शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

राज्य ग्राहक आयोगाच्या अधिकारांना कात्री : राज्य शासनाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 22:58 IST

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या आदेशाच्या अंमलबजावणीचे अधिकार दिवाणी न्यायालयांना देण्याचा निर्णय आता राज्य शासनाने घेतला आहे. अशा आदेशाचे परिपत्रक राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्ष, माजी न्यायमूर्ती ए.पी. भंगाळे यांनी जारी केले आहेत. परिपत्रकानंतर जिल्हा ग्राहक मंचने दिलासा दिल्यानंतरही ग्राहकांच्या अडचणी कायम राहणार आहे. या संदर्भात ग्राहक संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. शिवाय उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देग्राहकांना अंमलबजावणीसाठी दिवाणी न्यायालयात जावे लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या आदेशाच्या अंमलबजावणीचे अधिकार दिवाणी न्यायालयांना देण्याचा निर्णय आता राज्य शासनाने घेतला आहे. अशा आदेशाचे परिपत्रक राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्ष, माजी न्यायमूर्ती ए.पी. भंगाळे यांनी जारी केले आहेत. परिपत्रकानंतर जिल्हा ग्राहक मंचने दिलासा दिल्यानंतरही ग्राहकांच्या अडचणी कायम राहणार आहे. या संदर्भात ग्राहक संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. शिवाय उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे.ग्राहकांना दिवाणी न्यायालयांमध्ये न्यायासाठी करावी लागणारी प्रदीर्घ प्रतीक्षा टाळण्यासाठी केंद्र शासनाने अंमलबजावणीचे अधिकार ग्राहक आयोगाकडे दिले आहेत. पण राज्य शासनाने या तरतुदींशी विसंगत निर्णय घेतल्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागेल, असा ग्राहक संघटनांचा आक्षेप आहे.जलद न्यायासाठी सन १९८६ मध्ये केंद्राचा कायदाग्राहकांच्या तक्रारींचा जलदगतीने निपटारा व्हावा आणि फसवणुकीविरुद्ध न्याय मिळावा, यासाठी केंद्र शासनाचा सन १९८६ मध्ये कायदा आला. तसेच ग्राहकांना दिवाणी न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे चकरा मारायला लागू नयेत, याकरिता केंद्रीय व राज्य स्तरावर आयोग आणि जिल्हा पातळीवर ग्राहक मंचची स्थापना करण्यात आली. आयोग व मंचने ग्राहकांच्या तक्रारीवर कंपनी, बिल्डर किंवा इतरांविरोधात दंड किंवा अन्य दिवाणी स्वरुपाचे आदेश दिल्यावर संबंधितांनी त्याचे पालन न केल्यास तुरुंगवास किंवा फौजदारी शिक्षा सुनावण्याचे ग्राहक आयोग व मंचचे अधिकार अबाधित आहेत.जिल्हा ग्राहक मंचने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास ग्राहकाला राज्य आयोगाकडे दाद मागता येत होती. पण राज्य शासनाने ग्राहक संरक्षण नियमावलीत नियम १४ (६) मध्ये बदल करून ग्राहक न्यायालयांचे अंमलबजावणीचे आदेश काढून घेतले आहेत. आयोगाकडे आलेले असे सर्व अर्ज दिवाणी न्यायालयात पाठविण्यात येतील, असे परिपत्रक राज्य आयोगाने काढले आहे. त्यमुळे ग्राहकांना जलद न्याय मिळण्याऐवजी दिवाणी न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागतील, असे ग्राहक संघटनांचे मत आहे.कायद्यात कलम २५ द्वारे ग्राहकांना दिलासासन १९८६ मध्ये ग्राहक कायदा आला. २००३ मध्ये ग्राहकांना असेच दिवाणी न्यायालयात जावे लागत होते. तेथे आदेशाच्या अंमलबजावणीवर निर्णय देण्यास बराच वेळ लागत होता. यामुळे २००३ मध्ये या कायद्यात सुधारणा करीत ग्राहकांना कलम २५ द्वारे दिलासा देण्यात आला. आयोगाच्या आदेशांचे पालन कंपनी, दुकानदार, विकासक किंवा अन्य कोणत्याही प्रतिवादीने न केल्यास तक्रारदाराने अर्ज केल्यावर आयोग किंवा मंच कलम २५ नुसार अंमलबजावणीसाठी दिवाणी निर्देश जारी करते. ते जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केल्यावर महसूल संहितेतील तरतुदींनुसार जप्तीची कारवाई केली जाते. पण आता नियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्याने आता मंचकडे दाद मागण्याचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध होणार नाही. आयोग व मंचच्या आदेशाची अंमलबजावणी संबंधितांनी न केल्यास ग्राहकाला दिवाणी न्यायालयाकडे पुढील कारवाईसाठी जावे लागणार आहे.ग्राहक संरक्षणाच्या मूळ उद्देशाला हरताळकलम २५ नुसार संबंधित दोषी ग्राहक मंचच्या आदेशाची विहीत कालावधीत अंमलबजावणी करीत नसल्यास त्याची मालमत्ता जप्त करण्यासंबंधीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना कलम २५ ने दिले होते. पण आता राज्य शासनाने पुन्हा या कायद्यात बदल केल्याने ग्राहकांना दिवाणी न्यायालयाच्या चकरा माराव्या लागणार आहेत. ग्राहक संरक्षणाच्या मूळ उद्देशाला यामुळे हरताळ फासला गेला आहे.राज्य ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या सचिवांना नोटीसपरिपत्रकासंदर्भात मुंंबई ग्राहक पंचायतने राज्य शासनाच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या सचिवांना नोटीस बजावली आहे. ग्राहक संरक्षण कायदा १९८६ हा केंद्राचा कायदा आहे. या कायद्यातील कलम २५ शी विसंगत असा कुठलाही नियम किंवा बदल करण्याचा अधिकार राज्य शासनाला नाही. ग्राहकविरोधी निर्णय तात्काळ मागे न घेतल्यास ग्राहक पंचायततर्फे जनहित याचिकेद्वारे कायदेशीर आव्हान देण्यात येणार आहे.अधिकार अबाधित राहावेग्राहकांना जलदगतीने न्याय मिळावा, याकरिता राज्य आयोग व मंचचे अधिकार अबाधित राहावे. त्याला कात्री लागू नये. दिवाणी न्यायालयात गेल्यास वेळ लागेल. ग्राहकांना न्याय मिळणार नाही.गजानन पांडे, विदर्भ प्रांत संघटन मंत्री,अ.भा. ग्राहक पंचायत.अधिकाराला बाधा पोहोचू नयेकेंद्र शासनाच्या ग्राहक कायद्याद्वारे ग्राहकांना जलदगतीने न्याय मिळावा. आयोग वा मंचच्या अधिकाराला बाधा पोहोचू नये. त्यांचे अंमलबजावणीचे अधिकार कायम असावेत. ग्राहक कायद्याचे अस्तित्व कायम राहावे.देवेंद्र तिवारी, राष्ट्रीय महासचिव,अ.भा. ग्राहक कल्याण परिषद.

टॅग्स :consumerग्राहकMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार