शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

४० हजार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 22:51 IST

महाराष्ट्र सरकारने गेल्या दीड वर्षांत मागासवगीर्यांच्या ४० हजार कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबवली आहे. सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रातच याचा उल्लेख केल्याची माहिती स्वतंत्र्य मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.एस. पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देमजदूर युनियनचे पाटील यांचा आरोपयुनियन सचिव गणेश उके यांचा सपत्नीक सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र सरकारने गेल्या दीड वर्षांत मागासवगीर्यांच्या ४० हजार कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबवली आहे. सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रातच याचा उल्लेख केल्याची माहिती स्वतंत्र्य मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.एस. पाटील यांनी दिली. एका कार्यक्रमात ‘मागासवर्गीय कर्मचारी, अधिकारी यांचे पदोन्नती धोरण आणि पुढील दिशा’ या विषयावर ते बोलत होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर कामगार प्रशिक्षण केंद्र, हजारी पहाड, प्रेरणा नगर येथे संघटन सचिव गणेश उके आणि त्यांच्या पत्नी वनमाला उके यांचा सत्कार सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला. व्यासपीठावर आमदार डॉ. मिलिंद माने, विकास गौर, सतीश ओटके होते. जे.एस. पाटील यांनी सांगितले, महाराष्ट्र सरकारने २९ डिसेंबर २०१७ ला परिपत्रक काढले. त्यानुसार अनुसूचि जाती आणि जमातीच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचे थांबण्यात आले. मात्र, खुल्या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली जात आहे. विशेष म्हणजे मागावर्गीय कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबणारे आणि खुल्या प्रवर्गाला पदोन्नती आरक्षण देणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रात २९ डिसेंबर २०१७ ते २९ मे २०१९ पर्यंत ४० हजार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आले नसल्याचे नमूद केले आहे. या सरकारी कर्मचाऱ्यांसह महामंडळातील सुमारे २० हजार कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित झाले असूल अशाप्रकारे ६० कर्मचारी पदोन्नतीतील आरक्षणपासून वंचित आहेत, असेही ते म्हणाले.सत्काराला उत्तर देताना गणेश उके म्हणाले, ही लढाई केवळ आरक्षणाची नाहीतर सामाजिक आहे. आपण फक्त कर्मचारी, अधिकाऱ्यांचेच हित बघत नाही तर गवंडी कामगार, अंगणवाडी सेविका, शेतमजूर, पेट्रोल पम्प, सुरक्षा रक्षक, संघटित, असंघटित कामगारांसाठी देखील काम करतो. ही संघटना समानतेच्या तत्त्वावर चालते. या संघटनेत सर्व कर्मचारीवर्ग समान आहेत, असेही संघटन सचिव गणेश उके म्हणाले. डॉ. मिलिंद माने यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक एन.बी. जारोंडे यांनी तर संचालन वाय.के. कांबळे यांनी केले. दिनेश बोरकर यांनी आभार मानले.

टॅग्स :SC STअनुसूचित जाती जमातीEmployeeकर्मचारी