शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

लोकमतच्या वृत्तामुळे एसटीला मिळाले ३०० कोटी लोकमत इम्पॅक्ट !

By नरेश डोंगरे | Updated: January 13, 2023 19:03 IST

दुसरा आठवडा पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर असूनही एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नसल्याने वृत्त लोकमतने प्रकाशित करताच सरकारने त्याची दखल घेतली.

नागपूर : दुसरा आठवडा पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर असूनही एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नसल्याने वृत्त लोकमतने प्रकाशित करताच सरकारने त्याची दखल घेतली. या पार्श्वभूमीवर, राज्यभरातील एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी शासनाने आज ३०० कोटी रुपये दिले. परिणामी एसटीच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदी आनंद निर्माण झाला आहे.

राज्यातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी बसेसचे संचलन, व्यवस्थापन आणि देखभालीची जबाबदारी सांभाळणाऱ्यांना आठवडा उलटून जातो, मात्र पगार मिळत नाही. कधीतरी शासन या बिचाऱ्यांच्या पगाराची व्यवस्था करते. परिणामी एसटीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांचीही मोठी कोंडी होते. गेल्या काही महिन्यांपासून कधी पगार मिळणार याची शाश्वती नसल्याने एसटीच्या कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची अवस्था केविलवाणी झाली आहे. त्यांच्यापैकी अनेकांचे जगणे उधारीवर झाले आहे. गेल्या वर्षीपर्यंत सुरू असलेला हा प्रकार नवीन वर्षात थांबेल, अशी अपेक्षा होती. मात्र, जानेवारी महिन्याची १२ तारिख होऊनही डिसेंबरचा पगार मिळाला नाही. त्यामुळे एसटी अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता.

या पार्श्वभूमीवर, शुक्रवार १३ जानेवारीच्या अंकात लोकमतने एसटीच्या कर्मचाऱ्यांची व्यथा तसेच त्यांच्यात निर्माण झालेल्या रोषाचे वृत्त 'एसटी कर्मचाऱ्यांना घामाचा दाम मिळेना' या शिर्षकाखाली प्रकाशित केले. त्याची दखल घेत सरकारने एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ३०० कोटी रुपये उपलब्ध करून देत असल्याचे जाहिर करतानाच हा निधीही दिला. त्यामुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, लोकमतच्या वृत्तामुळे हे झाल्याची भावना झाल्याने एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आज आनंदोत्सव केला आहे.

नागपूर विभागाला ६.१७ कोटी

नागपूर विभागात एसटीमध्ये काम करणाऱ्यांची संख्या २५२० एवढी आहे. त्यांच्या पगारावर महिन्याला साधारण: सहा ते सव्वासहा कोटी रुपये खर्च होतात. सरकारने आज एसटीला दिलेल्या ३०० कोटींमधून नागपूर विभागाला ६ कोटी, १७ लाख रुपये मिळाले आहेत.

टॅग्स :nagpurनागपूरST Strikeएसटी संप