शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-अमरावती मार्गावर गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 11:34 IST

गेल्या चार दिवसांपासून विदर्भात सुरू असलेल्या अकाली पाऊस व गारपीटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून....

नागपूर : ऐन रबी पिके हाती येतानाच सोमवारी सायंकाळी जिल्ह्यात गारांसह वादळी पाऊस बरसला. या पावसाने गहू, हरभरा पिकांचे मोठे नुकसान केले. तर आणखी एक दिवस ढगाळ व पावसाचे वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकरी हादरले आहेत. दरम्यान, बाभूळगाव तालुक्यात शेकडो पक्ष्यांचा मृत्यू झाला. तर यवतमाळात मजुरांच्या झोपड्या उडाल्या.

जिल्ह्यात ६० हजार हेक्टरवर रबीची पेरणी झाली आहे. यातील हरभरा आणि गहू काढणीला आला आहे. सोमवारच्या वादळवाऱ्यामुळे गहू आडवा झाला आहे. हरभऱ्याला गारीचा फटका बसला आहे. सोमवारी सायंकाळी यवतमाळात मेघगर्जनेसह पाऊस झाला. १५ मिनिटे बोराएवढ्या गारा पडल्या. रस्त्यावर आणि छतांवर गारांचा खच पडला होता. या गारीने भाजीपाला आणि आंबा बहाराचे मोठे नुकसान झाले. यवतमाळसह उमरखेड, महागाव, राळेगाव, कळंब, राळेगाव, नेर, घाटंजी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. जिल्ह्याात ४३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नेर तालुक्यातील सोनखास परिसरात आवळ्याच्या आकाराएवढ्या गारा पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.  मेटीखेडा, मोहदा परिसरात दुपारी ४ वाजतापासूनच ढगाळ वातावरण होते. त्यानंतर पावसासह गारांनी थैमान घातले होते.

यवतमाळसह प्रत्येक तालुक्यात वीटभट्ट्या उभारण्यात आल्या आहेत. वीटांचा कच्चा माल उघड्यावर असतानाच पाऊस बरसल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. पशुपक्ष्यांनाही गारांचा तडाखा सोसावा लागला. बाभूळगाव तालुक्यात झालेल्या गारपिटीत शेकडो पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. यात चिमण्या, पोपट, कावळे अशा पक्ष्यांचा समावेश आहे. पांढरकवडा, घाटंजी तालुक्यात गव्हाचा पेरा मोठ्या प्रमाणात आहे. अनेक शेतात गव्हाची कापणी करून शेतातच गंजी ठेवण्यात आली होती. या पिकाचे गारांमुळे नुकसान झाले आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गहू अक्षरश: आडवा झाला आहे. डोळ्यापुढे पिकांचे नुकसान पाहून अनेक शेतकऱ्यांना अश्रूही अनावर झाले होते.

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरी