शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षात राज्याचा चौफेर विकास : राज्य सरकारचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 22:48 IST

एकीकडे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत तर दुसरीकडे राज्य सरकारने चार वर्षात केलेल्या कार्याचा लेखाजोखा सादर करीत गेल्या चार वर्षात राज्याचा चौफेर विकास झाल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पत्रकारांशी चर्चा करताना राज्य सरकारने केलेल्या कामांची आकडेवारीच सादर केली.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी सादर केली आकडेवारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत तर दुसरीकडे राज्य सरकारने चार वर्षात केलेल्या कार्याचा लेखाजोखा सादर करीत गेल्या चार वर्षात राज्याचा चौफेर विकास झाल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पत्रकारांशी चर्चा करताना राज्य सरकारने केलेल्या कामांची आकडेवारीच सादर केली.या आकडेवारीनुसार राज्य सरकारने गेल्या चार वर्षात कृषी क्षेत्रावर पूर्वीच्या तुलनेत दुप्पट खर्च केला आहे. २०१४ पासून शेतकऱ्यांना ५१,२४२ कोटी रुपयाची मदत देण्यात आली. यात २१,५०० कोटी रुपयाची कर्जमाफी, ११,९५२ कोटीचा पीक विमा आणि आपत्तीपासून बचावासाठी १४,६९० कोटी रुपयांचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर अडतियांपासून मुक्त करण्यासाठी ३१०० कोटी रुपये खर्च केले आहे. सरकारने कृषी क्षेत्रात सौर ऊर्जेलाही प्रोत्साहन दिले. २०१३-१४ मध्ये ०.९ किलोवॅट / हेक्टरसौर ऊर्जेचा वापर केला जात होता. तो २०१६-१७ मध्ये वाढून १.१८ किलोवॅट हेक्टरपर्यंत पोहोचला आहे. त्याचप्रकारे २०० मेगावॅटचे ४१ प्रकल्प आणि ३०० मेगावॅटचे ६७ प्रकल्प मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होणार आहेत. २०१४ पर्यंत ४० हजार कृषीपंपांना वीज कनेक्शन मिळत होते. २०१५ पासून आतापर्यंत १ लाख ८ हजार, ५७६ कृषी पंपांना वीज कनेक्शन मिळत आहे. आॅगस्ट २०१८ पर्यंत ४ लाख ३४ हजार ३०४ शेतकºयांना वीज कनेक्शन देण्यात येईल. यावर ४,१८७ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.२०१४ पर्यंत राज्यात एकही स्वयंचलित हवामान केंद्र नव्हते. आता २०६० महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र स्थापित झाले आहे.त्याचप्रकारे सिंचन सुविधा वाढविण्यावरही राज्य सरकारने विशेष लक्ष दिले आहे. २०१४ पर्यंत राज्यात ३२ लाख हेक्टर क्षेत्रात सिंचन होते. २०१७ पर्यंत ४०.५८ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. गोसेखुर्द प्रकल्पातून २०१३-१४ पर्यंत ८,४४९ हेक्टर सिंचन क्षमता होती. ती आता ४७,५५७ हेक्टरपर्यंत पोहोचली आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करण्याची महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात आली. यातून १६,५२२ गावांमध्ये ५ लाख ५७ हजार ३८६ जलसंवर्धनाची कामे हाती घेण्यात आली.यात २४,०५,५०२ टीसीएस जलक्षमता वाढली. तर ३४ लाख २३ हजार ३१६ हेक्टर क्षेत्रात सिंचनाची क्षमता वाढली. यावर एकूण ७,६९२ कोटी रुपये खर्च करण्यात आले.गरीबांसाठी ५ लाख ८२ हजार ५२८ घरे बनवलीराज्य सरकारने पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत ग्रामीण भागातील गरीबांसाठी ५ लाख ८२ हजार ५२८ घरे बनवली. ७ लाख ३८ हजार ३ घरांचे उद्दिष्ट होते. यापैकी ५ लाख ८२ हजार ५२८ घरे बनली. यामधील दोन लाख २५ हजार घरे मागच्या सरकारने अपूर्ण ठेवलेली होती. यावर एकूण ११,१५६ कोटी रुपये खर्च करण्यात आले.१५ लाख रुग्णांना मदतमुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्षाच्या माध्यमातून राज्यातील १५ लाख रुग्णांना मदत देण्यात आली. त्यांना वै्यकीय उपचारासाठी एकूण ८४२ कोटी रुपयाची निधी उपलब्ध करून देण्यात आली.दूर  करण्यात आला अंधारसरकारने दवा केला आहे की, गेल्या चार वर्षात वीज पुरवठा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य झाले आहे. १११ गावांमध्ये वीज नव्हती. २०१८ पर्यंत सर्व गावांमध्ये वीज पोहोचवण्यात आली. राज्यातील एकूण ७ लाख ५८ हजार ७३० घरांमध्ये वीज नव्हती. यापैकी ६ लाख ३५ हजार ४४९ घरांमध्ये वीज देण्यात आली. शिल्लक घरांपर्यंतही डिसेंबरच्या शेवटपर्यंत वीज उपलब्ध केली जाईल.प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था स्थापितराज्य सरकारने चार वर्षात देशातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांची महाराष्ट्रात स्थापना केली. यात नागपूर आणि पुण्यामध्ये ट्रिपल आयटी, नागपुरात आयआयएम, नापूर, औरंगाबाद आणि मुंबईत राष्ट्रीय विधी विद्यापीठ आणि नागपुरात एम्सची स्थापना करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसState Governmentराज्य सरकार