शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

विकेल ते पिकेल तत्त्वाने राज्यात उत्पन्नवाढीचे नवे तंत्र राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 12:49 PM

Nagpur News राज्यातील कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकार योजना आखत आहे. त्या अंतर्गत विकेल ते पिकेल तत्वाने राज्यामध्ये उत्पन्नवाढीचे नवे तंत्र या वर्षापासून राबविले जाणार असल्याची माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देकृषिमंत्री भुसे यांची पत्रकार परिषदेत माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यातील कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकार योजना आखत आहे. त्या अंतर्गत विकेल ते पिकेल तत्वाने राज्यामध्ये उत्पन्नवाढीचे नवे तंत्र या वर्षापासून राबविले जाणार असल्याची माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा दौऱ्यावर आले असता खरीप आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, प्रत्येक गावाची उत्पादकता, जमिनीचा पोत आणि त्या मातीत येणारे उत्पन्न याचा सूक्ष्म अभ्यास करून हे नवे धोरण आखले जात आहे. यासाठी ग्राम कृषी विकास समितीची स्थापना प्रत्येक गावांवर करण्याचे नियोजन आहे.  या माध्यमातून राज्यातील सर्व गावांच्या कृषी क्षेत्राचे सूक्ष्म नियोजन होईल. हे पहिले वर्ष असल्याने अंमलबजावणी नुकतीच सुरू झाली आहे, येत्या वर्षभरात यावर काम झालेले दिसेल. यातून राज्याची कृषी उत्पादकता वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, पालकमंत्री नितीन राऊत प्रामुख्याने उपस्थित होते

युरियाचा दीड लाख मे. टन बफर स्टॉकयंदा राज्यात युरियाची कमतरता भासणार नाही. दीड लाख मेट्रिक टन युरियाचा बफर स्टॉक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. रासायनिक खतामध्ये दहा टक्के बचतीचे उद्दिष्ट आहे. खत आणि बियाण्यांची टंचाई शेतकऱ्यांना पडणार नाही. 

बियाण्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानशेतकऱ्यांना ऑनलाइन बियाणे देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. यासाठी त्यांच्या खात्यावर अनुदान दिले जाणार आहे. सोयाबीन बियाण्याची देखील कमतरता भासणार नाही. महाबिजच्या मागील वर्षाच्या दरानेच यंदाही सोयाबीन बियाणे दिले जाईल. या सोबतच कृषी विभागाने राबविलेल्या योजनेनुसार शेतकऱ्यांनी घरच्या घरी तयार केलेले सोयाबीनचे बियाणे वापरण्यावर यावर्षी भर देण्यात आला आहे. गरज भासल्यास मध्यप्रदेशातील बियाणे उपलब्ध करण्याच्या दृष्टीने देखील नियोजन करण्यात आले आहे.

राज्याच्या आर्थिक स्थितीत शेतकऱ्यांचे योगदानकोरोना संक्रमणाच्या काळातही महाराष्ट्रात आर्थिक स्थिती बरी आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे. चांगल्या उत्पन्नामुळेच राज्यात टंचाई नाही. कृषिमाल ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारचे उत्तम नियोजन सुरू आहे. त्यासाठी पुढाकार घेतला जात असल्याचे भुसे यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेती