शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सुकाणू कमिटीचा ‘अन्नत्याग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 21:33 IST

शेतकऱ्याच्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनांच्या सुकाणू कमिटीच्या वतीने सोमावरी जय जवान जय किसान संघटनेचे नेते प्रशांत पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वात संविधान चौकात अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्दे प्रतिकात्मक गळफास लावून शासनाच्या विरोधात नारेबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव करपे या शेतकऱ्याने आपल्या कुटुंबासह १९ मार्च १९८६ रोजी सेवाग्राम येथे आत्महत्या केली. या घटनेला सोमवारी ३२ वर्षे पूर्ण झाली. दररम्यानच्या कालावधीत राज्यातील चार लाख शेतकऱ्यानी आत्महत्या केल्या. आजही शेतकऱ्याच्या समस्या सुटलेल्या नाही. शेतकऱ्याच्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनांच्या सुकाणू कमिटीच्या वतीने सोमावरी जय जवान जय किसान संघटनेचे नेते प्रशांत पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वात संविधान चौकात अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी प्रतिकात्मक गळफास लावून शासनाच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली.शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी व्हावी. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव द्यावा, शेतीमालाच्या हमी भावाकरिता मूल्य स्थिरीकरण कोषाची तरतूद करावी, दुधाला वाढीव भाव मिळावा, बोंडअळी व गारपीटग्रस्त शेतकऱ्याना तातडीने मदत द्यावी. शेतकऱ्याना वीज बिल माफ करावे. आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. ज्या व्यवस्थेने शेतकऱ्याना आत्महत्या करण्याची वेळ आणली, त्या व्यवस्थेला जागे करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन असल्याचे प्रशांत पवार यांनी सांगितले. आता सरकार जागे हाईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रारंभी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याना आदरांजली वाहण्यात आली.आंदोलनात शेतकऱ्यानी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. यावेळी सुकाणू कमिटीचे विजयकु मार शिंदे, रविशंकर मांडवकर, मिलिंद महादेवकर, किशोर चोपडे, उत्तम सुळके, स्वप्निल साखरे, निलिकेश कोल्हे, अजय तागडे, रोशन काकडे, जय जवान जय किसान संघटनेचे अरुण लाटकर, किसान सभेचे संजय रणदिवे, जलीम शेख, वसंत मुंडले, ॠषी सहारे, नत्थू परतेती, गंगाराम खेडकर, किसान सभेचे ए.के.घोष, बंडू मेश्राम, विजय बाभुळकर, राजेंद्र गंगोत्री, जनसंपर्क मंचचे जेबुन्निसा शेख, विकास भिसीकर, बंडू वैद्य, बंडू शिंदे, विलास तुळशीकर, राजू वैद्य यांच्यासह शेतकऱ्याचा समावेश होता.

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन