शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
2
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
3
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
6
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
7
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
8
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
9
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
10
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
11
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
12
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
13
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
14
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
15
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
16
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
17
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
18
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
19
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
20
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत

नागपूर-अमरावती मार्गावर गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 11:34 IST

गेल्या चार दिवसांपासून विदर्भात सुरू असलेल्या अकाली पाऊस व गारपीटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून....

नागपूर : ऐन रबी पिके हाती येतानाच सोमवारी सायंकाळी जिल्ह्यात गारांसह वादळी पाऊस बरसला. या पावसाने गहू, हरभरा पिकांचे मोठे नुकसान केले. तर आणखी एक दिवस ढगाळ व पावसाचे वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकरी हादरले आहेत. दरम्यान, बाभूळगाव तालुक्यात शेकडो पक्ष्यांचा मृत्यू झाला. तर यवतमाळात मजुरांच्या झोपड्या उडाल्या.

जिल्ह्यात ६० हजार हेक्टरवर रबीची पेरणी झाली आहे. यातील हरभरा आणि गहू काढणीला आला आहे. सोमवारच्या वादळवाऱ्यामुळे गहू आडवा झाला आहे. हरभऱ्याला गारीचा फटका बसला आहे. सोमवारी सायंकाळी यवतमाळात मेघगर्जनेसह पाऊस झाला. १५ मिनिटे बोराएवढ्या गारा पडल्या. रस्त्यावर आणि छतांवर गारांचा खच पडला होता. या गारीने भाजीपाला आणि आंबा बहाराचे मोठे नुकसान झाले. यवतमाळसह उमरखेड, महागाव, राळेगाव, कळंब, राळेगाव, नेर, घाटंजी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. जिल्ह्याात ४३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नेर तालुक्यातील सोनखास परिसरात आवळ्याच्या आकाराएवढ्या गारा पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.  मेटीखेडा, मोहदा परिसरात दुपारी ४ वाजतापासूनच ढगाळ वातावरण होते. त्यानंतर पावसासह गारांनी थैमान घातले होते.

यवतमाळसह प्रत्येक तालुक्यात वीटभट्ट्या उभारण्यात आल्या आहेत. वीटांचा कच्चा माल उघड्यावर असतानाच पाऊस बरसल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. पशुपक्ष्यांनाही गारांचा तडाखा सोसावा लागला. बाभूळगाव तालुक्यात झालेल्या गारपिटीत शेकडो पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. यात चिमण्या, पोपट, कावळे अशा पक्ष्यांचा समावेश आहे. पांढरकवडा, घाटंजी तालुक्यात गव्हाचा पेरा मोठ्या प्रमाणात आहे. अनेक शेतात गव्हाची कापणी करून शेतातच गंजी ठेवण्यात आली होती. या पिकाचे गारांमुळे नुकसान झाले आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गहू अक्षरश: आडवा झाला आहे. डोळ्यापुढे पिकांचे नुकसान पाहून अनेक शेतकऱ्यांना अश्रूही अनावर झाले होते.

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरी