शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
8
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
9
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
10
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
11
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
12
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
13
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
14
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
15
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
16
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
17
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
18
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
19
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
20
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या

नागपुरात रस्त्यावर वाढली भिक्षेकरूंची वर्दळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 9:38 PM

अडीच महिन्यापासून सुरू असलेल्या टाळेबंदीत शिथिलता येताच रस्त्यावर नागरिकांची वर्दळ वाढली आहे. हे बघून शहरातील भिक्षेकरीही सक्रिय झाले असून भीक मागण्यासाठी पुन्हा गजबज वाढू लागली आहे. मात्र यामुळे संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देटाळेबंदीत शिथिलता देताच गजबज : कोरोना संसर्ग वाढण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अडीच महिन्यापासून सुरू असलेल्या टाळेबंदीत शिथिलता येताच रस्त्यावर नागरिकांची वर्दळ वाढली आहे. हे बघून शहरातील भिक्षेकरीही सक्रिय झाले असून भीक मागण्यासाठी पुन्हा गजबज वाढू लागली आहे. मात्र यामुळे संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदीची घोषणा करण्यात आली. त्यामुळे नागरिकांची गर्दीही रस्त्यावर कमी झाली आणि त्याचप्रमाणे नेहमी भिक्षेसाठी पुढे येणारे हातही रस्त्यांवरून गायब झाले. आता टाळेबंदीत शिथिलता दिल्यामुळे हळूहळू सर्व व्यवहार पूर्ववत होत चालले आहेत. गेल्या अडीच महिन्याहून अधिक काळापासून आपल्या निवाऱ्यात बसून असणारे भिक्षेकरू पुन्हा रस्त्यांवर सक्रिय झाले. स्वत:च्या पाल्याला कडेवर घेऊन या भिक्षेकरू स्त्रिया इतर नागरिकांकडून पैसे देण्यासाठी विनवणी करताना दिसत आहेत. एखाद्या व्यक्तीच्या अंगाला हात लावून हे भिक्षेकरू भीक मागत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी भौतिक दूरता राखणे गरजेचे आहे. पण हे भिक्षेकरू चौकातील दुचाकी व चारचाकी वाहनांपुढे येऊन उभे होतात. काही पैसे द्या, अशी याचना करीत दुचाकीस्वाराच्या पाया पडतात, चारचाकी वाहनांच्या खिडक्यांवर हात ठेवून जोवर खिडकीचा काच खाली होत नाही तोपर्यंत ठकठक करत असतात. त्यामुळे भीतीपोटी का होईना नागरिक लगेच आपल्या खिशात हात घालतात आणि हाती लागतील तेवढे पैसे देऊन टाकतात. मध्यंतरी कोरोनामुळे एका भिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे नागरिक या भिक्षेकरूंनपासून सावध राहण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. टाळेबंदीच्या दरम्यान अनेक समाजसेवी संस्थानी या भिक्षेकरूंना त्यांच्या निवाऱ्यात जाऊन धान्याची मदत केली. अन्नाचा पुरवठा केला आणि अनेकांकडे किटदेखील पोहचल्या आहेत. त्यामुळे आजच्या घडीला कुणी भिकारी उपाशी किंवा धान्यापासून वंचित असल्याचे दिसत नाही. तरीही हे भिक्षेकरू रस्त्यावर मास्क परिधान न करता बिनधास्त फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीती वाढली आहे. प्रशासनाने यासंदर्भात कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरत आहे.

टॅग्स :Beggerभिकारीnagpurनागपूर