शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

बंगालच्या उपसागरात तयार हाेणारे वादळ महाराष्ट्राकडे घाेंगावतंय; ढगाळ वातावरण राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 07:52 IST

नागपूर : केवळ विदर्भच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये नागरिकांना उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. बहुतेक शहरांचे तापमान ...

नागपूर : केवळ विदर्भच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये नागरिकांना उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. बहुतेक शहरांचे तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात ४१.६ अंश तापमानासह साेलापूर सर्वात उष्ण शहर ठरले तर थंड शहर म्हणून ओळख असलेल्या नाशकातही तापमानाने भरारी घेतली. येथे गुरुवारी ३९.३ अंश तापमान हाेते.

सध्या सर्वच भागात उष्णतेचा प्रकाेप सुरू आहे. मुंबईमध्ये नुकतीच तापमानाने चाळीशी पार केली हाेती. दाेन दिवसांत तापमानात घट झाली असली तरी सरासरीपेक्षा ते ४ अंशाने अधिकच आहे. येथे ३६.९ अंश तापमान नाेंदविण्यात आले. पुणे शहरही सध्या तापाचा सामना करीत आहे. एप्रिल-मे मध्ये ३८, ३९ अंशावर जाणाऱ्या पुण्यात मार्चमध्येच ताप वाढला असून, गुरुवारी ३९.१ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली. इतर शहरांमध्ये नांदेड ४१.२ अंश, बीड ४०.१ अंश, परभणी ४०.९ अंश, मालेगाव ४० अंश, औरंगाबाद ३९.५ अंश व काेल्हापुरात ३९.५ अंश कमाल तापमानाची नाेंद झाली.

दरम्यान, पुढच्या दाेन दिवसांत तापमानात घसरण हाेण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात तयार हाेणारे वादळ महाराष्ट्राकडे घाेंगावत असून, त्याच्या प्रभावाने विदर्भासह राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहील. काेकणमध्येही हलका पाऊस हाेण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

टॅग्स :TemperatureतापमानMaharashtraमहाराष्ट्र