदा मोडणाऱ्यांची गय नाही; अमितेश कुमार यांची हमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 22:21 IST

आतापर्यंतच्या अधिकाऱ्यांनी नागपुरातील गुन्हेगारी नियंत्रित करण्याचे जे प्रयत्न केले ते अनुकरणीय आणि प्रशंसनीय आहेत. यापुढेही कुणी कायदा हातात घेऊ पाहत असेल तर त्याची कोणत्याच किमतीत गय केली जाणार नाही, असा इशारा नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.

ठळक मुद्देजान-मालाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकांच्या जान-मालाच्या सुरक्षेला आपले सर्वोच्च प्राधान्य राहणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून नागपूर तसे पाहता शांत आहे. येथील पोलिसांची इमेजही खूप छान आहे. आतापर्यंतच्या अधिकाऱ्यांनी नागपुरातील गुन्हेगारी नियंत्रित करण्याचे जे प्रयत्न केले ते अनुकरणीय आणि प्रशंसनीय आहेत. यापुढेही कुणी कायदा हातात घेऊ पाहत असेल तर त्याची कोणत्याच किमतीत गय केली जाणार नाही, असा इशारा नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.

पोलीस आयुक्तालयात पत्रकारांशी त्यांनी शुक्रवारी सायंकाळी अनौपचारिक चर्चा केली. यावेळी ते म्हणाले, १३ वर्षांनंतर आपण पुन्हा नागपुरात कर्तव्य बजावण्यासाठी आलो आहे. या आधीच्या आपल्या सर्व वरिष्ठ सहकाºयांनी नागपुरातील कायदा व सुव्यवस्थेची घडी अत्यंत व्यवस्थित बसविली आहे. नागपूरकर जनता नेहमीच पोलिसांना सहकार्य करते, हा आपला यापूर्वीचा अनुभव आहे. त्यामुळे जनतेचे सहकार्य मिळवून नागपूर पोलिसांची प्रतिमा आदर्श कशी ठरेल, याकडे आपण कटाक्षाने लक्ष देणार आहोत. हद्दपारी, एमपीडी, मकोका सारखे कायद्याचे कठोर शस्त्र उगारून आपण येथील गुन्हेगारी मोडून काढू. शहरातील वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष देऊ आणि अपघातमुक्त शहर कसे होईल याकडे कटाक्ष ठेवू ,असेही त्यांनी सांगितले. गुन्हेगार आणि येथील पोलिसिंग या दृष्टिकोनातून नागपूरला एक आदर्श शहर बनविण्यासाठी आपले कसोशीने प्रयत्न राहणार आहेत. किती दिवसात काय करणार हे मी आत्ता सांगणार नाही. मात्र तुम्हाला त्याचे परिणाम लवकरच दिसून येतील, असा विश्­वासही त्यांनी व्यक्त केला.गंभीर प्रकरणांचा छडा लावूमहापौर गोळीबार प्रकरण, राणे प्रकरण, सुजल वासनिक अपहरण तसेच शहरातील आतापर्यंत अनेक प्रकरणे उलगडण्यात पोलिसांना यश आले नाही, त्याबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावर बोलताना आपण सर्वच प्रकरणांचा छडा लावण्यासाठी आटोकाट प्रयत्न करू आणि त्यात यशही मिळवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहरातील कोरोनाची स्थिती आणि पोलिस या संबंधाने प्रश्न उपस्थित झाले असता त्यांनी खबरदारीच्या सर्व उपाययोजना राबवू, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या मदतीने कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.मी कधीही उपलब्ध!नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांचा कायद्याचा हक्क अबाधित राखण्यासाठी मी कोणत्याही वेळेला उपलब्ध राहीन, अशी हमी अमितेश कुमार यांनी दिली. 

 

टॅग्स :police commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालय